शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

अतिरिक्त ताणामुळे महिलांना येतोय अकाली मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 3:38 PM

सर्वच आघाड्यांवर लढताना महिलांना सावधानतेचा इशारा

ठळक मुद्देताणामुळे महिलांचं आयुष्य होतंय कमी.ताण कमी करण्याचे प्रयत्न महिलांनी करायला हवेत.सगळ्याच आघाड्यांवर लढताना महिलांनी घ्यावी काळजी.

- मयूर पठाडेआजच्या काळात महिलांवर कामाची जबाबदारी इतकी वाढली आहे की खरंच अक्षरश: कशाशीही त्याची तुलना करता येणार नाही. प्रत्येक आघाडीवर महिला लढताहेत. अतिशय समर्थपणे लढताहेत. पूर्वीच्या तुलनेत कित्येक पटींनी त्यांच्यावर कामाचा नुसता बोजाच वाढला नाही, तर तो बोजा समर्थपणे रेटण्याचं आव्हान आणि कर्तव्यही त्यांच्यावर आपोआप लादलं गेलं आहे.महिलांनी घराचा उंबरा ओलांडला आणि बाहेरचीही जबाबदारी त्यांनी घ्यायला सुरुवात केली. असं असलं तरी कोणत्याच आघाडीवर त्यांची जबाबदारी कमी झाली नाही, उलट ती वाढलीच. शिवाय प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट, व्यवस्थितच झाली पाहिजे, कोणतीच कमतरता त्यात राहायला नको याचं सततचं प्रेशरही वाढलं.महिला खरोखरच सुपर वुमन झाल्या. त्या तुलनेत पुरुषांवरीची जबाबदारी एवढी वाढली नाही. महिलांवरचं परफॉर्मन्स प्रेशर मात्र दिवसेंदिवस वाढतच गेलं. आता तर ते इतकं वाढलं आहे की त्यांच्या आयुष्यावरच त्याचं प्रश्नचिन्ह उमटतं आहे.नुकत्याच झालेल्या संशोधनानं त्यावर शिक्कामोर्तब करताना महिलांचा धोक्याचा इशारा दिला आहे. ओटावा युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात विस्तृत अभ्यास केला आणि त्यावर आपली निरीक्षणं नोंदवलेली आहेत.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार अतिरिक्त ताणाच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस महिला दबल्या जाताहेत. त्या ताणाचा त्यांच्या शरीर, मनावर तर परिणाम होतो आहेच, पण त्यांचं आयुष्यही कमी होतंय. अनेक महिलांचं आयुष्य ताणामुळे कमी होताना त्यांना अकालीच मृत्यू येतोय. आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी महिलांवरील ताण कमी झाला पाहिजे आणि महिलांनीही त्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले पाहिजेत, प्रत्येक आघाडीवर लढताना काही काळ विश्रांतीही घेतली पाहिजे आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा कळकळीचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.