शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

तुम्हाला आकडी येते का? एपिलेप्सी आजार असू शकतो; मेंदूविकार तज्ज्ञांकडून तपासणी गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 11:28 IST

या आजाराबाबत फारशी माहिती आणि जनजागृती नसल्याने अनेक रुग्णांना या आजाराचे निदान मिळत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे रुग्णांना आकडी येते, काही काळात रुग्ण बरा होतो. मात्र त्या रुग्णांचे आपल्याकडे व्यवस्थित निदान केले जात नाही. त्यामुळे त्यांना वर्षातून काही वेळा आकडी येत असते, मात्र अशा रुग्णांची मेंदूविकार तज्ज्ञांकडून तपासणी करण्याचे गरजचे असते. कारण या अशा रुग्णांना एपिलेप्सी नावाचा आजार असू शकतो. या आजाराचे प्रमाण राज्यातील लोकसंख्येच्या एक टक्का असल्याचे सांगण्यात येते. या आजाराबाबत फारशी माहिती आणि जनजागृती नसल्याने अनेक रुग्णांना या आजाराचे निदान मिळत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

अचानक येतो झटकाएपिलेप्सी आजारात फिट येणे किंवा आकडी किंवा मिरगी अशी लक्षणे आढळून येतात त्याला अपस्मार नावाने संबोधतात. या आजारामध्ये रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न येता झटका येतो. अनेकवेळा त्या रुग्णाची शुद्ध हरपते, दातखिळी बसते. त्यावेळी रुग्ण त्या ठिकाणी खाली जमिनीवर कोसळतो. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांना काय करावे, हे पटकन उमजत नाही. यामध्ये काही काळानंतर रुग्ण पुन्हा स्वतःहून स्थिर स्थावर होतो. मात्र जेव्हा हा झटका येतो त्यावेळी त्याला काहीही कळत नाही. 

औधषोपचारासह शस्त्रक्रियेचा पर्यायशहरात या आजारावर उपाय केले जातात.  विशेष म्हणजे हा आजार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. या आजारावर उपाय करण्यासाठी मेंदूविकार तज्ज्ञांची गरज असते. त्यामध्ये हे तज्ज्ञ ई ई जी  (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम) चाचणी, एम आर आय तसेच कुटुंबातील कोणत्या सदस्याला हा आजार आहे का ? हे पाहून या आजाराचे निदान करत असतात. निदान केल्यानंतर हा आजार बरा करण्यासाठी रुग्णाला ४-५ वर्षे औषधे घ्यावी लागतात. औषधाने हा आजार बरा झाला नाहीतर शस्त्रक्रिया केली जाते. 

काय असतात कारणे  काही प्रमाणात हा आजार आनुवंशिक असतो  मेंदूमध्ये गाठ येणे   मेंदूला इजा होणे   मेंदूला संसर्ग होणे  जन्मावेळी श्वास मेंदूला न मिळणे 

हे करू नये ?   या अशा पद्धतीचे रुग्ण पाहिल्यावर अनेकवेळा चप्पल आणि कांदा तोंड नाकावर लावला जातो.  तोंडावर सोडा किंवा पाणी मारले जाते   तोंडात चमचा किंवा तत्सम धातुयुक्त पदार्थ घुसविला जातो. 

ग्रामीण भागात  अनेक रुग्णांना या आजाराची माहिती नाही. या आजाराचे निदान करणे सोपे आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणेसुद्धा सोपे आहे. या आजारात त्या व्यक्तीला कुठेही फिट्स येऊ शकते. त्यामुळे या आजाराचे एकदा निदान झाल्यानंतर अशा रुग्णांनी ड्रायव्हिंग, स्वामिंग करणे टाळणे गरजेचे आहे. - डॉ. निर्मल सूर्या, अध्यक्ष, इंडियन फाउंडेशन ऑफ न्यूरोरिहॅबिलिटेशन

टॅग्स :Healthआरोग्य