शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

पावसाळ्यात कोणत्या डाळी खाणं सगळ्यात चांगलं? वाचाल तर पोट होणार नाही खराब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 12:17 IST

Best Pulse In Monsoon : पावसाळ्यात कोणत्या डाळीचं सेवन करावं आणि कोणत्या डाळींचं करू नये? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण पावसाळ्यात आरोग्यासंबंधी अनेक समस्या होत असतात.

Best Pulse In Monsoon : बरेच लोक रोजच्या जेवणात डाळीचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतात. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ इत्यादी डाळीचं लोक सेवन करतात. डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे डाळींचं सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. पण पावसाळ्यात कोणत्या डाळीचं सेवन करावं आणि कोणत्या डाळींचं करू नये? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण पावसाळ्यात आरोग्यासंबंधी अनेक समस्या होत असतात. त्यामुळे वातावरणानुसार काही गोष्टींचं सेवन करावं लागतं. अशात आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, पावसाळ्यात कोणत्या डाळीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

कोणत्या डाळी जास्त खाव्या?

पावसाळ्यात मूग आणि मसूरची डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. तशा या डाळी तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकता. मात्र, या डाळींचं महत्व वाढतं. जर तुम्ही मूग आणि मसूर डाळ मिक्स करूनही खाल तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. मूग डाळ आणि मसूरची डाळ आपल्या पोटासाठी पचन तंत्रासाठी फार फायदेशीर आहेत.

मिक्स डाळ फायदेशीर

मूग आणि मसूरची मिक्स डाळ तुम्हाला कोणत्याही सीझनमध्ये फायदेशीर ठरते. खासकरून पावसाळ्यात या मिक्स डाळी खाल्ल्याने जास्त फायदे होतात. पावसाळ्यात आपलं पचनतंत्र खूप कमजोर झालेलं असतं. लवकर काही पचन होत नाही. अशात मूग आणि मसूर डाळ खूप लवकर पचतात. मूग डाळ ही थंड असते आणि मसूरची डाळ ही उष्ण असते. त्यामुळे या डाळी मिक्स करून खाल तर याने पोटाला फायदा होतो.

प्रोटीनचा खजिना आहे दोन्ही डाळी

तशा तर सगळ्याच डाळींमध्ये प्रोटीन भरपूर असतं. आरोग्यासाठी प्रोटीन खूप गरजेचंही असतं. त्याशिवाय प्रोटीन आपले केस, नखे आणि शरीरात नवीन कोशिका तयार करण्याचं काम करतं. त्यामुळेच रोज जेवणात एक वाटी डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. रोज जरी शक्य नसलं तरी आठवड्यातून 3 ते 4 वेळा मसूर आणि मूगाची मिक्स डाळ खाल्ली पाहिजे. घरातील लहान मुले आणि वयोवृद्धांसाठी मूग आणि मसूरची डाळ खूप फायदेशीर आहे.

काय काय होतात फायदे?

जे लोक आठवड्यातून 4 ते 5 वेळा मूग आणि मसूरची मिक्स डाळ खातात तेव्हा त्यांना अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. या डाळी मिक्स खाल्ल्याने शरीरातील वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. डायबिटीसचा धोका कमी होतो. या डाळींमध्ये लो फॅट असतं ज्यामुळे हृदयरोगांपासूनही बचाव होतो. त्यासोबतच या डाळींमध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. या डाळीमध्ये आयर्न आणि झिंक भरपूर असतं जे शरीरात रक्त वाढवण्यास मदत करतात. 

पचनासाठी हलक्या डाळी

हाय प्रोटीन असल्याने डाळी पचन होण्यास जड असतात. त्यामुळेच डाळी सामान्यपणे दिवसा खाण्याचा सल्ला दिला जातो. पोटाची कोणतीही समस्या झाल्यावरही मूग आणि मसूरची डाळ वेगवेगळ्या पद्धतीने खाण्याचा सल्ला दिला जातो. पचन तंत्र बिघडलं असेल, उलटी, जुलाब, पोटदुखी, बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे यांसारख्या झाल्यावर या डाळी खाण्यास सांगितलं जातं. कारण या डाळी लवकर पचतात. या डाळी पातळ खाल्ल्या तर अधिक फायदा होतो. 

कोणत्या डाळी खाऊ नये?

पावसाळ्यात कोणत्या डाळी खाऊ नये असाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर पावसाळ्यात उडीद डाळ अजिबात खाऊ नये. कारण ही डाळ पचण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. तसेच या दिवसात चणा डाळ सुद्धा खाणं टाळलं पाहिजे. तूर डाळीचं सेवन कमी करावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशल