शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रक्तातील विषारी पदार्थ साफ करण्याचे नैसर्गिक उपाय, अनेक आजार होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 11:33 IST

काही नैसर्गिक उपायांनीच रक्त शुद्ध ठेवता येतं. चला जाणून घेऊ रक्त शुद्ध ठेवण्याचे काही नैसर्गिक उपाय...

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरातील रक्त अशुद्ध होतं. त्यामुळे सतत काहीना काही आजार व्यक्तीला होत राहतात. अशात रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. मात्र, त्यासाठी काही औषधे घेण्याची गरज नाही. काही नैसर्गिक उपायांनीच रक्त शुद्ध ठेवता येतं. चला जाणून घेऊ रक्त शुद्ध ठेवण्याचे काही नैसर्गिक उपाय...

ब्रोकली 

ब्रोकली रक्त शुद्ध करण्यासाठी बेस्ट फूड मानलं जातं. याने शरीरातील नुकसानकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, व्हिटॅमिन के, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, पोटॅशिअम, मॅगनीज, फॉस्फोरस सारखे तत्व असतात. त्यामुळे याचा नियमित आहारात समावेश केल्याने रक्त शुद्ध राहण्यासोबतच वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होतो. 

लिंबू

रोज लिंबाचा रस गरम पाण्यात मिश्रित करून सेवन केल्यानेही रक्त शुद्ध होतं. यातील मिनरल्स आणि व्हिटॅमिन शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच याने आपल्या किडनीचं आरोग्यही चांगलं राहतं.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, मेथी, सोया, इत्यादींमध्ये क्लोरोफिल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आढळतात. याने रक्त शुद्ध ठेवण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर यातील एन्जाइम्सम लिव्हरला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

गाजर 

गाजर खाल्ल्याने रक्त शुद्ध राहतं आणि त्वचेवरही चमक येते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, फायबर, बायोटिन, व्हिटॅमिन सी, मॅगनीज, फॉस्फोरस सारखे पोषक तत्व असतात. याने रक्त शुद्ध करण्यास मदत मिळते.

ताजी फळं

ताजी फळं जसे की, सफरचंद, आलूबुखारा, पेरू या फळांमध्ये Pectin Fibre असतं. याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यासोबतच स्ट्रॉबेरी आणि जांभळं सुद्धा लिव्हरला शरीर डीटॉक्स करण्यास मदत करतात.

बीट 

बिटात नायट्रेट आणि अनेकप्रकारचे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. एका रिसर्चनुसार असं सांगण्यात आलं की, बिटाचा ज्यूस सेवन केल्याने बॉडी डीटॉक्स करण्यास मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि लिव्हरही निरोगी राहतं. 

गूळ

गूळ हा रक्त शुद्ध करण्याचा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय मानला जातो. गुळात असलेलं आयर्न रक्तातील हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. सोबतच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात. याने शरीरातील Clotted Blood ही बाहेर निघतं.

हळद

हळद हे फार चांगलं अ‍ॅंटी-बायोटिक मानलं जातं. याचं सेवन केल्याने रक्ताच्या धमण्यांमध्ये सूज येत नाही आणि त्यात चरबीही जमा होत नाही. दुधात हळद टाकून प्यायल्यास रक्त शुद्ध होतं. त्यामुळे हळदीचा आहारात समावेश करावा.

पाणी

पाणी सुद्धा एक नॅच्युरल ब्लड प्युरिफायर आहे. आपली किडनी मूत्राद्वारे शरीरातील विषारी पदार्त बाहेर काढते. यात पाण्याची महत्वाची भूमिका असते. आयुर्वेदानुसार, रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य