शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

​हिवाळ्यात हे खा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 15:34 IST

हिवाळ्याला सुरूवात होताच आपण थंडीपासून बचावासाठी स्वेटर, गरम कपडे, शॉल आदी साहित्यांचा वापर करतो. यामुळे शरीराच्या बाह्य अवयवांचे तर संरक्षण होते, मात्र शरीराच्या आतील भागांना ऊर्जा मिळण्यासाठी विचार करायला हवा.

-Ravindra Moreहिवाळ्याला सुरूवात होताच आपण थंडीपासून बचावासाठी स्वेटर, गरम कपडे, शॉल आदी साहित्यांचा वापर करतो. यामुळे शरीराच्या बाह्य अवयवांचे तर संरक्षण होते, मात्र शरीराच्या आतील भागांना ऊर्जा मिळण्यासाठी विचार करायला हवा. बऱ्याचजणांना हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा जास्त त्रास होतो.  मग या त्रासापासून वाचण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश असावा याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया...संत्रीरसदार संत्र्यात पोषक घटक भरपूर आहेत. संत्रे रुचकर आणि पौष्टिक आहे. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि कॅल्शियम भरपूर असते. शिवाय सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, सल्फर आणि क्लोरिन असते. संत्र्यावरच्या आवरणात सर्वांत जास्त कॅल्शियम असते. म्हणूनच संत्र्याचे सेवन सालासकट करायला पाहिजे. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेट व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातल्या रक्ताला क्षारमय बनवते आणि विकारांना दूर करते, तसेच थंडीशी लढायला ऊर्जादेखील मिळते. पालकया ऋतूत पालक सहज मिळतो, यामुळे याचे सेवन करणे टाळू नका. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठीचे घटक म्हणजेच लोह आणि पौष्टिक तत्त्वे यात भरपूर प्रमाणात आहेत. शेंगदाणेशरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आवश्यक घटक जसे न्यूट्रियन्टस, मिनरल, अ‍ॅण्टी-आॅक्सिडेंट आदी घटक शेंगदाण्यामध्ये आढळतात. थंडीत शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळून शरीर गरम राहते.  शिवाय प्रोटिन्सदेखील मिळतात. थंडीतील खोकल्यावर शेंगदाण्याचे सेवन फायदेशीर असून, फुफ्फुसाला बळ मिळते. थंडीत तळलेले, मीठ लावलेले किंवा साधे शेंगदाणे भरपूर खा. बाजारात मिळणारी चिक्की या दिवसात नेहमी सोबतच ठेवावी. पेरुथंडीत ह्रदयाची शक्ती वाढविण्यासाठी पेरुचे सेवन अत्यावश्यक आहे.  यास ‘जाम’ किंवा ’अमरूद’ असेही म्हटले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर ‘क’ जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या ‘व्हायरस’पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यत: मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकड्यात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही. कारण त्यातील ‘क' जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.गाजर गाजरामध्ये विटॅमिन ए, बी, सी, डी, ई आणि के भरपूर प्रमाणात असल्याने ते थंडीपासून लढण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात.किवीया फळात विटॅमिन ‘सी’चे प्रमाण भरपूर आहे, जे थंडीत खूप फायदेशीर आहे. शिवाय यातील पोषक तत्त्वांमुळे शरीरातील घातक जिवाणूदेखील नष्ट होतात. कॉफीकॉफीतील फ्लेवनॉइड घटकामुळे ह्रदयाचे कार्य चांगले चालते आणि त्यामुळे सर्दीचा त्रास होत नाही, शिवाय शरीराला गरमीदेखील मिळते. सुकामेवा सुकामेव्यातील पोषक तत्त्वांमुळे शरीराला आतून ऊर्जा मिळते त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. यासाठी आपल्या सोबत विविध प्रकारच्या सुकामेवांचे मिश्रण बनवून ठेवा आणि त्याला दिवसातून काही तासांच्या फरकाने खावे. सफरचंदहिवाळ्यात सफरचंद भरपूर उपलब्ध असतात. विशेष म्हणजे सफरचंदामधील तत्त्वांमुळे कॅन्सर तसेच अन्य कित्येक आजारांपासून मुक्ती मिळते. सफरचंदातील अ‍ॅन्टी-आॅक्सिडेंट आणि प्रोटिन्समुळे शरीराला मजबूती मिळते.