शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 16:35 IST

संपूर्ण भारतामध्ये डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यात फक्त 6 दिवसांत आतापर्यंत 169 नवीन रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपूर्ण भारतामध्ये डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यात फक्त 6 दिवसांत आतापर्यंत 169 नवीन रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, रूग्णांच्या संख्येत तासागणिक वाढ होत असून यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.  सुरुवातीला सामान्य वाटणारा हा आजार दुर्लक्ष केल्यामुळे किंवा चुकीचे उपचार घेतल्यामुळे जीवघेणा ठरू शकतो. डेंग्यू पावसाळ्यामध्ये आणि त्यानंतरच्या महिन्यामध्ये म्हणजेच जुलै आणि ऑक्टोबरदरम्यान सर्वात जास्त पसरतो. कारण डेंग्यू हा डासांमुळे होणारा रोग असून या वातावरणात डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचं डासांपासून रक्षण करणं गरजेचं असतं. जर कोणालाही डेंग्यू झाला तर घाबरून जाऊ नका, योग्य ते उपचार आणि काही घरगुती उपचारांनी तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. 

एडीज इजिप्टी डासाच्या चावल्याने जवळपास 3 ते 5 दिवसांनंतर रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणं दिसू लागतात. साधारणतः डेंग्यूची लक्षणं थंडी वाजल्यानंतर अचानक ताप येणं, डोकं, शरीराचे स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होणं, डोळे दुखणं, अशक्तपणा येणं, भूक न लागणं आणि तोंडाला चव नसणं यांसारखी असतात. 

पपईच्या पानांचा रस डेंग्यूच्या तापाचा कालावधी कमी करतो. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्सची संख्या वाढवतं. डेंग्यूचा ताप कन्फर्म होण्याआधीपासूनच पपईच्या पानांचा पस रूग्णाला देणं फायदेशीर ठरतं. कारण  याचा कोणताही साइड-इफेक्ट नाही.

डेंग्युवर बकरीचं दूधही परिणामकारक ठरतं. आयुर्वेदाच्या अनेक पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे की, बकरीचं दूध डेंग्यूचा ताप नाहीसं करण्यात फायदेशीर ठरतं. 

जेवणामध्ये हळदीचा वापर करणं फायदेशीर ठरतं. सकाळी अर्धा चमचा हळद पाण्यासोबत आणि रात्री हळदीचं एक ग्लास दूध प्यायल्याने फायदा होतो. हळदीमध्ये अॅन्टी-ऑक्सिंडंट मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतात. 

8 ते 10 तुळशीच्या पानांचा रस मधासोबत मिक्स करून घ्या किंवा तुळशीचा 10 पानं एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 2 काळी मिरी पावडर आणि आलं टाकून पुन्हा उकळून घ्या. हा तयार झालेला काढा सकाळी आणि संध्याकाळी घ्या. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आजार दूर होतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य