शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 16:35 IST

संपूर्ण भारतामध्ये डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यात फक्त 6 दिवसांत आतापर्यंत 169 नवीन रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपूर्ण भारतामध्ये डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यात फक्त 6 दिवसांत आतापर्यंत 169 नवीन रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, रूग्णांच्या संख्येत तासागणिक वाढ होत असून यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.  सुरुवातीला सामान्य वाटणारा हा आजार दुर्लक्ष केल्यामुळे किंवा चुकीचे उपचार घेतल्यामुळे जीवघेणा ठरू शकतो. डेंग्यू पावसाळ्यामध्ये आणि त्यानंतरच्या महिन्यामध्ये म्हणजेच जुलै आणि ऑक्टोबरदरम्यान सर्वात जास्त पसरतो. कारण डेंग्यू हा डासांमुळे होणारा रोग असून या वातावरणात डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचं डासांपासून रक्षण करणं गरजेचं असतं. जर कोणालाही डेंग्यू झाला तर घाबरून जाऊ नका, योग्य ते उपचार आणि काही घरगुती उपचारांनी तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. 

एडीज इजिप्टी डासाच्या चावल्याने जवळपास 3 ते 5 दिवसांनंतर रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणं दिसू लागतात. साधारणतः डेंग्यूची लक्षणं थंडी वाजल्यानंतर अचानक ताप येणं, डोकं, शरीराचे स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होणं, डोळे दुखणं, अशक्तपणा येणं, भूक न लागणं आणि तोंडाला चव नसणं यांसारखी असतात. 

पपईच्या पानांचा रस डेंग्यूच्या तापाचा कालावधी कमी करतो. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्सची संख्या वाढवतं. डेंग्यूचा ताप कन्फर्म होण्याआधीपासूनच पपईच्या पानांचा पस रूग्णाला देणं फायदेशीर ठरतं. कारण  याचा कोणताही साइड-इफेक्ट नाही.

डेंग्युवर बकरीचं दूधही परिणामकारक ठरतं. आयुर्वेदाच्या अनेक पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे की, बकरीचं दूध डेंग्यूचा ताप नाहीसं करण्यात फायदेशीर ठरतं. 

जेवणामध्ये हळदीचा वापर करणं फायदेशीर ठरतं. सकाळी अर्धा चमचा हळद पाण्यासोबत आणि रात्री हळदीचं एक ग्लास दूध प्यायल्याने फायदा होतो. हळदीमध्ये अॅन्टी-ऑक्सिंडंट मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतात. 

8 ते 10 तुळशीच्या पानांचा रस मधासोबत मिक्स करून घ्या किंवा तुळशीचा 10 पानं एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 2 काळी मिरी पावडर आणि आलं टाकून पुन्हा उकळून घ्या. हा तयार झालेला काढा सकाळी आणि संध्याकाळी घ्या. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आजार दूर होतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य