शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

पिण्याच्या पाण्याची एक्स्पायरी डेट असते?; आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर 'हे' ठेवा लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:42 IST

पाण्याला एक्स्पायरी डेट असते का?, जर असेल तर ती साधारण किती दिवसांची असते?, पाणी खराब होतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. सध्या सर्वत्र पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात.

पाण्याला एक्स्पायरी डेट असते का?, जर असेल तर ती साधारण किती दिवसांची असते?, पाणी खराब होतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. सध्या सर्वत्र पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. शहरापासून गावापर्यंत पाणी बाटल्यांमध्ये भरून विकलं जातं आणि पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेटही लिहिलेली असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याला एक्सपायरी डेट नसते. अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केलं जातं.

पाणी खराब होऊ शकतं. त्यामुळे ते स्वच्छ केलं जातं. पाण्याच्या बाटल्यांवर लिहिलेली एक्स्पायरी डेट ही पाण्याची नसून पाण्याच्या बाटल्यांची एक्स्पायरी डेट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाण्याच्या बाटल्या या प्लास्टिकच्या असतात आणि ठराविक वेळेनंतर प्लास्टिक हळूहळू पाण्यात विरघळू लागतं.

कालांतराने, मायक्रोप्लास्टिक्स बाटलीमध्ये जाऊ शकतात किंवा बाटलीचं प्लास्टिक कमकुवत होऊ शकतं. त्यामुळे बाटलीच्या वापरावर मर्यादा असतात. पाण्यात बॅक्टेरिया किंवा केमिकल्स मिक्स झाल्यास ते अशुद्ध, खराब होऊ शकतं. परंतु शुद्ध पाणी नेहमीच पिण्यायोग्य असतं. त्यामुळे पाण्याची एक्सपायरी डेट नाही असा याचा स्पष्ट अर्थ आहे. 

बाटलीबंद पाणी प्यायल्यास एक्सपायरी डेट असते हे लक्षात ठेवा. पाणी सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी, बाटलीची नीट तपासणी करा आणि कोणतंही नुकसान दिसत असल्यास ते पाणी पिऊ नका. तरीही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पाणी हे एका अणूपासून (H2O) बनलेलं आहे जे अत्यंत स्थिर आहे.

सामान्य आणि चांगल्या परिस्थितीत, पाण्यावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही आणि या स्थितीत कोणतेही बॅक्टेरिया किंवा इतर सूक्ष्मजीव त्यात वाढू शकत नाहीत. परंतु जर कोणत्याही प्रकारची अशुद्धता पाण्यात मिसळली असेल, जसं की बॅक्टेरिया किंवा केमिकल्स तर ते खराब होऊ शकतात. परंतु शुद्ध पाणी नेहमीच पिण्यायोग्य राहते आणि त्याची एक्सपायरी डेट नसते. 

टॅग्स :WaterपाणीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य