शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पिण्याच्या पाण्याची एक्स्पायरी डेट असते?; आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर 'हे' ठेवा लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:42 IST

पाण्याला एक्स्पायरी डेट असते का?, जर असेल तर ती साधारण किती दिवसांची असते?, पाणी खराब होतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. सध्या सर्वत्र पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात.

पाण्याला एक्स्पायरी डेट असते का?, जर असेल तर ती साधारण किती दिवसांची असते?, पाणी खराब होतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. सध्या सर्वत्र पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. शहरापासून गावापर्यंत पाणी बाटल्यांमध्ये भरून विकलं जातं आणि पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेटही लिहिलेली असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याला एक्सपायरी डेट नसते. अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केलं जातं.

पाणी खराब होऊ शकतं. त्यामुळे ते स्वच्छ केलं जातं. पाण्याच्या बाटल्यांवर लिहिलेली एक्स्पायरी डेट ही पाण्याची नसून पाण्याच्या बाटल्यांची एक्स्पायरी डेट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाण्याच्या बाटल्या या प्लास्टिकच्या असतात आणि ठराविक वेळेनंतर प्लास्टिक हळूहळू पाण्यात विरघळू लागतं.

कालांतराने, मायक्रोप्लास्टिक्स बाटलीमध्ये जाऊ शकतात किंवा बाटलीचं प्लास्टिक कमकुवत होऊ शकतं. त्यामुळे बाटलीच्या वापरावर मर्यादा असतात. पाण्यात बॅक्टेरिया किंवा केमिकल्स मिक्स झाल्यास ते अशुद्ध, खराब होऊ शकतं. परंतु शुद्ध पाणी नेहमीच पिण्यायोग्य असतं. त्यामुळे पाण्याची एक्सपायरी डेट नाही असा याचा स्पष्ट अर्थ आहे. 

बाटलीबंद पाणी प्यायल्यास एक्सपायरी डेट असते हे लक्षात ठेवा. पाणी सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी, बाटलीची नीट तपासणी करा आणि कोणतंही नुकसान दिसत असल्यास ते पाणी पिऊ नका. तरीही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पाणी हे एका अणूपासून (H2O) बनलेलं आहे जे अत्यंत स्थिर आहे.

सामान्य आणि चांगल्या परिस्थितीत, पाण्यावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही आणि या स्थितीत कोणतेही बॅक्टेरिया किंवा इतर सूक्ष्मजीव त्यात वाढू शकत नाहीत. परंतु जर कोणत्याही प्रकारची अशुद्धता पाण्यात मिसळली असेल, जसं की बॅक्टेरिया किंवा केमिकल्स तर ते खराब होऊ शकतात. परंतु शुद्ध पाणी नेहमीच पिण्यायोग्य राहते आणि त्याची एक्सपायरी डेट नसते. 

टॅग्स :WaterपाणीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य