शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

वजन कमी करायचंय? जेवणाआधी लावा 'ही' एक छोटीशी सवय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 10:26 IST

वाढलेलं वजन ही अलिकडे अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. मग काय एकापेक्षा एक वेगवेगळे उपाय हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी केले जातात.

(Image Credit : www.healthline.com)

वाढलेलं वजन ही अलिकडे अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. मग काय एकापेक्षा एक वेगवेगळे उपाय हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी केले जातात. इतकच नाही तर यासाठी भरमसाठ पैसाही खर्च केला जातो. पण वजन अनेकांना हे माहीत नसतं की, वजन कमी करण्यासाठी पैशांची नाही तर योग्य ट्रिकची गरज आहे. अशीच एक ट्रिक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. म्हणजे जेवणाआधीची तुमची एक छोटीशी सवय तुम्हाला केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे याने आपल्या शरीराला कोणतंही नुकसान होणार नाही. 

वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. पण त्याचा फायदा होतोच असे नाही. अनेकदा खूप पैसा खर्च करुनही हवा तो परिणाम बघायला मिळत नाही. पण पैसे खर्च न करताही वजन कमी करता येऊ शकतं, हे अनेक रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. त्यासाठी केवळ तुम्हाला योग्य पद्धतींचा वापर करावा लागणार आहे. 

काय करावे?

अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट इलाना मुरस्टाइननुसार, जेवणाआधी साधारण एक ग्लास पाणी प्यायल्याने तुम्ही फिट राहू शकता. इलानानुसार काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जेवणाआधी पाणी प्यायल्याने प्रमाणापेक्षा जास्त पदार्थ खाल्ले जात नाहीत. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

(Image Credit : gulp.ie)

खरंतर अनेकजण तहान लागण्याकडे भूकेच्या दृष्टीकोनातून बघतात. अशावेळी जेवण करताना पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं, जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे जेवणाआधी एक ग्लास पाणी पिणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. 

आयुर्वेदातही याचा उल्लेख

भारतीय आयुर्वेदात जेवणाआधी आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे शरीरासाठी चांगलं नसल्याचं सांगितलं गेलं आहे. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, असे केल्याने व्यक्तीची पचनक्रिया कमजोर होऊ शकते. पण याजागी जेवण करताना मधे पाणी पिणे योग्य सांगण्यात आलं आहे. 

आयुर्वेदानुसार, जेवण करताना मधून मधून एक-एक घोट पाणी प्यायला हवं. याने पदार्थ आणकी मुलायम होतो आणि ते पोटात पचन्यासाठीही सोपं जातं. सोबतच या पद्धतीने व्यक्ती जास्त जेवण करण्यापासूनही बचावतो. इतकेच नाही तर जास्त तेलकट किंवा मसालेदार भाज्या खाल्ल्या असतील तर यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांनाही रोखता येऊ शकतं. 

कसं असावं पाणी?

फार जास्त थंड किंवा फार जास्त गरम पाणी पिणे टाळावे, शरीरासाठी सामान्य तापमान असलेलं पाणी पिणे अधिक फायद्याचं असतं. याने तेल कमी केलं जातं आणि पदार्थ पचन्यासही मदत होते. इतकेच नाही तर याने फॅट बर्न होण्यासही मदत होते. जेवण केल्यावर लगेच ढसाढसा पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स