शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

दुर्लक्ष करणं 'असं' येईल अंगाशी, गंभीर आजारांचं कारण ठरतेय थंड पाणी पिण्याची सवय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 11:47 IST

उर्जा देण्यासाठी, व्यायाम केल्यानंतर शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी थंड पाणी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया थंड पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल  होतात.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे प्रत्येकजण थंड पाणी पितो. थंड पाणी प्यायल्यामुळे  शरीरातील उष्णता कमी होते. असं तुम्हाला वाटत असेल तर  फायद्यांबरोबरच थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. उर्जा देण्यासाठी, व्यायाम केल्यानंतर शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी थंड पाणी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया थंड पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल  होतात.

सर्दी- खोकला

फ्रिजचं पाणी हे नैसर्गिकरित्या नाहीतर कृत्रिमरित्या थंड होतं. जे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक्षमतेला नुकसानकारक असतं. फ्रिजमधलं थंड पाणी वारंवार प्यायल्याने छातीत कफ जमा होतो, परिणमी आपल्याला लगेच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.  

वजन कमी होत नाही

जर तुम्हाला बारिक व्हायचं असेल तर थंड पाणी पिणं योग्य नाही. कारण गरम पाणी किंवा माठातल्या पाण्याचं सतत सेवन केल्याने तुम्ही वजन कमी  करू शकता. वजन कमी न होणं. तज्ज्ञांनुसार फ्रिजमधील थंड पाणी प्यायलाने आपल्या शरीरात साचलेलं फॅट अजूनच कडक होतं. ज्यामुळे फॅट बर्न करण्यास समस्या निर्माण होते.

हृदयासाठी घातक

थंड पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील हार्ट रेट म्हणजेच हृदयाची धडधड कमी वेगाने होते. जे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही. खरंतर या नर्व्हला आपल्या शरीरातील सर्वात लांब म्हणजे कार्निवल नर्व्ह असंही म्हणतात. जी आपल्या मानेपासून हृदय, फुफुस्स आणि पचनसंस्था कंट्रोल करते. म्हणून थंड पाणी प्यायल्याने हद्यावर नकारात्मक परिणाम पडून हृद्यासंबंधी वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.

पोट साफ होण्यास त्रास

थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती मंदावते. तसंच आतड्या आकुंचन पावतात. जेवण नीट पचन नाही त्यामुळे पोट साफ होण्याची समस्या उद्भवते. त्यासाठी शक्यतो गरम किंवा माठातलं पाणी प्या. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य