शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

जेवण केल्यावर लगेच थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात; वाचा तोटे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 10:16 IST

वातावरण गरम असेल तर थंड पाणी पिणे अनेकांना चांगलं आणि थंडावा देणारं वाटतं. पण जेवण झाल्यावर थंड पाणी पिण्याचे अनेक गंभीर नुकसान आहेत.

वातावरण गरम असेल तर थंड पाणी पिणे अनेकांना चांगलं आणि थंडावा देणारं वाटतं. पण जेवण झाल्यावर थंड पाणी पिण्याचे अनेक गंभीर नुकसान आहेत. याचा प्रभाव थेट तुमच्या पचनक्रियेवर पडू शकतो. आणि यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, जेवण केल्यावर पाणी पिणे गरजेचे आहे. पण त्यांना हे माहीत नसतं पाणी साधं प्यावं कि थंड.

जेवण केल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने पित्ताशयासाठी फारच धोकादायक आहे. आपल्या शरीराचं सामान्य तापमान ९८.६ डिग्री फॅरेनहाइट म्हणजे ३७ डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे आपल्या शरीरासाठी २०-२२ डिग्री सेल्सिअस तापमान असलेलं पाणी फायदेशीर ठरतं. पण त्यापेक्षा थंड पाणी हानिकारक आहे. 

जेव्हाही थंड पाणी सेवन केलं जातं तेव्हा ते गिळायला जरा वेळ लागतो. कारण आधी पाणी तोंडातच राहतं आणि त्याचं तापमान सामान्य झाल्यावर ते घशाखाली उतरतं. जास्त थंड पाणी प्यायल्याने टॉन्सिल्सची समस्याही होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊ जेवण केल्यावर थंड पाणी पिण्याचे नुकसान...

पोटासंबंधी समस्या

थंड पाणी प्यायल्याने शरीरात तयार होणाऱ्या पचन रसाचं तापमानही कमी होतं. त्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होण्यास अडचण येते. तसेच थंड पाणी प्यायल्याने पोटाच्या आतड्याही आकुंचन पावतात. हे पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होण्याचं मुख्य कारण असू शकतं. ज्या लोकांना पोटाच्या समस्या नेहमी होतात त्यांनी थंड पाणी सेवन करु नये.

हार्ट अटॅकचा धोका

काही लोकांना सवय असते की, जेवण केल्यावर ते लगेच थंड पाणी पितात. पण ही सवय तुमच्या हृदयासाठी हानिकारक होऊ शकते. हार्ट अटॅक आणि पाण्याचा जवळचा संबंध आहे. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या एका समूहाने चीन आणि जपानमधील लोकांवर हा रिसर्च केला होता. चीन आणि जपानमधील लोक जेवण केल्यावर थंड पाणी पित नाहीत. हे लोक जेवण केल्यावर गरम चहा घेतात. अभ्यासकांना आढळलं की, या लोकांमध्ये हार्ट अटॅकची समस्या फारच कमी आहे. 

फॅट तयार होतं

तज्ज्ञांनुसार, जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया हळुवार होते. पचनक्रिया कमी झाल्याने पोटाची समस्या होऊ शकते. त्यासोबतच जेव्हा हे पाणी पदार्थांसोबत पोटातील अॅसिडच्या संपर्कात येतं तेव्हा ते फॅटमध्ये रुपांतरित होतं. याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 

कफ होण्याची समस्या

जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने शरीरात कफ तयार होतो. जेव्हा शरीरात जास्त कफ तयार होतो तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि याच कारणाने सर्दी-खोकला वाढतो. त्यामुळे जेवण केल्यावर थंड पाणी सेवन करु नये. थोडं साधं पाणी प्यायल्यास समस्या होणार नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य