शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

जेवण केल्यावर लगेच थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात; वाचा तोटे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 10:16 IST

वातावरण गरम असेल तर थंड पाणी पिणे अनेकांना चांगलं आणि थंडावा देणारं वाटतं. पण जेवण झाल्यावर थंड पाणी पिण्याचे अनेक गंभीर नुकसान आहेत.

वातावरण गरम असेल तर थंड पाणी पिणे अनेकांना चांगलं आणि थंडावा देणारं वाटतं. पण जेवण झाल्यावर थंड पाणी पिण्याचे अनेक गंभीर नुकसान आहेत. याचा प्रभाव थेट तुमच्या पचनक्रियेवर पडू शकतो. आणि यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, जेवण केल्यावर पाणी पिणे गरजेचे आहे. पण त्यांना हे माहीत नसतं पाणी साधं प्यावं कि थंड.

जेवण केल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने पित्ताशयासाठी फारच धोकादायक आहे. आपल्या शरीराचं सामान्य तापमान ९८.६ डिग्री फॅरेनहाइट म्हणजे ३७ डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे आपल्या शरीरासाठी २०-२२ डिग्री सेल्सिअस तापमान असलेलं पाणी फायदेशीर ठरतं. पण त्यापेक्षा थंड पाणी हानिकारक आहे. 

जेव्हाही थंड पाणी सेवन केलं जातं तेव्हा ते गिळायला जरा वेळ लागतो. कारण आधी पाणी तोंडातच राहतं आणि त्याचं तापमान सामान्य झाल्यावर ते घशाखाली उतरतं. जास्त थंड पाणी प्यायल्याने टॉन्सिल्सची समस्याही होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊ जेवण केल्यावर थंड पाणी पिण्याचे नुकसान...

पोटासंबंधी समस्या

थंड पाणी प्यायल्याने शरीरात तयार होणाऱ्या पचन रसाचं तापमानही कमी होतं. त्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होण्यास अडचण येते. तसेच थंड पाणी प्यायल्याने पोटाच्या आतड्याही आकुंचन पावतात. हे पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होण्याचं मुख्य कारण असू शकतं. ज्या लोकांना पोटाच्या समस्या नेहमी होतात त्यांनी थंड पाणी सेवन करु नये.

हार्ट अटॅकचा धोका

काही लोकांना सवय असते की, जेवण केल्यावर ते लगेच थंड पाणी पितात. पण ही सवय तुमच्या हृदयासाठी हानिकारक होऊ शकते. हार्ट अटॅक आणि पाण्याचा जवळचा संबंध आहे. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या एका समूहाने चीन आणि जपानमधील लोकांवर हा रिसर्च केला होता. चीन आणि जपानमधील लोक जेवण केल्यावर थंड पाणी पित नाहीत. हे लोक जेवण केल्यावर गरम चहा घेतात. अभ्यासकांना आढळलं की, या लोकांमध्ये हार्ट अटॅकची समस्या फारच कमी आहे. 

फॅट तयार होतं

तज्ज्ञांनुसार, जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया हळुवार होते. पचनक्रिया कमी झाल्याने पोटाची समस्या होऊ शकते. त्यासोबतच जेव्हा हे पाणी पदार्थांसोबत पोटातील अॅसिडच्या संपर्कात येतं तेव्हा ते फॅटमध्ये रुपांतरित होतं. याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 

कफ होण्याची समस्या

जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने शरीरात कफ तयार होतो. जेव्हा शरीरात जास्त कफ तयार होतो तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि याच कारणाने सर्दी-खोकला वाढतो. त्यामुळे जेवण केल्यावर थंड पाणी सेवन करु नये. थोडं साधं पाणी प्यायल्यास समस्या होणार नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य