शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आहारात पाच ग्रॅमपेक्षा अधिक मिठाचा समावेश नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:34 IST

भारतात हृदयविकाराचा त्रास असलेल्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली...

पुणे : गेल्या ५ वर्षांमध्ये भारतात हृदयविकाराचा त्रास असलेल्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. बदलत्या जीवनशैलीप्रमाणेच चुकीच्या आहारपध्दतीमुळे कमी वयात उच्च रक्तदाब, मधुमेह यांसह हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. हृदयविकार दूर ठेवायचा असेल तर साखर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन नियंत्रित असावे आणि दररोज पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. भारतीय लोक दररोज ९ ते १२ ग्रॅमपर्यंत मिठाचे सेवन करत असल्याने हृदयरोगाला लवकर आमंत्रण मिळत आहे.

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख रक्तवाहिन्यांपैकी एखाद्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास रक्तप्रवाह खंडित होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. अडथळ्याच्या तीव्रतेनुसार हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता ठरते. बरेचदा रक्तवाहिन्यांमध्ये चीर पडून रक्ताची गुठळी तयार झाल्याने अचानकपणे हृदयविकाराचा झटका येतो. छातीत दुखणे, अचानक घाम येणे, थकवा येणे, चालताना दम लागणे ही हृदयविकाराची काही लक्षणे असून त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन पत्की यांनी केले आहे.

ही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा :

हृदय किंवा जबड्यातील वेदना

बसल्या ठिकाणी घाम येणे

धाप लागणे, चक्कर, येणे

हाता-पायाला मुंग्या येणे

छातीत दुखणे

थकवा येणे

काय काळजी घ्याल?

- वयाच्या ३० व्या वर्षापासून नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी.

- साखर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.

- आहारात दररोज पाच ग्रॅमपेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये.

- फास्ट फूडचे अतिसेवन टाळावे.

- आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे दररोज अर्धा ते एक तास व्यायाम करावा.

- मद्यपान, धूम्रपान टाळावे.

भारतामध्ये विशेषत: शहरी भागात हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पन्नाशीनंतर उद्भवणारा आजार आता तिशीच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे. जीवनशैलीतील बदल, चुकीच्या सवयी, मद्यपान, धूम्रपानासारखी व्यसने, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहारविहार अशा विविध कारणांमुळे हृदयविकार कधी आपल्याला कवेत घेईल, याचा अंदाजही बांधता येत नाही. त्यामुळेच आपले हृदय जपणे, दररोजच्या सवयी बदलणे आवश्यक आहे.

- डॉ. अमोल नारखेडे, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजना