शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

गव्हामुळे केस गळतात का? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 10:36 IST

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्हा चर्चेत आहे.

डॉ. रचिता धुरत, त्वचारोग विभागप्रमुख, सायन रुग्णालय

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्हा चर्चेत आहे. जिल्ह्यातील काही गावांमधील लोकांचे केस अचानक  गळायला लागले. या वृत्ताला देशपातळीवर प्रसिद्धी मिळाली. संशोधकांचे पथक गावांमध्ये पोहोचले. पंजाब आणि हरयाणा येथील गहू  रेशनिंग स्वरूपाने बुलढाणा जिल्ह्यांतील काही गावांमध्ये वितरित केला गेला. त्यातील सेलेनियम या खनिजाच्या अतिप्रमाणामुळे केसगळती  झाल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झाले. 

सेलेनियम हा पाण्यात आणि अन्य काही पदार्थांमध्ये आढळणारा घटक असून, त्यामुळे निश्चितच तो अतिरिक्त प्रमाणात आढळल्याने केसाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्याचा थेट परिणाम म्हणजे केस गळणे हा होय. त्यामुळे केसाच्या वाढीवर परिणाम होतो. यामुळे केस हळूहळू गळू लागतात. मात्र, काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. ते म्हणजे हा गहू ज्या सर्व ठिकाणी गेला आहे, त्यांचेसुद्धा केस गळाले आहेत का? हे पाहणे गरजेचे आहे. 

त्याबरोबरच जिथे हा केसगळतीचा प्रश्न उपस्थित झाला तिथेच मूतखड्याचेही प्रमाण  वाढीस लागल्याचे आढळून आले. सेलेनियम खनिजाचा हा प्रभाव होता, हे यातून स्पष्ट झाले. 

गळतीचे दोन प्रकार

जिथे सेलेनियमची बाधा झाली तेथील पाण्यात क्षार, शिसे आढळून येते.  बुलढाणाच्या रुग्णांमध्ये कसे केस गळालेत ते पाहणे गरजेचे आहे. 

केस गळतीतही काही प्रकार आहेत. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. ॲनाजेन इफ्लुव्हियम आणि टेलोजन इफ्लुव्हियम. ॲनाजेन इफ्लुव्हियममध्ये केस वाढीच्या अवस्थेत केस गळून पडतात. केसांचा पुंजका निघून काही दिवसांत टक्कल पडते. तर टेलोजन इफ्लुव्हियम ताणतणाव, हॉर्मोन्स बदल किंवा टप्प्याटप्प्याने केस गळतात. 

केस पुन्हा येतात 

सेलेनियममुळे केसगळती झाली असली आणि पूर्णपणे टक्कल पडले असले तरी नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी सेलेनियम स्रोत आहे हे कळून आले असेल त्या गोष्टी बंद करणे गरजेचे आहे. कालांतराने तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्णपणे केस येतात. त्यासाठी विषारीपण असलेले कोणतेही खाद्यपदार्थ आणि पाणी पिऊ नये किंवा त्याचा वापर करू नये. 

केसगळती थांबविण्याकरिता पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे असणारा आहार घ्यावा. सोबत ताणतणाव कमी करत योग आणि व्यायाम करावा.

विषाक्तता हे कारण आहे का? 

सेलिनिअमसोबत अन्य काही हानिकारक खनिजेसुद्धा या ठिकाणच्या पाण्यात आढळून आली आहेत. त्यामुळे गव्हातील सेलिनिअम आणि पाण्यात आढळून येणाऱ्या अन्य धातूंमुळे केसगळती झाली आहे का, हे तपासणेसुद्धा गरजेचे आहे. त्यासोबत ज्या पाण्याने भाज्या धुतल्या जातात त्यामध्येसुद्धा सेलिनिअम, क्षार जात आहेत का हेसुद्धा बघितले पाहिजे. मानवाचा थेट संबंध असलेल्या कुठल्याही पदार्थातील विषारीपण हे केसाच्या आरोग्याला हानिकारकच आहे. 

त्यासोबत जंतुनाशके कोणत्या प्रकारची किती प्रमाणात वापरली आहेत त्याचा खाद्यपदार्थांवर थेट काही परिणाम होतो याचा उलगडा होणे आवश्यक आहे. 

केसगळतीची सर्वसाधारण कारणे?

प्रदूषण, भेसळयुक्त खाद्यपदार्थ, पाण्यातील विषारीपण, काही वेळा आनुवंशिक, असंतुलित हार्मोन्स, जीवनसत्त्वाची कमतरता, ऑटोइम्युन आजार.   

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स