शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

जेवण केल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता का? जाणून घ्या फायदे आणि आयुर्वेदिक महत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 11:11 IST

धातू शरिरासाठी कसे फायदेशीर हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यात तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध मानलं जातं. आयुर्वेदातही याला फार महत्व देण्यात आलंय.

कोरोना महामारीपासून लोक आरोग्याची काळजी घेण्याबाबत फारच जागरूक झालेले दिसतात. जास्तीत जास्त लोक आहाराबाबत, फिटनेसबाबत काळजी घेताना दिसतात. पाणी पिण्यापासून ते झोपण्या-उठण्याच्या सवयीही लोक बदलत आहेत. यातील एक चांगली सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं.

धातू शरिरासाठी कसे फायदेशीर हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यात तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध मानलं जातं. आयुर्वेदातही याला फार महत्व देण्यात आलंय. यातील पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. केवळ आयुर्वेदातच नाही तर याला सायन्सनेही फायद्याचं मानलं आहे. चला जाणून घेऊया तांब्याच्या भांड्याचे फायदे…..

बॅक्टेरियांपासून बचाव

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. याने शरीरातील तांब्याची कमतरता पूर्ण होते. याने रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित राहतं.

अनेक आजारांचा धोका टाळतो

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अधिक शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट करतं.

वेदना, वात, सूज कमी होते

तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.

कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात. 

पोटदुखी, गॅस दूर होतो

पोटाच्या वेगवेगळे आजार पळवून लावण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे केल्यास तुमचा डॉक्टरकडे होणारा खर्च नक्कीच कमी होऊ शकतो. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

त्वचेसंबंधी समस्या होतात दूर

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे पिंपल्स तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि अधिक चमकदार होते.

बॉडी डिटॉक्स

शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.

किती ठेवावं पाणी आणि कधी प्यावं?

तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. जेवण केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने नुकसान होऊ शकतं. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनासंबंधी फायदा होतो. जर जेवण करून हे पाणी प्याल तर पचनाला समस्या होऊ शकते.

हे पाणी पिऊन फायदे मिळवायचे असतील तर पाणी तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवावं. 48 तास तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवू शकता. जास्त वेळ भांड्यात पाणी ठेवूनही ते शुद्धच राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य