शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

जेवण केल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता का? जाणून घ्या फायदे आणि आयुर्वेदिक महत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 11:11 IST

धातू शरिरासाठी कसे फायदेशीर हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यात तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध मानलं जातं. आयुर्वेदातही याला फार महत्व देण्यात आलंय.

कोरोना महामारीपासून लोक आरोग्याची काळजी घेण्याबाबत फारच जागरूक झालेले दिसतात. जास्तीत जास्त लोक आहाराबाबत, फिटनेसबाबत काळजी घेताना दिसतात. पाणी पिण्यापासून ते झोपण्या-उठण्याच्या सवयीही लोक बदलत आहेत. यातील एक चांगली सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं.

धातू शरिरासाठी कसे फायदेशीर हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यात तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध मानलं जातं. आयुर्वेदातही याला फार महत्व देण्यात आलंय. यातील पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. केवळ आयुर्वेदातच नाही तर याला सायन्सनेही फायद्याचं मानलं आहे. चला जाणून घेऊया तांब्याच्या भांड्याचे फायदे…..

बॅक्टेरियांपासून बचाव

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. याने शरीरातील तांब्याची कमतरता पूर्ण होते. याने रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित राहतं.

अनेक आजारांचा धोका टाळतो

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अधिक शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट करतं.

वेदना, वात, सूज कमी होते

तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.

कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात. 

पोटदुखी, गॅस दूर होतो

पोटाच्या वेगवेगळे आजार पळवून लावण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे केल्यास तुमचा डॉक्टरकडे होणारा खर्च नक्कीच कमी होऊ शकतो. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

त्वचेसंबंधी समस्या होतात दूर

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे पिंपल्स तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि अधिक चमकदार होते.

बॉडी डिटॉक्स

शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.

किती ठेवावं पाणी आणि कधी प्यावं?

तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. जेवण केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने नुकसान होऊ शकतं. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनासंबंधी फायदा होतो. जर जेवण करून हे पाणी प्याल तर पचनाला समस्या होऊ शकते.

हे पाणी पिऊन फायदे मिळवायचे असतील तर पाणी तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवावं. 48 तास तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवू शकता. जास्त वेळ भांड्यात पाणी ठेवूनही ते शुद्धच राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य