शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

जेवण केल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता का? जाणून घ्या फायदे आणि आयुर्वेदिक महत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 11:11 IST

धातू शरिरासाठी कसे फायदेशीर हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यात तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध मानलं जातं. आयुर्वेदातही याला फार महत्व देण्यात आलंय.

कोरोना महामारीपासून लोक आरोग्याची काळजी घेण्याबाबत फारच जागरूक झालेले दिसतात. जास्तीत जास्त लोक आहाराबाबत, फिटनेसबाबत काळजी घेताना दिसतात. पाणी पिण्यापासून ते झोपण्या-उठण्याच्या सवयीही लोक बदलत आहेत. यातील एक चांगली सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं.

धातू शरिरासाठी कसे फायदेशीर हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यात तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध मानलं जातं. आयुर्वेदातही याला फार महत्व देण्यात आलंय. यातील पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. केवळ आयुर्वेदातच नाही तर याला सायन्सनेही फायद्याचं मानलं आहे. चला जाणून घेऊया तांब्याच्या भांड्याचे फायदे…..

बॅक्टेरियांपासून बचाव

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. याने शरीरातील तांब्याची कमतरता पूर्ण होते. याने रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित राहतं.

अनेक आजारांचा धोका टाळतो

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अधिक शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट करतं.

वेदना, वात, सूज कमी होते

तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.

कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात. 

पोटदुखी, गॅस दूर होतो

पोटाच्या वेगवेगळे आजार पळवून लावण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे केल्यास तुमचा डॉक्टरकडे होणारा खर्च नक्कीच कमी होऊ शकतो. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

त्वचेसंबंधी समस्या होतात दूर

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे पिंपल्स तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि अधिक चमकदार होते.

बॉडी डिटॉक्स

शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.

किती ठेवावं पाणी आणि कधी प्यावं?

तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. जेवण केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने नुकसान होऊ शकतं. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनासंबंधी फायदा होतो. जर जेवण करून हे पाणी प्याल तर पचनाला समस्या होऊ शकते.

हे पाणी पिऊन फायदे मिळवायचे असतील तर पाणी तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवावं. 48 तास तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवू शकता. जास्त वेळ भांड्यात पाणी ठेवूनही ते शुद्धच राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य