शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

गरम पाणी पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 16:36 IST

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फिट राहण्यासाठी ज्याप्रमाणे वर्कआउट गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणीही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दिवसातून किमान एकदा तरी गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊयात गरम पाण्याचे आरोग्यदायी फायदे...

चांगल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातूनही असे सिद्ध झाले आहे की, गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक खराब तत्व बाहेर टाकण्यात येतात. 

1. ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांनी गरम पाणी पिणं फार फायदेशीर ठरतं. गरम पाणी रक्तप्रवाह वाढवून ब्लडप्रेशर नियंत्रित करतं. गरम पाणी प्यायल्याने अनेक रोगांपासून शरीराचा बचाव होतो. 

2. चेहऱ्यावरील वाढत्या सुरकुत्यांमुळे आपण फार कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. त्या सुरकुत्या आपल्या शरीरात असणाऱ्या खराब घटकांमुळे होतात. त्यामुळे या सुरकुत्या दूर करण्यासाठी गरम पाणी पिणं हा उत्तम पर्याय आहे. 

3. अनेकदा चेहऱ्यावरील पिम्पलच्या समस्यांमुळे मुली आणि मुलं वैतागलेली असतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी सकाळी अनोशापोटी गरम पाणी पिणं गरजेचं असतं. 

4. ज्या लोकांना भूक लागत नसेल त्यांनी देखील गरम पाणी पिणं लाभदायक असतं. एक ग्लास गरम पाण्यामध्ये काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी प्यायल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते. 

5. त्वचेच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी गरम पाणी रोज पिणं हा उत्तम पर्याय आहे. दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. 

6. तुम्हाला ताप आला असेल तरिदेखील गरम पाणी पिणं फायदेशीर असतं. तसेच गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्याही दूर होतात. अनेक आजार आपल्याला पोट साफ न झाल्यामुळे होतात. त्यामुळे पोट साफ होणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं. 

7. दररोज एक ग्लास पाणी प्यायल्याने वाढलेलं वजन कमी होतं. तसेच पाण्यामध्ये लिंबू टाकून घेणं अधिक गुणकारी ठरतं. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वढते. तसेच त्यामुळे पोटदुखीही कमी होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य