शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गरम पाणी पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 16:36 IST

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फिट राहण्यासाठी ज्याप्रमाणे वर्कआउट गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणीही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दिवसातून किमान एकदा तरी गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊयात गरम पाण्याचे आरोग्यदायी फायदे...

चांगल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातूनही असे सिद्ध झाले आहे की, गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक खराब तत्व बाहेर टाकण्यात येतात. 

1. ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांनी गरम पाणी पिणं फार फायदेशीर ठरतं. गरम पाणी रक्तप्रवाह वाढवून ब्लडप्रेशर नियंत्रित करतं. गरम पाणी प्यायल्याने अनेक रोगांपासून शरीराचा बचाव होतो. 

2. चेहऱ्यावरील वाढत्या सुरकुत्यांमुळे आपण फार कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. त्या सुरकुत्या आपल्या शरीरात असणाऱ्या खराब घटकांमुळे होतात. त्यामुळे या सुरकुत्या दूर करण्यासाठी गरम पाणी पिणं हा उत्तम पर्याय आहे. 

3. अनेकदा चेहऱ्यावरील पिम्पलच्या समस्यांमुळे मुली आणि मुलं वैतागलेली असतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी सकाळी अनोशापोटी गरम पाणी पिणं गरजेचं असतं. 

4. ज्या लोकांना भूक लागत नसेल त्यांनी देखील गरम पाणी पिणं लाभदायक असतं. एक ग्लास गरम पाण्यामध्ये काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी प्यायल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते. 

5. त्वचेच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी गरम पाणी रोज पिणं हा उत्तम पर्याय आहे. दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. 

6. तुम्हाला ताप आला असेल तरिदेखील गरम पाणी पिणं फायदेशीर असतं. तसेच गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्याही दूर होतात. अनेक आजार आपल्याला पोट साफ न झाल्यामुळे होतात. त्यामुळे पोट साफ होणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं. 

7. दररोज एक ग्लास पाणी प्यायल्याने वाढलेलं वजन कमी होतं. तसेच पाण्यामध्ये लिंबू टाकून घेणं अधिक गुणकारी ठरतं. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वढते. तसेच त्यामुळे पोटदुखीही कमी होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य