शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भुट्टा खाल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, 'हा' आजार होण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 12:43 IST

भुट्टा खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजेच अतिरीक्त फॅटही कमी होतं. यात बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयड्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

मक्याचे भाजलेले कणीस खाणे जवळपास सर्वांनाच आवडतं. खासकरु पावसात भुट्टा खाण्याची मजा काही औरच असते. यात असलेल्या अनेक पोषक तत्वांमुळे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. यात फायबरचं प्रमाण अधिक असतं. फायबर हे अनेक दृष्टीने आपल्यासाठी फायद्याचं असतं. 

भुट्टा खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजेच अतिरीक्त फॅटही कमी होतं. यात बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयड्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच कॉर्न खाल्याने हृदयासंबंधी आजार दूर राहतात. पण भुट्टा खाल्यावर तहान लागते. मात्र यावर पाणी प्यायल्यास आरोग्यास हानिकारक ठरु शकतं. 

भुट्टा खाल्यावर पाणी पिण्याचे तोटे

भुट्टा खाल्यानंतर नेहमीच प्रयत्न असावा की लगेच पाणी पिऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या होऊ म्हणजेच ब्लोटिंग होऊ शकतं. यासोबतच पचनतंत्र कमजोर होण्याचाही धोका असतो. अनेकदा ही समस्या गॅस्ट्रोपॅरीसिसस या रोगाचं रुप घेते. यामुळे पोटात दुखणे आणि गॅस होणे ही समस्या होते. कधी कधी इतका त्रास होतो की, व्यक्ती जेवणही करु शकत नाही. मक्याच्या दाण्यांमध्ये कार्बोस आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा या दोन्ही तत्वांमध्ये पाणी मिसळतं तेव्हा पोटात गॅस जमा होते. ज्यामुळे पोटात दुखणे, अॅसिडीटी आणि आणखीही काही गंभीर समस्या होतात. त्यामुळे भुट्ट्यावर पाणी पिऊ नये.

किती वेळाने प्यावे पाणी?

भुट्टा खाल्यानंतर पाणी न पिण्याची गोष्ट ऐकून मग पाणी प्यायचं कधी? असा प्रश्न पडला असेल. प्रश्न योग्यही आहे. भुट्टा खाल्यानंतर साधारण ४५ मिनिटांनी पाणी प्यावे. किंवा भुट्टा खाण्याआधीही पाणी पिऊ शकता. असे केल्याने तुम्हाला होणारी समस्या होणार नाही.

भुट्टा खाण्याचे फायदे

१) कॉर्न आपल्याला होणाऱ्या सामान्य समस्या जसे की, अॅसिडीटी, बद्धकोष्ट यासाठी फायदेशीर आहे. कॉर्नमध्ये अधिकप्रमाणत फायबर असतात जे आतड्यांमधील घाण बाहेर काढतं. 

२) कॉर्न प्रत्येक वयाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. कॉर्नमध्ये मॅग्नेशिअम आणि आयर्न असतात जे हाडं मजबूत करण्यासाठी उपयोगी असतात. त्यासोबतच कॉर्नमध्ये झिंक आणि फॉस्फोरस असतात जे फायदेशीर आहे. 

३) कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात त्याने शरीराला एनर्जी मिळते. याने तुमचा आळसही दूर होतो. जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आणि काम करण्याचा आळस येत असेल तर आहारात कॉर्नचा समावेश करा. 

४) कॉर्न तुमच्या डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण यात व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन असतं. हे खाल्याने डोळ्यांसंबंधी समस्या जसे मॅक्युलर डी जनरेशन होत नाही.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य