शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

कोरोना नाही तर 'या' आजारांना बळी पडून मोठ्या संख्येने लोक मरतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 12:08 IST

अनेकदा या आजारांकडे सुरवातीच्या काळात दुर्लक्ष  केल्यामुळे  मरणाचं  कारण हे आजार ठरत असतात.

कोरोनामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्यामुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण तयार आहे. पण आज आम्ही  तुम्हाला  कोरोनापेक्षाही गंभीर असलेल्या आजारांबद्दल सांगणार आहोत. या आजारांमुळे जगभरासह भारतात सुद्धा  अनेक  लोकांचा मृत्यू होतो. अनेकदा या आजारांकडे सुरवातीच्या काळात दुर्लक्ष  केल्यामुळे मरणाचं कारण हे आजार ठरत असतात. जाणून घ्या कोणते आहेत ते आजार.

 डायबिटीस

जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना  डायबिटीस या आजाराचं शिकार व्हाव लागतं.  आहारात वाढतं साखरेचं प्रमाण आणि खाण्यापिण्याच्या सवयी निश्चिच नसणे यांमुळे  दरवर्षी १५ ते १६ लाख लोकांचा मृत्यू डायबिटीसमुळे होतो. विकसनशील देशात हे प्रमाण जास्त दिसून येतं. 

कॅन्सर

WHO च्या रिपोर्टनुसार २०१६ साली फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे १७ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. लॅन्सेटचा २०१९ सालचा रिपोर्ट आणि कार्डिओलॉजीच्या युरोपियन सोसायटीच्या २०१९ सालच्या परिषदेत मांडण्यात आलेल्या माहितीनुसार जास्त उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कॅन्सर सर्वाधिक मृत्यूचं कारण ठरला आहे.( हे पण वाचा-खरंच दातांना तार लावणं फायद्याचं असतं का? कशी घ्याल काळजी...)

हृदय रोग

हा हृदयाचा आजार आहे, ज्यामध्ये हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हृदयासंबंधी आजारामुळे दरवर्षी दीड कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. WHO च्या मते, गेल्या १५ वर्षांपासून हा आजार सर्वाधिक मृत्यूंचं प्रमुख कारण आहे. WHO ने अशा जीवघेण्या १० इतर आजारांची सूची जारी केली आहे. ज्यामध्ये श्वसनसंबंधी संसर्ग, डायरिया, टीबी, अल्झाइमर, डिमेन्शिया यांचा समावेश आहे. ( हे पण वाचा- Coronavirus : फुप्फुसं नाही तर 'या' अवयवाला सर्वातआधी शिकार करतो कोरोना? जाणून घ्या उपाय!)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य