शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पावसाळ्यात गॅस - अ‍ॅसिडिटी दूर करेल 'या' डाळीचं पाणी, डायटिशिअनने सांगितली पिण्याची पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 09:30 IST

Moong Dal Water : बऱ्याच लोकांना गॅस किंवा अ‍ॅसिडिटी, पोट फुगणं, पोट दुखणे, जुलाब अशा समस्या होतात. अशात पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी एक खास उपाय सांगितला आहे.

Moong Dal Water : वातावरणात बदल झाला की अनेकांना पचनासंबंधी समस्या होतात. खासकरून पावसाळ्या तर पचन तंत्र स्लो झालेलं असतं. त्यामुळेच एक्सपर्ट हलकं आणि शिजवलेलं, कमी तेलाचं खाण्याचा सल्ला देतात. तरीही बऱ्याच लोकांना गॅस किंवा अ‍ॅसिडिटी, पोट फुगणं, पोट दुखणे, जुलाब अशा समस्या होतात. अशात पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी एक खास उपाय सांगितला आहे. श्वेता पांचाल यांनी या दिवसांमध्ये पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मूग डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच ते कसं प्यावं हेही सांगितलं आहे.

श्वेता पांचाल यांनी सांगितलं की, हा एक सोपा, हेल्दी आणि आयुर्वेदिक उपाय आहे. पावसाळ्यात जास्तीत जास्त लोकांना ब्लोटिंग, गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होते. या समस्या दूर करण्यासाठी मूग डाळ शिजवताना त्यात थोडं जास्त पाणी टाका. हे पाणी गाळून ग्लासमध्ये काढा. यात थोडं तूप, हळद आणि काळे मिरे पावडर टाका. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. याने पोटासंबंधी समस्या दूर होतील.

मूग डाळीच्या पाण्याचे फायदे

लठ्ठपणा कमी होतो

आजकाल लोकांना लठ्ठपणाची समस्या जास्त होत आहे. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करायचा असेल तर मूग डाळीच्या पाण्याचं सेवन सुरू करा. याने मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते.

विषारी पदार्थ बाहेर पडतील

मूग डाळीचं पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच या डाळीचं पाणी प्यायल्याने लिव्हर, गॉल ब्लॅडर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

मूग डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला डायबिटीस असलेल्या रूग्णांना दिला जातो. कारण मूग डाळीचं पाणी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबतच मूग डाळ ब्लड ग्लूकोजला नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. ज्याने डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.

डेंग्यूपासून बचाव

पावसाळ्यात डासांची समस्या वाढते. या दिवसात डेंग्यू होण्याचा धोकाही जास्त असतो. या डाळीचं पाणी सेवन करून इम्यून सिस्टम बूस्ट होतं, ज्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.

लहान मुलांसाठी फायदेशीर

मूग डाळीच्या पाण्यात अनेकप्रकारचे पोषक तत्व असतात, जे लहान मुलांसाठी फार फायदेशीर असतात. सर्वात खास बाब ही आहे की, या डाळीचं पाणी सहजपणे पचतं. या डाळीने लहान मुलांची इम्यून पॉवर वाढते आणि त्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून त्यांचा बचाव होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य