शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

'या' ५ गोष्टींचं पाणी पिऊन नेहमी रहा निरोगी, हेल्थ एक्सपर्टनी दिला खास सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 11:11 IST

Magical Water : आज आम्ही तुम्हाला पाण्यात काही गोष्टी टाकून किंवा काही खास गोष्टींचं पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.

Magical Water : पाणी पिणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉ़क्टरही दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. रोज सकाळी साधं पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला पाण्यात काही गोष्टी टाकून किंवा काही खास गोष्टींचं पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत. सकाळी तर जर या पाण्याचं सेवन केलं तर अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

हेल्थ एक्सपर्ट उर्वशी अग्रवाल यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत काही खास पाण्यांची माहिती दिली आहे. हे पाणी तुम्ही रोज सकाळी सेवन कराल तर तुम्हाला खूपसारे फायदे मिळतील.

भेंडीचं पाणी

भेंडीच्या पाण्यामध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन्स असतात. हे पाणी रोज प्यायल्याने रक्तातील शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. पचनक्रिया सुधारते आणि त्वचा हेल्दी राहण्यास मदत मिळते.

आल्याचं पाणी

आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आल्याचं पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील सूज कमी होते. या पाण्याने मळमळ होण्याची समस्या दूर होते तसेच रोगप्रतिकारक शक्तही वाढते.

दालचीनीचं पाणी

दालचीनी हा एक बुहुउपयोगी मसाला आहे. यात भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. रक्तातील शुगर लेव्हल योग्य ठेवण्यास याच्या पाण्याची मदत मिळते. तसेच याच्या पाण्याने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. या पाण्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत मिळते.

पुदीन्याचं पाणी

पुदीन्याचं पाणी प्यायल्याने पचन चांगलं होतं. डोकेदुखी दूर होते आणि श्वासासंबंधी समस्यांचा धोका कमी होतो. उन्हाळ्यात शरीरा डिटॉक्स करण्यासाठी हे चांगलं पाणी मानलं जातं.

पिंपळीचं पाणी

पिंपळीचं पाणी प्यायल्याने श्वसनासंबंधी समस्या दूर होतात. पचन चांगलं होतं आणि मेटाबॉल्जिम मजबूत होतं. ज्यामुळे तुम्हाला वेगाने वजन कमी करण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य