शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'या' ५ वेळेवर आवर्जून प्या पाणी, अनेक आजारांवर ठरेल रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:03 IST

Drink water Tips : जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे.

Drink water Tips : पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही. इतकंच नाही तर आपल्या शरीरात ७५ टक्के पाणी असतं. पण जर पाण्याचं हे प्रमाण असंतुलित झालं तर मोठ्या समस्या होतात. अनेक गंभीर आजार शरीरात घर करतात. एक्सपर्ट किंवा डॉक्टर नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण काही कारणाने अनेकांना हे शक्य होत नाही. 

अशात जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. जी सामान्यपणे अनेकांना माहीत नसते. त्यामुळे डायटिशिअन मनप्रीत यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यांनी अशा पाच वेळा सांगितल्या आहेत जेव्हा तुम्ही पाणी आवर्जून प्यायला हवं.

पाण्याचं महत्व

आयुर्वेदात पाण्याला अमृत म्हटलं गेलं आहे. पाण्यामुळे शरीर स्वच्छ होतं. तसेच पाण्यातून शरीराला अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. या सगळ्या गोष्टी शरीरातील इतर अवयवांना फायदे देतात. 

पाणी पिण्याची योग्य वेळ

पाणी पिणं महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण पाणी कधी पिणं जास्त महत्वाचं असतं हे अनेकांना माहीत नसतं. तेच जाणून घेऊया.

- सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच पाणी पिणं गरजेचं आहे. कारण रात्रभर तुम्ही पाणी पित नाही आणि त्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं.

- जास्तीत जास्त लोक ही चूक करतात की, ते जेवण केल्यावर लगेच पाणी पितात. जेवण झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने पाणी प्यायला हवं असं मानलं जातं.

- आंघोल करण्याआधी पाणी प्यायलं पाहिजे.

- तसेच एक्सरसाइज करण्याआधी, एक्सरसाइज करताना आणि नंतर पाणी प्यायला हवं.

- डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या असल्यावर पाणी प्यावं. याने या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

पाणी कसं प्यावं

पाण्यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे फायदे मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने पिणं महत्वाचं आहे. काही लोक उभं राहून पाणी पितात. ग्लासमध्ये घेऊन खाली बसून पाणी पिणं योग्य असतं. पाणी ढसाढसा पिऊ नये. ते एक एक घोट करून प्यावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य