शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

खुशखबर! मेड इन इंडिया लसीबाबत 'या' राज्यातून समोर आली दिलासादायक माहिती, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 11:39 IST

CoronaVirus News & Latest Updates : आयसीएमआर आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिनची मानवी चाचणी विविध राज्यांमध्ये सुरू आहे.

कोरोनाच्या माहामारीविरुद्ध संपूर्ण देश लढत आहे. कोरोनाची लस कधी तयार होणार याबाबत संपूर्ण जगभरातील लोकांना प्रतिक्षा आहे. दरम्यान कोरोनाची मेड इन इंडीया लस म्हणजेच कोवॅक्सिनबाबत एक दिलासादायक माहिती ओरिसामधून समोर येत आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिनची मानवी चाचणी विविध राज्यांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे मानवी चाचणी दरम्यान स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर या लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत.

कोवॅक्सिनच्या लसीच्या  चाचणीसाठी आयसीएमआरडून 12 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्यात आयुर्विज्ञान संस्था, एसयुएम रुग्णालयात बीबीवी 152 कोविड 19 किंवा कोवॅक्सिनच्या लसीचे परिक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे.  चाचणी प्रक्रियेचे प्रमुख  डॉ. ई वेंकट राव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भारत बायोटेकद्वारे विकसित करण्यात आलेली कोवॅक्सिन ही लस मानवी चाचणीसाठी स्वतःहून पुढाकार घेतलेल्या लोकांना देण्यात आली होती. लस दिल्यानंतर  या स्वयंसेवकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. ज्यांना लस देण्यात आली होती.  त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुढे त्यांनी सांगितले की, लसीच्या चाचणीसाठी आलेल्या स्वयंसेवकांना खूप मोठ्या प्रक्रियेतून जावं लागलं. भारताच्या डिसीजीआयकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करत या स्वयंसेवकांना लस देण्यात आली. या स्वयंसेवकांना 14 दिवसांच्या अंतराने 2 लसी दिल्या जाणार आहेत. 

दरम्यान  देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 47,704 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 14 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 654 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 14,83,157 वर गेला आहे.

तर आतापर्यंत देशभरात 33,425 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे. तसेच देशातील 9 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 9,52,744 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दालचिनीच्या सेवनाने होतात 'हे' ६ फायदे; कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास होईल मदत

जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या