शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

खुशखबर! मेड इन इंडिया लसीबाबत 'या' राज्यातून समोर आली दिलासादायक माहिती, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 11:39 IST

CoronaVirus News & Latest Updates : आयसीएमआर आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिनची मानवी चाचणी विविध राज्यांमध्ये सुरू आहे.

कोरोनाच्या माहामारीविरुद्ध संपूर्ण देश लढत आहे. कोरोनाची लस कधी तयार होणार याबाबत संपूर्ण जगभरातील लोकांना प्रतिक्षा आहे. दरम्यान कोरोनाची मेड इन इंडीया लस म्हणजेच कोवॅक्सिनबाबत एक दिलासादायक माहिती ओरिसामधून समोर येत आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिनची मानवी चाचणी विविध राज्यांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे मानवी चाचणी दरम्यान स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर या लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत.

कोवॅक्सिनच्या लसीच्या  चाचणीसाठी आयसीएमआरडून 12 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्यात आयुर्विज्ञान संस्था, एसयुएम रुग्णालयात बीबीवी 152 कोविड 19 किंवा कोवॅक्सिनच्या लसीचे परिक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे.  चाचणी प्रक्रियेचे प्रमुख  डॉ. ई वेंकट राव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भारत बायोटेकद्वारे विकसित करण्यात आलेली कोवॅक्सिन ही लस मानवी चाचणीसाठी स्वतःहून पुढाकार घेतलेल्या लोकांना देण्यात आली होती. लस दिल्यानंतर  या स्वयंसेवकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. ज्यांना लस देण्यात आली होती.  त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुढे त्यांनी सांगितले की, लसीच्या चाचणीसाठी आलेल्या स्वयंसेवकांना खूप मोठ्या प्रक्रियेतून जावं लागलं. भारताच्या डिसीजीआयकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करत या स्वयंसेवकांना लस देण्यात आली. या स्वयंसेवकांना 14 दिवसांच्या अंतराने 2 लसी दिल्या जाणार आहेत. 

दरम्यान  देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 47,704 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 14 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 654 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 14,83,157 वर गेला आहे.

तर आतापर्यंत देशभरात 33,425 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे. तसेच देशातील 9 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 9,52,744 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दालचिनीच्या सेवनाने होतात 'हे' ६ फायदे; कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास होईल मदत

जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या