शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

CoronaVirus News: कोरोनामुक्त झाल्यावर किती काळ राहतात अँटिबॉडी?; संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 14:39 IST

CoronaVirus News: कोरोनावर मात केलेल्यांना मोठा दिलासा; नव्या संशोधनातून दिलासादायक माहिती समोर

टोकियो: भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. आता हा आकडा अडीच लाखांच्या खाली आला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यातच आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबद्दल आणखी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला कानमंत्रकोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. कोरोनावर मात केलेल्या ९६ टक्के रुग्णांच्या शरीरात एका वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम असतात, अशी माहिती जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठानं केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. जपानमधील क्योदो वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या जवळपास २५० व्यक्तींच्या शारिरीक स्थितीची चाचणी संशोधनादरम्यान करण्यात आली.कोरोनापेक्षा लसीचे भय! लसीकरणासाठी आलेल्या पथकाला पाहून ग्रामस्थ घाबरले, नदीत उड्या मारून पळालेसंशोधनात सहभागी झालेल्या २५० जणांमध्ये २१ ते ७८ वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. गेल्या फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची जास्त लक्षणं आढळून आलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटिबॉडी कायम होत्या. तर कोरोनाची कमी आणि अजिबात लक्षणं नसलेल्या ९७ टक्के व्यक्तींच्या शरीरात सहा महिन्यांपर्यंत अँटिबॉडी कायम राहिल्याचं संशोधनातून समोर आलं.कोरोना महामारी आल्यानंतर पहिल्याच महिन्यात संक्रमित झालेल्या व्यक्तींनी लस टोचून घेणं अतिशय गरजेचं असल्याचं संशोधन सांगतं. कोरोनाची सौम्य किंवा अजिबात लक्षणं नसलेल्या व्यक्तींनी प्राधान्यानं लसीकरण करून घ्यायला हवं. या व्यक्तींनी लस न घेतल्यास त्यांनी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील व्हेरिएंटचा धोका असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या