शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

CoronaVirus Live Updates : कोरोनाने चिंता वाढवली! "श्वसनमार्गामध्ये गंभीर संसर्ग, किडन्या खराब, रक्ताच्या गुठळ्या अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 19:00 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने शरीराचे कितपत नुकसान केले आहेत. याबाबत अनेक रिसर्च समोर येत आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाने शरीराचे कितपत नुकसान केले आहेत. याबाबत अनेक रिसर्च समोर येत आहेत. असाच एक रिसर्च समोर आला असून त्यातून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. राजकोटच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक संशोधन करण्यात आलं आहे. कोरोनाने लोकांच्या किडन्या खराब केल्याचे आढळून आले आहे. श्वसनमार्गामध्ये गंभीर संसर्ग झाला. फुफ्फुसापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.  हे अशा लोकांसोबत अधिक घडले ज्यांना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच ज्यांचा संसर्ग कालावधी हा एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आहे.

संशोधकांनी आपल्या अभ्यासासाठी 33 मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले. हे असे लोक होते ज्यांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला. या लोकांच्या अवयवांचा अभ्यास करून कोरोनामुळे कोणत्या अवयवाला इजा झाली आहे, हे दिसून आले. या अभ्यासाचे नेतृत्व डॉ. हेतल क्यादा यांनी केले आहे. ते राजकोटच्या मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहे. या संशोधनाचे निष्कर्ष 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार, कोरोनामुळे फुफ्फुस आणि श्वसनप्रणालीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हे नुकसान रुग्णालयांमध्ये अधिक झाले.

रिसर्चनुसार, 'कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांची प्रकृती बिघडली. त्यांना ब्रॉन्कोनिमोनियाच्या रूपात श्वसन प्रणालीच्या गंभीर संसर्गाने गाठले होते. त्यांच्या फुफ्फुसात फोड आले होते. एवढेच नाही तर फुफ्फुसात रक्त वाहून नेणाऱ्या धमनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत्या. हे सर्व घडले कारण त्यांना मशीनमधून बराच वेळ ऑक्सिजन दिला जात होता. टोसिलिझुमॅब आणि स्टेरॉइड्ससारख्या औषधांच्या वापरामुळे रुग्णांच्या किडनी आणि इतर अवयवांना गंभीर नुकसान झाले. इतकेच नव्हे तर रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या दबावामुळे रुग्णालयांना नियमितपणे संसर्गविरोधी व्यवस्था करणेही शक्य होत नव्हते. एवढे करूनही अनेक रुग्णांना वाचवता आले नाही.

'द इंडियन एक्स्प्रेस'नुसार, ज्या मृतदेहांवर रिसर्च करण्यात आला त्यामध्ये 28 पुरुष, 5 महिला होत्या. 7 सप्टेंबर ते 23 डिसेंबर 2020 दरम्यान त्यांचे निधन झाले होते. मृत्यूनंतर तीन तासांत त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सर्वांचे वय 60 पेक्षा जास्त होते. त्यापैकी 30 जणांना ऑक्सिजन-सपोर्टची गरज होती. सर्व लोकांना 7 किंवा अधिक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,377 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,23,753 लोकांना जीव गमवावा लागला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य