शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus : चिंता वाढली! कोरोनामुळे पुन्हा देशात मागिल वर्षाप्रमाणेच स्थिती उद्भवणार? तज्ज्ञ म्हणाले की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 11:03 IST

CoronaVirus : देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या एक कोटी 15 लाखांपेक्षा अधिक आहे.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १० लाखांपेक्षा अधिक लोक या आजाराने बरे झाले आहेत.

भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये लसीकरण कार्यही वेगवान वेगाने सुरू आहे. 24 तासात २० लाखांपेक्षा अधिक लोकांवर लस दिली जात आहे. आतापर्यंत देशातील ९३ लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना ही लस दिली गेली आहे. तथापि, येथे सक्रिय प्रकरणांची संख्याही वाढत आहे. देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या एक कोटी 15 लाखांपेक्षा अधिक आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १० लाखांपेक्षा अधिक लोक या आजाराने बरे झाले आहेत.

लस आल्यानंतर वाढतोय कोरोनाचा संसर्ग? 

ऋषिकेश येथिल एम्सचे डॉ. प्रसन पांडा यांनी सांगितले की, ''कोरोनाची लस घेतल्यानंतर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात. पण दुसरी व्यक्ती सुरक्षित राहिल याबाबत सांगता येणार नाही. लसीमुळे 100 टक्के सुरक्षा मिळतेच असं नाही. लसीमुळे मिळणारी सुरक्षा 80 ते 85 टक्क्यांपर्यंत असू शकते. या व्यतिरिक्त शरीरात एंटीबॉडी किती प्रमाणात तयार होतात. यावर कोरोना संक्रमणाची तीव्रता अवलंबून असते.  त्यासाठी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाचं संक्रमण झाल्यास त्याचे गांभीर्य कमी होते. याव्यतिरिक्त देशात सगळ्या लोकांना इतक्या लवकर लस देणं शक्य नाही. त्यामुळे निष्काळजीपणा केल्यास कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढू शकतं.

 

खरंच शहरांमध्ये लॉकडाऊनची स्थिती उद्भवतेय?

डॉ. प्रसन पांडा सांगतात की, ''ज्याप्रमाणे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आणि कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाचा वेग असाच वाढत राहिला तर लोकांचा संपर्क टाळण्यासाठी सरकारकडून मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. ''

देशात पुन्हा लॉकडाऊनची स्थिती येणार?

लॉकडाऊनच्या स्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,  ''एका वर्षापूर्वी देशात कोरोना आपले हात पाय पसरू लागला होता. माहामारीच्या सुरूवातीला  वेगवेगळ्या देशांमधून प्रवास करून आले होते. त्यामुळे मोठ्या शहरात संक्रमण वाढत होतं. मोठ्या शहरांमध्ये गर्दी जास्त असते, त्यामुळे संक्रमण वेगानं पसरतं. पण सध्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे लहान लहान गावांमध्येही संक्रमण वेगानं पसरत आहे.  म्हणूनच लोकांनी नियमांचे पालन न विसरता करायला हवा. आधीपेक्षा जास्त सावधगिरी बाळगायला हवी.''

तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

"लस घेतल्यानंतर जर तुम्हाला ताप येत असेल तर काळजी करू नका. अनेकदा लस घेतलेल्या  ठिकाणी वेदना झाल्यास बर्‍याच लोकांना ताप देखील येतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. जर आपल्याला ताप असेल तर आपण पॅरासिटामोल घेऊ शकता. अनेकदा ही समस्या दोन दिवसात बरे होते. तशाच प्रकारे इतर लसीमध्येही काही लोकांना समान समस्या येत आहेत, परंतु ही लस नवीन असल्याने लोकांचे अधिक लक्ष वेधले जात आहे.''  असेही त्यांनी यावेळी सांगितले आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस