शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus : भारतात लसीशिवाय नष्ट होतेय कोरोनाची महामारी? तज्ज्ञांनी सांगितलं की.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 14:56 IST

CoronaVirus News & Latest Updates : आतापर्यंत ९३ लाख २४ हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. ही आकडेवारी पाहून कोरोनाच्या लसीशिवाय माहमारी नष्ट होण्याच्या मार्गावर येत आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

जगभरात कोरोना व्हायरसच्या माहामारीने कहर केला आहे. आतापर्यंत ७ कोटी २१ लाखांपेक्षा जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १६ लाखांपेक्षा अधिक लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. भारतातही संक्रमितांचा आकडा ९८ लाखांवर पोहोचला आहे. भारतात कोरोनातून बरे झालेल्यांचा दर ९४.८९ टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९३ लाख २४ हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. ही आकडेवारी पाहून कोरोनाच्या लसीशिवाय माहमारी नष्ट होण्याच्या मार्गावर येत आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

दिल्लीतील सफरजंग रुग्णालयातील डॉ. रूपाली मलिक यांनी अमर उजालाशी बोलताना सांगितले की, कोरोना व्हायरसचा प्रसार आता आटोक्यात आला आहे. असा विचार अनेकजण करत आहेत. पण आतापर्यंत काहीही निश्चित झालेलं नाही. या माहामारीवर आपण विजय मिळवला असं समजणं एवढ्यात योग्य ठरणार नाही. कारण देशात अनेक अशी राज्य आहेत. जिथं कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट दिसून येत आहे. तीन मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारकशक्ती विकसित झाली आहे. लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. असं असलं तरी लहानात लहान गोष्टीत दाखवलेला निष्काळजीपणा महागात पडू शकतो.

डॉ. रूपाली मलिक यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये फायजरच्या कोरोना लसीचे १२ वर्षांवरील लोकांवर परिक्षण सुरू आहे. जगभरात अजून काही लसींची तपासणी सुरू आहे. १८ वर्षांवरील वयोगटातील लोकांसाठी नवीन लस दिली जाणार आहे. सध्या लहान मुलांसाठी  लसीकरण योजना तयार करण्यावर भर दिला जात आहे.लस तयार करण्यासाठी ज्या पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे एलर्जीचा सामना करावा लागू शकतो. अनेकांमध्ये ही माईल्ड स्वरूपाची एलर्जी असते. तर काही लोकांमध्ये गंभीर स्वरूपात एलर्जीची लक्षणं दिसून येतात. चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त

एनाफायलॅक्सिसमध्ये ही एलर्जी गंभीर स्वरूपाची असू शकते. ज्या लोकांना एलर्जीच्या समस्येचा सामना करावा लागतो  त्यांनी लस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. याआधीही ज्या लसी आल्या होत्या. त्यात  आजाराला रोखण्याची क्षमता ५०-५० टक्के होती. लस १०० टक्के प्रभावी ठरेल की नाही याबाबत सांगणं कठीण आहे. अजूनही लसीच्या परिणामांबाबत अधिक अभ्यास सुरू आहे. काळजी वाढली! समोर आलं कोरोना संक्रमणाचं नवं लक्षणं; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य