शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिंताजनक! महाराष्ट्रातील 'या' 3 शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; अधिक सावध राहावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 18:29 IST

CoronaVirus News & Latest Updates : विदर्भात (vidarbha) कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे.  राज्यातील काही भागात दिलासादायक वातावरण असताना दुसरीकडे मात्र चिंताजनक वातावरण आहे.

कोरोना व्हायरसनं गेल्या  वर्षांपासून कहर केलेला पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे.  मुंबई (mumbai coronavirus), पुण्यात थैमान घालणाऱ्या कोरोनानं (coronavirus) आता आपलं केंद्र बदललं आहे. आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट (corona hotspot) समोर आले आहे. राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार नंदुरबार, सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक ही पाच ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. तर विदर्भात (vidarbha) कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. राज्यातील काही भागात दिलासादायक वातावरण असताना दुसरीकडे मात्र चिंताजनक वातावरण आहे. अकोला, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

 4 जानेवारीला राज्यात 48,801 सक्रिय रुग्ण होते तर 3 फेब्रुवारीला 37,516 रुग्ण होते. म्हणजेच महिनाभरात ही संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. पुणे, ठाण्यासह 21 जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. पण इतर 14 जिल्ह्यात हे प्रमाण वाढलं आहे. यात  सांगली, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

अमरावतीत 

अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 1 फेब्रुवारी रोजी हे प्रमाण 22 टक्के होतं तर आता सोमवारी ज्या 419 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 235 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हे प्रमाण 56 टक्क्यांवर गेलं आहे. 

नागपूर

मंगळवारी नागपुरात 379 नवीन रुग्णाची नोंद झाली असून यात 5 रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णाच्या वाढीचा टक्का 2.52 असताना नागपूरमध्ये हा दर 3.08 टक्के आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण असून काल केंद्रीय पथकाने विदर्भाचा आढावा घेतला तेव्हा नागपूरमधील वाढती कोरोनाच्या संख्या आणि उपयोजना यावर चिंता व्यक्त केली. सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होत नाही? मग गॅस, पोटदुखीची चिंता सोडा, या उपायांनी समस्या होईल दूर

दरम्यान कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''नुकत्याच झालेल्या बैठकीत नमुद करण्यात आलं होतं की, राज्यातील १० ते १४ जिल्ह्यांवर लक्ष द्यावं लागणार आहे.'' यावेळी त्यांनी अमरावती अकोला याबद्दल विशेष चिंता व्यक्त केली आहे. या भागांमध्ये टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि उपचारांच्या पद्धतीतही सुधारणा व्हायला हवी असं त्याचं मत आहे. लसीकरणानंतरही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशामुळे होतोय प्रसार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या