शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

सतत तहान लागतेय! उन्हाळ्यात फ्रीजचे पाणी योग्य की माठातले?; जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 15:58 IST

सध्या शहरात खोकला आणि घसा दुखण्याचे आजार बळावत असताना फ्रिजचे पाणी पिण्यास आपण धजावत नाही.

मुंबई: उन्हाळा वाढू लागल्याने माठांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे माठांच्या किमतीही वाढल्या आहेत. सध्या शहरात खोकला आणि घसा दुखण्याचे आजार बळावत असताना फ्रिजचे पाणी पिण्यास आपण धजावत नाही. त्यामुळे गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाचा पर्याय हा अतिउत्तम ठरू शकतो. ज्याचा आरोग्यालाही तितकाच फायदा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

फ्रिजच्या पाण्याने वजन वाढते फ्रिजमधील पाण्याने तात्पुरती तहान भागत असली तरी ते पिऊन आरोग्याचे नुकसानच होते. कारण, माठातले पाणी नैसर्गिक तर फ्रिजमधील पाणी कृत्रिमरीत्या गार केले जाते. त्याने घशातील ग्रंथींना सूज येते. आतड्यांवर परिणाम होऊन ते आकुंचन पावतात. त्यांचे काम नीट न झाल्याने पोट साफ होण्यास अडथळा येऊन बद्धकोष्ठता होते. पचन न झाल्याने पेशी आकुंचित पावून चयापचय बिघडते. परिणामी वजनही वाढू शकते. 

माठातील पाणी आरोग्यासाठी योग्य...

मानवी शरीर आम्लयुक्त तर मातीचे भांडे निसर्गतः अल्कधर्मी आहे. या दोन्हीच्या मिश्रणामुळे शरीरात संतुलित पीएच (हायड्रोजनची क्षमता) पातळी तयार होते. विविध विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य आजारांवर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक पीएचची पातळी ७.३५-७.४५ च्या मानकामधून विचलित झाल्यास आजार बळावतात. त्यामुळे माठातील पाणी शरीरासाठी योग्य असल्याचे डॉक्टर सांगतात.

...म्हणून माठातीलच पाणी प्या-

  • माठातील पाण्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. 
  • बॅड कोलेस्टॉल कमी होत हृदयविकाराचा धोका कमी होतो. 
  • मातीत सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात.
  • या गुणधर्मामुळेच माठातील पाणी प्यायल्याने स्नायूचा आखडलेपणा, सूज कमी होते.

संधिवातासारख्या त्रासात माठातलं पाणी प्यायल्याने आराम मिळतो. शरीरातील लोहाच्या कमतरतेने असलेला अॅनेमियाचा धोकाही दूर होतो. तसेच त्वचेशी निगडित आजार म्हणजे मुरुम, पुटकुळ्या, फोड जाऊन त्वचा उजळ होते. 

टॅग्स :WaterपाणीTemperatureतापमानHealthआरोग्य