शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

थंडी-वाऱ्यानेच नव्हे, तर कडाक्याच्या उष्णतेनेही होते सर्दी; 'या' आजारांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:20 IST

पावसाळा संपल्यानंतर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये उष्णतेमुळे सर्दी होते.

पावसामुळे किंवा थंडी-वाऱ्यामुळे अनेकांना सर्दी होते. काहींना तर पाण्यात बदल झाला, तरी सर्दी होते. काहींना ॲलर्जी सर्दी असते. तथापि, सर्दीचा आणखी एक प्रकार म्हणजे उष्णतेने होणारी सर्दी, कडाक्याच्या उन्हातून फिरलात, उष्मा जाणवायला लागला तरी सर्दी होते.

विशेषतः पावसाळा संपल्यानंतर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये उष्णतेमुळे सर्दी होते. या सर्दीला ॲन्टिबायोटिक घेण्यापेक्षा घरगुती, आयुर्वेदिक उपचार घेतलेले अधिक पित्त व सर्दी यांचा तसा काही संबंध नाही. अतिचहा, कॉफी, जागरण, अवेळी जेवण, उपवास यामुळे पित्त होते, तर वातावरणातील बदलामुळे सर्दी होते.

याचं करा सेवन

तुळस - तुळस या वनस्पतीत आटव्हायरलचे गुणधर्म असतात. आपण तुळशीचा चहामध्ये वापर करून तो पिऊ शकता. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

उसाचा रस - उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. हा रस घेतल्यामुळे  रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. उसाचा रस पिल्यामुळे आणि इतर संक्रमणे बरे होण्यास मदत होते.

सर्दी अनेक कारणांनी होत असली तरी प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे सर्दीचा त्रास होतो. त्यामुळे कोरोना काळात जे उपचार घेतले तसे उपचार घेतले पाहिजेत. सकाळी, संध्याकाळ वाफ घेणे, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

उष्णतेच्या सर्दीवर उपाय काय?

तापमानात अचानक बदल झाल्यास शरीरावर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात अचानक आल्यास तीव्र सर्दीचा त्रास होणे स्वाभाविक असते.

परस्पर विरोधी वातावरणाचा आरोग्यावर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन एकदम थंड किंवा उष्ण वातावरणात गेल्यास हा त्रास उद्भवतो. या कालावधीत आहाराबाबतही विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते.

सर्दी कशामुळे होऊ शकते?

१) पावसात भिजल्याने: पाऊस सर्वांना आवडत असला तरी जास्त वेळ पावसात भिजल्याने  सर्दी होऊ शकते.

२) धूलिकण: रस्त्यावर फिरत असताना वातावरणातील धूलिकणांमुळे तसेच प्रदूषणामुळे सर्दी होण्याची शक्यता असते.

३) धुपकांडी: घरात धुपकांडी लावली असेल किंवा डासांचा उपद्रव टाळण्यासाठी लिक्विडयुक्त धूप लावल्यास श्वसनात त्रास होऊ शकतो.

४) ओल्या भिंतीच्या संपर्कात जास्त आल्यास: बऱ्याच वेळा पावसाळ्यात घराच्या भिंती ओल्या होतात, अशा ओल्या भिंतीच्या खोलीत वास्तव्य केल्याने सर्दी होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स