शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पालकांनो सावधान! लहान मुलांची बौद्धिक क्षमता कमी होण्याचं हे असू शकतं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 11:21 IST

भारतीय लहान मुलांच्या रक्तात शिसं अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर वाईट प्रभाव होऊ शकतो. याच कारणाने वेगवेगळ्या आजारांचीही समस्या होऊ शकते.

भारतीय लहान मुलांच्या रक्तात शिसं अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर वाईट प्रभाव होऊ शकतो. याच कारणाने वेगवेगळ्या आजारांचीही समस्या होऊ शकते. एका नव्या शोधातून ही बाब समोर आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मॅकक्वेरी विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी भारतीयांच्या रक्तातील शिशाचं प्रमाण याबाबत पहिलं मोठं विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणातून आढळलं की, आजारांचा धोका आधीच्या तुलनेत अधिक वाढला आहे. याचा लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. 

मॅकक्वेरी विश्वविद्यालयाचे ब्रेट एरिक्सन म्हणाले की, भारतात राहणाऱ्या लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर होणारा दुष्परिणाम गंभीर आहे. त्यांच्या रक्तात शिशाच्या मिश्रणाचं प्रमाण साधारण ७ मायक्रो ग्रॅम प्रति डेसीलिटर आहे. अभ्यासकांनी सांगितले की, भारतीयांच्या रक्तात शिशाचं प्रमाण वाढण्याचं कारण बॅटरी रिसायकल क्रिया आहे. भारतात बॅटरी रिसायकल प्रक्रियेची व्यवस्था फार वाईट आहे.   

एरिक्सन म्हणाले की, 'भारतात मोठ्या प्रमाणात लोक मोटरसायकल किंवा कार चालवतात. या वाहनांच्या बॅटरीचं लाइफ हे केवळ दोन वर्ष असतं. लेड बॅटरींचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. या बॅटरी दरवर्षी रिसायकल केल्या जातात. पण त्या योग्य पद्धतीने रिसायकल केल्या जात नाही'.

अभ्यासकांनी सांगितले की, आयुर्वेदिक औषधी, आयलायनर, नूडल्स आणि मसालेसहीत अनेक आणखीही काही पदार्थ आहेत जे लहान मुलांच्या रक्तात शिशाचं प्रमाण वाढवतात. 

२०१० ते २०१८ दरम्याने करण्यात आलेल्या पाहणीनुसार रक्तात शिशाचं प्रमाण वाढलं हे दाखवणाऱ्या आकडेवारीने बौद्धिक क्षमतेत कमतरता आणि रोगांचं कारण असलेल्या डिसेबिलिटी अडजस्टेड लाइफ इअर्स(डीएएलवाय) ची माहिती मिळाली. डीएएलवायने हे माहिती पडतं की, आजारांमुळे, क्षमता कमी झाल्याने आणि अवेळी आलेल्या मृत्यूने आपण किती वर्ष गमावली आहेत. 

शिशाने प्रेरित डीएएलवायमुळे ४६ लाख लोक प्रभावित झाले आणि १६५,००० लोकांचा मृत्यू झाला. आता नव्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, डीएएलवायची संख्या वाढून ४९ लाख होऊ शकते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य