शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

​​​​​​​उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 18:11 IST

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता झाल्यानं त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. तसंच तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ होते.

मुंबई : उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता झाल्यानं त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. तसंच तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ होते. उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज हे फळ सर्वोत्तम आहे. यामध्ये पोषण तत्वे भरपूर प्रमाणात आहेत.

खरबुजात पाणी तसंच जीवनसत्त्वे आणि क्षाराचे प्रमाण 95 टक्के इतकं असते. ज्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. पिकल्यानंतर या फळाचा रंग पिवळा होतो. पिकलेले फळ हे त्याच्या चविष्ट घट्ट गोडसर गरासाठी प्रसिद्ध आहे.

ग्रीन टी पिताना घ्या ही काळजी, या गोष्टींसाठी घ्या ग्रीन टी!

खरबुजाच्या या गुणामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्यास मदत होते. खरबुजामध्ये असलेले पाण्याचे मोठे प्रमाण शरीरात कधीच अपचन होऊ देत नाही. खरबुजामधील क्षारमुळे पचनसंस्था उत्तम राहते. खरबुजातील असलेले कॅरिटीनॉयड कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मदत करते. विशेषत: खरबूजातील बिया याबाबत खूपच फायदेशीर ठरतात.

खरबुजात एंडीनोसीन नावाचे तत्त्व असते. जे शरीरात रक्ताची गुठळी वा डाग होऊ देत नाही. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. खरबुजाचे नियमित सेवन किडनी समस्येतील रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. 

थंड दूध पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

विशेषकरून लिंबाच्या रसाबरोबर त्याचे सेवन युरिक अँसिडशी संबंधित समस्या दूर करते. नितळ त्वचेसाठीही खरबूज उपयोगी आहे. त्याच्यामध्ये कोलाजेन नावाचे तत्त्व मोठय़ा प्रमाणात असते जे त्वचेला सौंदर्य व कांती प्रदान करते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न