शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मायग्रेनच्या समस्येवर इलाज आहे स्वयंपाकघरातील 'हा' मसाला, फायदे इतके ही रोजच वापराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:50 IST

सर्दी-खोकला झाला की आल्याचा (Ginger) रस घेतला जातो किंवा आल्याच्या चहाला आपण प्राधान्य देतो. केवळ सर्दी खोकलाच नव्हे तर इतरही बऱ्याच रोगांना दूर ठेवण्याचं कामं आलं करत असतं.

शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वं आपणाला दैनंदिन आहारातून मिळतात. हॉटेल किंवा जंक फूडऐवजी आजही आपल्या घरात तयार होणारा स्वंयपाकच आरोग्यासाठी महत्त्वाचा ठरतो. स्वयंपाकघरात असलेले अनेक पदार्थ रोगांना दूर ठेवण्यासाठी मदत करत असतात. यात सर्दी-खोकला झाला की आल्याचा (Ginger) रस घेतला जातो किंवा आल्याच्या चहाला आपण प्राधान्य देतो. केवळ सर्दी खोकलाच नव्हे तर इतरही बऱ्याच रोगांना दूर ठेवण्याचं कामं आलं करत असतं.

सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून आलं सर्रास वापरलं जातं. बॅक्टेरियल आणि फंगल संसर्गाशी ( Bacterial & Fungal Infection) लढण्यासाठी आलं मदत करतं. याशिवाय सांधे आणि स्नायुंचं दुखणं कमी करण्यासाठी आल्याचा चांगला उपयोग होतो. आल्याचं सेवन केल्याने संधिवाताच्या समस्येवर दिलासा मिळू शकतो. आल्यात सूज कमी करण्याची आणि वेदनाशामक शक्ती असते. या दोन्ही गुणांमुळे आलं खाल्ल्याने स्नायूंच्या दुखण्यापासून दिलासा मिळू शकतो.

मायग्रेनचा त्रास असल्यास घ्या आल्याचा चहाएखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास असल्यास त्याच्यासाठी आलं फार महत्त्वाचं ठरतं. आल्याचा चहा घेतल्यास त्याला उपकारक ठरू शकतो. आल्याचा चहा घेतल्यानंतर प्रोस्टेग्लॅडिनचा त्रास कमी होतो. असह्य त्रासापासूनही मुक्ती मिळू शकते.

लिव्हर, किडनी स्वच्छ ठेवण्याचं काम करतं आलंडायबेटिस असणाऱ्या व्यक्तींसाठीही आलं महत्त्वाचं ठरतं. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी व इन्शुलिनची सक्रियता वाढवण्यासाठी आलं चांगल काम करतं असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. आलं लिव्हर, किडनीला स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतं.

वजन कमी करायचे असल्यास होईल फायदाआलं हे शरीरातील चरबी जाळण्याचं (Fat Burner) काम करत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. आल्याच्या सेवनाने पोट, कंबर आदी ठिकाणची अतिरिक्त चरबी कमी होते. स्थुलत्वाशी संबंधित धोकाही आल्यामुळे दूर होऊ शकतो. सकाळी आलं असलेलं कोमट पाणी प्यायल्यास शरीराला मारक घटक घामावाटे शरीरातून निघून जातात व आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी याची मदत होऊ शकते.

स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी नेहमी वापरल्या जाणाऱ्या आल्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. केवळ एखाद्या भाजीत किंवा चहापुरता त्याचा मर्यादित वापर न करता नेहमी त्याचं सेवन करायला हवं, असं आहारतज्ज्ञही सांगत असतात. बाजारात जेव्हा आलं स्वस्त असतं तेव्हा त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते वाळवून त्याची सूंठ तयार केल्यास मधासोबतही त्याचं सेवन करता येतं. विशेष म्हणजे आरोग्याला त्याचे चांगले फायदे मिळू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स