शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या योग्य वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 10:09 IST

Drink Hot Water In Winter: गरम पाणी पिण्याचे काही नुकसानही आहेत. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे, नुकसान आणि पाणी पिण्याची योग्य वेळ याबाबत सांगणार आहोत.

Drink Hot Water In Winter: हिवाळ्यात गरम पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला जास्त उष्णतेची आणि एनर्जीची गरज असते. अशात गरम पाण्याने शरीर तर हायड्रेट राहतंच, सोबतच अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. मात्र, गरम पाणी पिण्याचे काही नुकसानही आहेत. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे, नुकसान आणि पाणी पिण्याची योग्य वेळ याबाबत सांगणार आहोत.

गरम पाणी पिण्याचे फायदे

१) पचन तंत्र मजबूत होतं

गरम पाणी प्यायल्याने पचन तंत्राला योग्यपणे काम करण्यास मदत मिळते. याने पोटातील अन्न वेगाने पचण्यास मदत होते आणि पचनासाठी आवश्यक एझांइम्सही रिलीज होण्यास मदत मिळते. हिवाळ्यात आपलं मेटाबॉलिज्म स्लो होतं, अशात गरम पाणी पचन योग्यपणे होण्यास फायदेशीर ठरतं.

२) वजन कमी होतं

गरम पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. गरम पाण्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्न होण्याची प्रोसेस वेगाने होते. त्याशिवाय गरम पाण्याने भूकही कंट्रोल होतो. ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता.

३) रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हिवाळ्यात थंडीमुळे सर्दी-खोकला आणि इतर आजारांचा अधिक धोका असतो. कारण या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत असते. अशात गरम पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर पडतात.

४) बॉडी डिटॉक्स

गरम पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात. गरम पाण्याने घाम आणि लघवीच्या माध्यमातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. 

५) डोकेदुखी आणि तणाव कमी होतो

गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या मांसपेशींना आराम मिळतो आणि याने डोकेदुखी, तणाव आणि इतर शारीरिक वेदना कमी करण्यास मदत मिळते.

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे नुकसान

१) फार जास्त गरम पाणी घातक

जर पाण्याचं तापमान जास्त असेल तर याने तोंडात, घशात आणि पचन तंत्रातील नाजूक कोशिकांचं नुकसान होतं. जास्त गरम पाणी प्यायल्याने जळजळ, सूज, फोड होण्याची धोका असतो.

२) अवयवांचं नुकसान

जास्त काळ जास्त गरम पाणी प्यायल्याने अंतर्गत अवयवांचं नुकसान होतं. खासकरून हे अशा लोकांसाठी जास्त नुकसानकारक ठरतं, ज्यांना आधीच एखादी गॅस्ट्रिक समस्या आहे.

३) शरीराचं तापमान असंतुलित होणं

जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान असंतुलित होऊ शकतं. ज्यामुळे थकवा, चक्कर येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. 

४) कमी तहान लागणे

जर तुम्ही सतत गरम पाणी पित असाल तर याने शरीराला तहान कमी जाणवते. यामुळे शरीराची हायड्रेशन लेव्हल बिघडू शकते.

कधी प्यावं गरम पाणी?

सकाळी रिकाम्या पोटी

सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. याने शरीर डिटॉक्स होण्यास आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते.

जेवणाआधी आणि नंतर

जेवणाच्या जवळपास ३० मिनिटे आधी आणि जेवण झाल्यावर ३० मिनिटांनंतर कोमट पाणी प्यायल्याने पचन तंत्र मजबूत होतं आणि पोटातील वेदना कमी करण्यास मदत मिळते.

शरीराच्या गरजेनुसार

दिवसभरातून साधारण २ ते ३ वेळा कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. पण याचं सेवन व्यक्तीची शारीरिक स्थिती आणि आरोग्य यावर अवलंबून असतं.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य