शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या योग्य वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 10:09 IST

Drink Hot Water In Winter: गरम पाणी पिण्याचे काही नुकसानही आहेत. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे, नुकसान आणि पाणी पिण्याची योग्य वेळ याबाबत सांगणार आहोत.

Drink Hot Water In Winter: हिवाळ्यात गरम पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला जास्त उष्णतेची आणि एनर्जीची गरज असते. अशात गरम पाण्याने शरीर तर हायड्रेट राहतंच, सोबतच अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. मात्र, गरम पाणी पिण्याचे काही नुकसानही आहेत. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे, नुकसान आणि पाणी पिण्याची योग्य वेळ याबाबत सांगणार आहोत.

गरम पाणी पिण्याचे फायदे

१) पचन तंत्र मजबूत होतं

गरम पाणी प्यायल्याने पचन तंत्राला योग्यपणे काम करण्यास मदत मिळते. याने पोटातील अन्न वेगाने पचण्यास मदत होते आणि पचनासाठी आवश्यक एझांइम्सही रिलीज होण्यास मदत मिळते. हिवाळ्यात आपलं मेटाबॉलिज्म स्लो होतं, अशात गरम पाणी पचन योग्यपणे होण्यास फायदेशीर ठरतं.

२) वजन कमी होतं

गरम पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. गरम पाण्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्न होण्याची प्रोसेस वेगाने होते. त्याशिवाय गरम पाण्याने भूकही कंट्रोल होतो. ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता.

३) रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हिवाळ्यात थंडीमुळे सर्दी-खोकला आणि इतर आजारांचा अधिक धोका असतो. कारण या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत असते. अशात गरम पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर पडतात.

४) बॉडी डिटॉक्स

गरम पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात. गरम पाण्याने घाम आणि लघवीच्या माध्यमातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. 

५) डोकेदुखी आणि तणाव कमी होतो

गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या मांसपेशींना आराम मिळतो आणि याने डोकेदुखी, तणाव आणि इतर शारीरिक वेदना कमी करण्यास मदत मिळते.

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे नुकसान

१) फार जास्त गरम पाणी घातक

जर पाण्याचं तापमान जास्त असेल तर याने तोंडात, घशात आणि पचन तंत्रातील नाजूक कोशिकांचं नुकसान होतं. जास्त गरम पाणी प्यायल्याने जळजळ, सूज, फोड होण्याची धोका असतो.

२) अवयवांचं नुकसान

जास्त काळ जास्त गरम पाणी प्यायल्याने अंतर्गत अवयवांचं नुकसान होतं. खासकरून हे अशा लोकांसाठी जास्त नुकसानकारक ठरतं, ज्यांना आधीच एखादी गॅस्ट्रिक समस्या आहे.

३) शरीराचं तापमान असंतुलित होणं

जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान असंतुलित होऊ शकतं. ज्यामुळे थकवा, चक्कर येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. 

४) कमी तहान लागणे

जर तुम्ही सतत गरम पाणी पित असाल तर याने शरीराला तहान कमी जाणवते. यामुळे शरीराची हायड्रेशन लेव्हल बिघडू शकते.

कधी प्यावं गरम पाणी?

सकाळी रिकाम्या पोटी

सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. याने शरीर डिटॉक्स होण्यास आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते.

जेवणाआधी आणि नंतर

जेवणाच्या जवळपास ३० मिनिटे आधी आणि जेवण झाल्यावर ३० मिनिटांनंतर कोमट पाणी प्यायल्याने पचन तंत्र मजबूत होतं आणि पोटातील वेदना कमी करण्यास मदत मिळते.

शरीराच्या गरजेनुसार

दिवसभरातून साधारण २ ते ३ वेळा कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. पण याचं सेवन व्यक्तीची शारीरिक स्थिती आणि आरोग्य यावर अवलंबून असतं.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य