शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

आवळ्याच्या बियांचे इतके फायदे की रोजच खाल आवळे अन् उपयोग कराल बियांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 18:19 IST

आवळ्याच्या बियांची पावडर पाण्यातून पोटात घेतल्याने बरेचसे आजार दूर होतात. पाहूया आवळ्याच्या बियांमधील औषधी गुणधर्म.

हिवाळ्यात आवळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी समजले जाते. चवीला तुरट, गोड असणारा आवळा रोगप्रतिकारक्षमता वाढवतोच शिवाय त्वचा आणि केस, पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींवरही उपयुक्त आहे.

मात्र आपल्याला माहित आहे का की, आवळ्याच्या बियांमध्येसुद्धा भरपूर औषधी गुणधर्म आहेत. बऱ्याचदा आवळा खाल्ल्यानंतर आपण बिया टाकून देतो. त्याऐवजी या बिया उन्हात वाळवून त्याची पावडर करून वापरता येतात. आवळ्याच्या बियांपासून तयार केलेल्या पावडरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या बियांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी, कॅरोटिन, आयर्न आणि फायबर ही पोषक तत्त्वे आहेत. त्यामुळे आवळ्याच्या बियांची पावडर पाण्यातून पोटात घेतल्याने बरेचसे आजार दूर होतात. पाहूया आवळ्याच्या बियांमधील औषधी गुणधर्म.

खरुज, त्वचेवरील डाग, त्वचेला खाज येण्याची समस्या बऱ्याच दिवसांपासून असेल तर तुम्ही आवळ्याच्या बियांचा वापर करू शकता. या त्रासांवर या बिया अत्यंत गुणकारी आहेत. या बियांची पावडर वापरल्याने त्वचाविकार दूर होतात. याकरिता खोबरेल तेलात सुकलेली आवळ्याची बी वाटून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचाविकार असलेल्या जागी लावल्यास आराम मिळतो.

दीर्घकालीन बद्धकोष्ठतेने त्रस्त असलेल्यांकरिताही या बिया अत्यंत फायदेशीर आहेत. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी आवळ्याची बी वाटून त्याची पावडर बनवा. ही पावडर गरम पाण्यात घालून ते पाणी प्या. या बद्धकोष्ठता दूर होईल.

डोळ्यांना खाज येणे, जळजळ होणे, डोळे लाल होणे, अशी तक्रार असल्यास आवळ्याच्या बिया वाटून डोळ्यांच्या वर व खाली लावल्यास फायदा होतो.

अचानक उचकी लागली आणि बराच वेळ झाला तरी थांबत नसेल तर आवळ्याच्या बियांपासून तयार केलेली पावडर मधासोबत घ्या. या उपायामुळे काही मिनिटांतच उचकीची समस्या दूर होईल.

नाकाचा घोणा फुटल्याने नाकातून रक्त येते. अतिउष्णतेमुळे हा त्रास होतो. यावेळी आवळ्याची बी पाण्यात वाटावी. वाटलेली पेस्ट कपाळावर लावून झोपावे. यामुळे शरीराला थंडावा मिळून नाकातून रक्त येण्याच्या त्रासापासून आराम मिळतो.

आवळ्याच्या बिया वीर्यवर्धक आहेत. आवळ्याच्या 10 ग्रॅम बिया उन्हात वाळवाव्यात आणि वाटून त्याचे चूर्ण तयार करा. या चुर्णात 20 ग्रॅम पिठी साखर मिसळा. हे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास पाण्यातून 1 चमचा असे 15 दिवस घेतल्याने निद्रानाश दूर होतो. तसेच शुक्राणूजन्य आजार दूर व्हायला मदत होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स