शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

आवळ्याच्या बियांचे इतके फायदे की रोजच खाल आवळे अन् उपयोग कराल बियांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 18:19 IST

आवळ्याच्या बियांची पावडर पाण्यातून पोटात घेतल्याने बरेचसे आजार दूर होतात. पाहूया आवळ्याच्या बियांमधील औषधी गुणधर्म.

हिवाळ्यात आवळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी समजले जाते. चवीला तुरट, गोड असणारा आवळा रोगप्रतिकारक्षमता वाढवतोच शिवाय त्वचा आणि केस, पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींवरही उपयुक्त आहे.

मात्र आपल्याला माहित आहे का की, आवळ्याच्या बियांमध्येसुद्धा भरपूर औषधी गुणधर्म आहेत. बऱ्याचदा आवळा खाल्ल्यानंतर आपण बिया टाकून देतो. त्याऐवजी या बिया उन्हात वाळवून त्याची पावडर करून वापरता येतात. आवळ्याच्या बियांपासून तयार केलेल्या पावडरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या बियांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी, कॅरोटिन, आयर्न आणि फायबर ही पोषक तत्त्वे आहेत. त्यामुळे आवळ्याच्या बियांची पावडर पाण्यातून पोटात घेतल्याने बरेचसे आजार दूर होतात. पाहूया आवळ्याच्या बियांमधील औषधी गुणधर्म.

खरुज, त्वचेवरील डाग, त्वचेला खाज येण्याची समस्या बऱ्याच दिवसांपासून असेल तर तुम्ही आवळ्याच्या बियांचा वापर करू शकता. या त्रासांवर या बिया अत्यंत गुणकारी आहेत. या बियांची पावडर वापरल्याने त्वचाविकार दूर होतात. याकरिता खोबरेल तेलात सुकलेली आवळ्याची बी वाटून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचाविकार असलेल्या जागी लावल्यास आराम मिळतो.

दीर्घकालीन बद्धकोष्ठतेने त्रस्त असलेल्यांकरिताही या बिया अत्यंत फायदेशीर आहेत. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी आवळ्याची बी वाटून त्याची पावडर बनवा. ही पावडर गरम पाण्यात घालून ते पाणी प्या. या बद्धकोष्ठता दूर होईल.

डोळ्यांना खाज येणे, जळजळ होणे, डोळे लाल होणे, अशी तक्रार असल्यास आवळ्याच्या बिया वाटून डोळ्यांच्या वर व खाली लावल्यास फायदा होतो.

अचानक उचकी लागली आणि बराच वेळ झाला तरी थांबत नसेल तर आवळ्याच्या बियांपासून तयार केलेली पावडर मधासोबत घ्या. या उपायामुळे काही मिनिटांतच उचकीची समस्या दूर होईल.

नाकाचा घोणा फुटल्याने नाकातून रक्त येते. अतिउष्णतेमुळे हा त्रास होतो. यावेळी आवळ्याची बी पाण्यात वाटावी. वाटलेली पेस्ट कपाळावर लावून झोपावे. यामुळे शरीराला थंडावा मिळून नाकातून रक्त येण्याच्या त्रासापासून आराम मिळतो.

आवळ्याच्या बिया वीर्यवर्धक आहेत. आवळ्याच्या 10 ग्रॅम बिया उन्हात वाळवाव्यात आणि वाटून त्याचे चूर्ण तयार करा. या चुर्णात 20 ग्रॅम पिठी साखर मिसळा. हे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास पाण्यातून 1 चमचा असे 15 दिवस घेतल्याने निद्रानाश दूर होतो. तसेच शुक्राणूजन्य आजार दूर व्हायला मदत होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स