शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

हिवाळ्यात आंघोळ करताना बहुतेक लोक करत आहेत 'ही' चूक, वाढू शकतो हार्ट अटॅकचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 16:23 IST

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी हलके अन्न खावे, पुरेसे लोकरीचे कपडे घालावेत. व्यायाम करावा.

आंघोळीचा मार्ग आपल्या हृदयाचे आरोग्य ठरवतो. असे बरेच लोक आहेत जे अत्यंत थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करतात जे धोकादायक ठरू शकतं. तर दुसरीकडे, काही लोक थंडीत खूप गरम पाण्याने आंघोळ करतात आणि हे आपल्या हृदयासाठी धोकादायक देखील ठरू शकते. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. यामुळे आपल्या हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो. अशा परिस्थितीत थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक ठरू शकते

कोमट पाण्याने आंघोळ करणे सुरक्षित 

आरोग्य तज्ञांच्या मते, कोमट पाणी आपल्या शरीराला अचानक झटका देत नाही आणि ते शरीराचे तापमान राखते. खरंतर, कोमट पाणी शरीराचे तापमान वाढवते आणि रक्ताभिसरण वाढवते. हिवाळ्यात जेव्हा आपण थंड पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा संपूर्ण शरीर थरथर कापते. डॉ. करुण बहल, हृदयरोगतज्ज्ञ, फोर्टिस हॉस्पिटल, मोहाली म्हणतात, 'जेव्हा आपण थंड पाण्याच्या संपर्कात येतो, तेव्हा आपत्कालीन परिस्थिती असल्याप्रमाणे आपले शरीर प्रतिक्रिया देते. 

रक्ताभिसरण जलद होते आणि बाकीच्या अवयवांचे रक्षण करण्यासाठी आपले हृदय देखील जलद रक्त पंप करू लागते. अशा आपत्कालीन परिस्थितीत हृदय त्वचेजवळील रक्ताभिसरण थांबवते, ज्यामुळे आपण थरथर कापू लागतो. आणि जेव्हा आपण थरथर कापतो तेव्हा ते हृदयावर अधिक दबाव टाकते. त्याचबरोबर अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने चयापचय आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे लक्षात घेऊन, अनेक फिटनेस फ्रिक हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करतात, परंतु ते हे विसरतात की अशा चाचण्यांमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त अशा लोकांचा समावेश होतो ज्यांना कोणताही आजार नाही.

डॉ बहल म्हणतात, 'जेव्हा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुमच्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो. यामुळे आपल्या हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसात अचानक गरम पाण्याने अंघोळ केल्याने रक्तदाब झपाट्याने कमी होऊन हृदयावर ताण वाढतो. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा. पाय धुवून आंघोळीला सुरुवात करा आणि आंघोळीनंतर लगेच अंगाला टॉवेल गुंडाळा.

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?

डॉ बहल सांगतात, 'हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी हलके अन्न खावे, पुरेसे लोकरीचे कपडे घालावेत. व्यायाम करावा आणि कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास नियमित औषध घ्यावे. काहीवेळा अशा हवामानात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना औषधाच्या जास्त डोसची आवश्यकता असते. म्हणूनच हृदयरोगतज्ज्ञांचा नियमित सल्ला घेत राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स