शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ; 'या' आजारांवर अधिक खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 9:01 AM

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशात प्रत्येक मिनिटाला 9 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अशा 'आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'चा लाभ अवघ्या वर्षभरात अनेकांनी घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थींची संख्या 50 लाखांहून अधिक झाली आहे.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशात प्रत्येक मिनिटाला 9 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रमुख आरोग्य योजनेमार्फत 32 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकांच्या उपचारासाठी 7,901 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.    

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) च्या आकड्यानुसार, 60 टक्क्यांहून अधिक निधी तृतीय श्रेणीतील उपचारांसाठी खर्च करण्यात आले  आहे. तृतीय श्रेणीत ज्या आजारांवर उपचार केले, त्यामध्ये कॉर्डिओलॉजी, ऑर्थोपॅडिक, रेडिएशन, ओंकोलॉजी, कार्डिओ-थोरॅसिक, वॅस्कुलर सर्जरी आणि युरोलॉजी संबंधीत होते.

आयुष्मान भारत योजनेला गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ आणि आंध्र प्रदेशातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, संपूर्ण देशात 18,486 रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. यामध्ये 53 टक्के खासगी आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. तसेच, 50,000 अधिक पोर्टेबिलिटीची प्रकरणे सुद्धा समोर आली आहे. ज्यामध्ये प्रवासी, तसेच प्रवास करण्यास पात्र असलेल्या लोकांनी आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन या योजणेमार्फत उपचार करून घेतले आहेत.   

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय