शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मुतखडा पडेल बाहेर, मुळव्याधचा त्रास कायमचा बरा करण्यासाठी खास रान भाजी, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 11:48 IST

अनेक गंभीर समस्यांचे उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. असाच एक उपाय आज आम्ही सांगणार आहोत.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांची लाइफस्टाईल खूपच बदलली आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होणाऱ्या मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे मुतखडा आणि मुळव्याध. या दोन्ही समस्या फार जास्त वेदना देणाऱ्या असतात. लोकांचं उठणं-बसणं या समस्यांमुळे मुश्किल होऊन जातं. अशात ज्या लोकांना या समस्या असतील त्यांच्यासाठी आम्ही एक खास आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहोत. 

आयुर्वेदाचा वापर करून अनेक समस्या दूर करण्याची परंपरा खूप आधीपासून चालत आली आहे. अनेक गंभीर समस्यांचे उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. असाच एक उपाय आज आम्ही सांगणार आहोत. ज्याचा वापर केल्यास तुमचा मुतखडा बाहेर पडेल आणि मुळव्याधाची समस्याही लगेच दूर होईल. आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून एका भाजीबाबत सांगितलं आहे. या भाजीचं काही दिवस सेवन केल्याने मुतखडा आणि मुळव्याध दूर होईल. सोबतच शरीराला इतर फायदेही मिळतील.

शक्तीशाली भाजी

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं की, "तांदळज्याची भाजी खाऊन तुम्ही या समस्या दूर करू शकता. तसेच या भाजीचं नियमित सेवन केल्याने पोट साफ होतं, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. फक्त ही भाजी करताना तेल न वापरता थोडं तूप वापरावं. इतकंच नाही तर जुलाब थांबवण्याचं कामही ही भाजी करते. या भाजीमध्ये फायबर भरपूर असल्याने पोट चांगलं राहतं आणि पोट भरलेलं राहतं. लघवी साफ होत नसेल तर ही समस्या सुद्धा या भाजीने दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ही भाजी खायची. जेणेकरून या समस्या तुमच्यापासून दूर राहतील".

तांदुळज्याच्या भाजीचे फायदे

तांदुळज्याची भाजी ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या भाजीतून शरीराला सी जीवनसत्त्व मिळतात. या भाजीच्या सेवनाने शरीरातील विष कमी होतं, पित्त कमी होतं, मूळव्याध, मुतखडा असा समस्या दूर होतात. तसेच ही भाजी डोळ्यांसाठीही चांगली असते. इतकंच नाही तर या भाजीच्या सेवनाने उष्णता कमी करण्यासही मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यAyurvedic Home Remediesघरगुती उपाय