शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मुतखडा पडेल बाहेर, मुळव्याधचा त्रास कायमचा बरा करण्यासाठी खास रान भाजी, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 11:48 IST

अनेक गंभीर समस्यांचे उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. असाच एक उपाय आज आम्ही सांगणार आहोत.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांची लाइफस्टाईल खूपच बदलली आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होणाऱ्या मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे मुतखडा आणि मुळव्याध. या दोन्ही समस्या फार जास्त वेदना देणाऱ्या असतात. लोकांचं उठणं-बसणं या समस्यांमुळे मुश्किल होऊन जातं. अशात ज्या लोकांना या समस्या असतील त्यांच्यासाठी आम्ही एक खास आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहोत. 

आयुर्वेदाचा वापर करून अनेक समस्या दूर करण्याची परंपरा खूप आधीपासून चालत आली आहे. अनेक गंभीर समस्यांचे उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. असाच एक उपाय आज आम्ही सांगणार आहोत. ज्याचा वापर केल्यास तुमचा मुतखडा बाहेर पडेल आणि मुळव्याधाची समस्याही लगेच दूर होईल. आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून एका भाजीबाबत सांगितलं आहे. या भाजीचं काही दिवस सेवन केल्याने मुतखडा आणि मुळव्याध दूर होईल. सोबतच शरीराला इतर फायदेही मिळतील.

शक्तीशाली भाजी

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं की, "तांदळज्याची भाजी खाऊन तुम्ही या समस्या दूर करू शकता. तसेच या भाजीचं नियमित सेवन केल्याने पोट साफ होतं, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. फक्त ही भाजी करताना तेल न वापरता थोडं तूप वापरावं. इतकंच नाही तर जुलाब थांबवण्याचं कामही ही भाजी करते. या भाजीमध्ये फायबर भरपूर असल्याने पोट चांगलं राहतं आणि पोट भरलेलं राहतं. लघवी साफ होत नसेल तर ही समस्या सुद्धा या भाजीने दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ही भाजी खायची. जेणेकरून या समस्या तुमच्यापासून दूर राहतील".

तांदुळज्याच्या भाजीचे फायदे

तांदुळज्याची भाजी ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या भाजीतून शरीराला सी जीवनसत्त्व मिळतात. या भाजीच्या सेवनाने शरीरातील विष कमी होतं, पित्त कमी होतं, मूळव्याध, मुतखडा असा समस्या दूर होतात. तसेच ही भाजी डोळ्यांसाठीही चांगली असते. इतकंच नाही तर या भाजीच्या सेवनाने उष्णता कमी करण्यासही मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यAyurvedic Home Remediesघरगुती उपाय