शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळ करताना 'या' चुका टाळा, अन्यथा गंभीर दुष्परिणामांमुळे पस्तावण्याची वेळ येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:04 IST

आंघोळ करताना आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर, त्याचे दुष्परिणाम होऊ (Mistakes made while bathing) शकतात.

अंघोळ करताना (bathing) नकळतपणे काही चुका आपल्या हातून केल्या जातात. त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळं तुमच्या त्वचेलाच नाही तर, केसांनाही मोठं नुकसान होऊ शकतं. साबण आणि शाम्पूमध्ये रासायनिक पदार्थ असतात. आंघोळ करताना आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर, त्याचे दुष्परिणाम होऊ (Mistakes made while bathing) शकतात.

आज तकने दिलेल्या बातमीनुसार, मेडिसिन डायरेक्टचे सुपरिटेंडेंट फार्मासिस्ट हुसेन अब्देह यांनी यापैकी काही चुकांचा अभ्यास केला आहे. बहुतेक साबण किंवा शाम्पू बराच वेळ लावल्यानंतर त्वचा कोरडी होऊ लागते, असं त्यांचं म्हणणं आहे. साबण किंवा शाम्पू वापरल्यानंतर पाण्यानं शरीर आणि केस व्यवस्थित धुणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमची त्वचा कोरडी होऊ शकते, त्वचेला तडे जाऊ शकतात.

याशिवाय, तज्ज्ञांनी शॉवरखाली बराच वेळ उभं न राहण्याविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले की, बराच वेळ आंघोळ केल्यानंतरही त्वचा कोरडी होते. याशिवाय, त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो आणि ती संवेदनशील होऊ शकते. तज्ज्ञांनी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ शॉवर घेणं अयोग्य मानलं आहे.

हार्वर्ड हेल्थच्या म्हणण्यानुसार, शाम्पू, कंडिशनर आणि साबणांमध्ये असलेलं तेल, परफ्यूम आणि इतर घटकांचेही तोटे आहेत. हे सर्व पदार्थ अ‌ॅलर्जीही निर्माण करू शकतात. वेळच्या वेळी अंघोळ करणं आणि अंघोळीचा कालावधी असे दोन्ही महत्त्वाचे आहेत, असं आरोग्य संस्थेनं सूचित केलंय. तथापि, दोन अंघोळींदरम्यान किती कालावधी असावा, याचा आदर्श त्यांनी सेट केलेला नाही.

तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ अंघोळ केल्यानं त्वचेला तडे जाऊ शकतात; ज्यामुळं, बॅक्टेरिया किंवा अ‌ॅलर्जी निर्माण करणारे घटक त्वचेत सहज प्रवेश करू शकतात. अँटीबॅक्टेरियल साबण त्वचेवर असलेले आणि आपल्याला आवश्यक असलेले सामान्य जीवाणू देखील नष्ट करतो. यामुळं त्वचेवरील सूक्ष्मजंतूंचं संतुलन बिघडतं. यामुळं प्रतिजैविकांना (अँटीबायोटिक्स) रोखून अधिक ताकद असलेल्या सूक्ष्मजंतूंना त्वचेवर वाढू लागण्यास अनुकूलता मिळते. यामुळं आपल्याला आजारांना सामोरं जावं लागतं.

याव्यतिरिक्त, आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीला सामान्य सूक्ष्मजीव, अस्वच्छता आणि इतर पर्यावरणीय प्रदर्शनांद्वारे संरक्षणात्मक प्रतिपिंड आणि रोगप्रतिकारक स्मरणशक्तीसाठी विशिष्ट प्रमाणात उत्तेजनाची आवश्यकता असते. याशिवाय, ज्या पाण्यानं आपण आपलं शरीर स्वच्छ करतो त्यात क्षार, जड धातू, क्लोरीन, फ्लोराईड, कीटकनाशके आणि सर्व प्रकारची रसायने असतात. पाण्यात असलेले हे घटकदेखील समस्या निर्माण करू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स