शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

सिद्धू यांच्या पत्नीने ४० दिवसात कॅन्सरला दिली मात, जाणून घ्या काय होता आयुर्वेदिक आहार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 10:55 IST

सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली.

माजी क्रिकेटपटू आणि नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज ४ चा कॅन्सर निदान झाला होता. हा कॅन्सर इतका वाढला होता की, डॉक्टरांनी जगण्याची केवळ ३ टक्के आशा व्यक्त केली होती. तरीही त्यांच्या पत्नीने हार न मानता, सर्जरी, थेरपी आणि इच्छाशक्तीसोबत लाइफस्टाईलवर लक्ष दिलं. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आता त्यांची पत्नी पूर्णपणे कॅन्सरमधून बाहेर पडली असून यात डाएटने तिला खूप मदत केली.

सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली. ज्यानंतर ४० दिवसांमध्येच ४ स्टेजच्या कॅन्सरमधून बाहेर पडता आलं. ही डाएट कॅन्सरशिवाय फॅटी लिव्हर कमी करण्यासही मदत करते. त्यांनी २५ किलो वजनही कमी केलं. ज्या डाएटचा सिद्धू यांनी उल्लेख केला ती पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. 

सिद्धू यांनी सांगितलं की, कॅन्सरला हरवण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागतो, जो कॅन्सरचा उपचार आहे तोच फॅटी लिव्हरचाही आहे. तुम्ही कॅन्सर सेल्सना शुगर आणि कार्बोहायड्रेट्स देऊ नका. कॅन्सरच्या पेशी आपोआप नष्ट होतील.

कॅन्सरमध्ये घेतला असा चहा

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीने कॅन्सरच्या उपचारादरम्यान हर्बल चहा घेतला. यासाठी दालचीनी, काळी मिरी, लवंग, छोटी वेलची टाकून पाण्यात टाकून उकडली. यात थोडा गूळ टाकला होता.

जेवणाची वेळ महत्वाची

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी सांयकाळी ६ ते ६.३० वाजता जेवण करत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता लिंबू पाण्याने सुरूवात करत होती. डाएटमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-कॅन्सर असलेले फूड्स होते.

कशी व्हायची दिवसाची सुरूवात?

सगळ्यात आधी लिंबू पाण्याने दिवसाची सुरूवात होत होती. त्यासोबत कच्ची हळद, एक लसूण आणि अ‍ॅपल व्हिनेगर दिलं जात होतं. त्यासोबतच अर्ध्या तासानंतर १० ते १२ कडूलिंबाची पाने दिली जात होती. 

धान्याने कॅन्सर होईल नष्ट

त्यानंतर नट्स, पांढऱ्या पेठ्याचा ज्यूस, एक ग्लास ज्यूस दिला जात होता. ज्यूस तयार करण्यासाठी बीट, गाजर आणि एक आवळा टाकला जात होता. नंतर सायंकाळी रात्रीचं जेवण, ज्यात भात आणि चपाती नव्हती. त्यात केवळ क्विनोआ देत होते. कारण हेच एक धान्य अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-कॅन्सर आहे. सोबतच नारळाचा वापर करूनही फायदेशीर आहे.

कसं पाणी दिलं?

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीला असं पाणी दिलं जातं होतं ज्याचं पीएच लेव्हल ७ असावी. कारण आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग यापासूनच बनला आहे. त्यामुळे कॅन्सरला हरवण्यासाठी त्यावर लक्ष दिलं पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोगNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू