शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू यांच्या पत्नीने ४० दिवसात कॅन्सरला दिली मात, जाणून घ्या काय होता आयुर्वेदिक आहार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 10:55 IST

सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली.

माजी क्रिकेटपटू आणि नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज ४ चा कॅन्सर निदान झाला होता. हा कॅन्सर इतका वाढला होता की, डॉक्टरांनी जगण्याची केवळ ३ टक्के आशा व्यक्त केली होती. तरीही त्यांच्या पत्नीने हार न मानता, सर्जरी, थेरपी आणि इच्छाशक्तीसोबत लाइफस्टाईलवर लक्ष दिलं. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आता त्यांची पत्नी पूर्णपणे कॅन्सरमधून बाहेर पडली असून यात डाएटने तिला खूप मदत केली.

सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली. ज्यानंतर ४० दिवसांमध्येच ४ स्टेजच्या कॅन्सरमधून बाहेर पडता आलं. ही डाएट कॅन्सरशिवाय फॅटी लिव्हर कमी करण्यासही मदत करते. त्यांनी २५ किलो वजनही कमी केलं. ज्या डाएटचा सिद्धू यांनी उल्लेख केला ती पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. 

सिद्धू यांनी सांगितलं की, कॅन्सरला हरवण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागतो, जो कॅन्सरचा उपचार आहे तोच फॅटी लिव्हरचाही आहे. तुम्ही कॅन्सर सेल्सना शुगर आणि कार्बोहायड्रेट्स देऊ नका. कॅन्सरच्या पेशी आपोआप नष्ट होतील.

कॅन्सरमध्ये घेतला असा चहा

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीने कॅन्सरच्या उपचारादरम्यान हर्बल चहा घेतला. यासाठी दालचीनी, काळी मिरी, लवंग, छोटी वेलची टाकून पाण्यात टाकून उकडली. यात थोडा गूळ टाकला होता.

जेवणाची वेळ महत्वाची

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी सांयकाळी ६ ते ६.३० वाजता जेवण करत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता लिंबू पाण्याने सुरूवात करत होती. डाएटमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-कॅन्सर असलेले फूड्स होते.

कशी व्हायची दिवसाची सुरूवात?

सगळ्यात आधी लिंबू पाण्याने दिवसाची सुरूवात होत होती. त्यासोबत कच्ची हळद, एक लसूण आणि अ‍ॅपल व्हिनेगर दिलं जात होतं. त्यासोबतच अर्ध्या तासानंतर १० ते १२ कडूलिंबाची पाने दिली जात होती. 

धान्याने कॅन्सर होईल नष्ट

त्यानंतर नट्स, पांढऱ्या पेठ्याचा ज्यूस, एक ग्लास ज्यूस दिला जात होता. ज्यूस तयार करण्यासाठी बीट, गाजर आणि एक आवळा टाकला जात होता. नंतर सायंकाळी रात्रीचं जेवण, ज्यात भात आणि चपाती नव्हती. त्यात केवळ क्विनोआ देत होते. कारण हेच एक धान्य अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-कॅन्सर आहे. सोबतच नारळाचा वापर करूनही फायदेशीर आहे.

कसं पाणी दिलं?

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीला असं पाणी दिलं जातं होतं ज्याचं पीएच लेव्हल ७ असावी. कारण आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग यापासूनच बनला आहे. त्यामुळे कॅन्सरला हरवण्यासाठी त्यावर लक्ष दिलं पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोगNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू