शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

5 दिवस रोज एक नारळ पाणी प्यायल्याने या गंभीर आजारांपासून होऊ शकतो बचाव, एकदा कराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 10:29 IST

एक्सपर्टकडून जाणून घेऊ 5 दिवस नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात आणि कोणत्या आजारांपासून बचाव होतो.

नारळाचं पाणी हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. नारळाचं पाणी प्यायल्याने हृदय चांगलं राहतं, किडनी चांगली राहते, वजन कमी होतं, त्वचेचा रंग सुधारतो आणि डायबिटीससारखा आजारही कंट्रोलमध्ये राहतो. नारळाचं पाणी हे पोषक तत्वांचं पावर हाऊस आहे. ज्यात पोटॅशिअम, लॉरिक अॅसिड, मॅग्नेशिअम आणि झिंक भरपूर असतं. 

लाइफस्टाईल एक्सपर्ट डॉ. बिमल झांजेर यांच्यानुसार, नारळाचं पाणी पूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतं. यात कॅलरी फार कमी असतात. यात 95 टक्के पाणी असतं. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.

फॅट फ्री नारळाचं पाणी हृदय निरोगी ठेवतं आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. चला एक्सपर्टकडून जाणून घेऊ 5 दिवस नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात आणि कोणत्या आजारांपासून बचाव होतो.

हृदयरोगांपासून बचाव

नारळाच्या पाण्यात फॅट असतं, पण त्यातील पाणी फॅट फ्री असतं. नारळाचं पाणी प्यायल्याने हृदयरोगांपासून बचाव होतो. हृदयरोगाच्या रूग्णांनीही नारळ पाण्याचं सेवन करावं याने हृदय फीट राहतं. नारळ पाण्यात 95 टक्के पाणी असतं आणि कोलेस्ट्रॉल अजिबात नसतं. नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम भरपूर असतं, जे कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करतं. 

'डिहायड्रेशन' करेल कंट्रोल

रोज नारळ पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते आणि शरीर हायड्रेट राहतं. उन्हाळ्यात याने फार फायदा मिळतो.

किडनी स्टोनपासून बचाव

किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी नारळाचं पाणी फार फायदेशीर ठरतं. नारळाचं पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं आणि किडनीही निरोगी ठेवतं. एक कप नारळ पाण्यात 600 मिली ग्रॅम पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनी हेल्दी राहते आणि किडनी स्टोनपासूनही बचाव होतो.

केसांना पोषक तत्व देतं नारळ पाणी

अॅंटी-ऑक्सिडेंट, लॉरिक अॅसिड, बी व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअम असलेलं नारळ पाणी केसांना पोषण देतं. याचं सेवन केल्याने डोक्याची त्वचा चांगली राहते.

डायबिटीसही राहतं कंट्रोल

नारळाचं पाणी प्यायल्याने डायबिटीस कंट्रोल राहतो. शुगरच्या रूग्णांनी नारळाच्या पाण्याचं सेवन केलं तर शरीर हायड्रेट राहतं. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता याने पूर्ण होते.

लठ्ठपणा कमी होतो

नारळ पाण्याचं सेवन केल्याने लठ्ठपणा कंट्रोलमध्ये राहतो. याचं सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. भूकही कंट्रोल राहते. वजन कमी करण्यासाठी या पाण्याचं सेवन करणं फार उपयोगी आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य