शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

5 दिवस रोज एक नारळ पाणी प्यायल्याने या गंभीर आजारांपासून होऊ शकतो बचाव, एकदा कराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 10:29 IST

एक्सपर्टकडून जाणून घेऊ 5 दिवस नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात आणि कोणत्या आजारांपासून बचाव होतो.

नारळाचं पाणी हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. नारळाचं पाणी प्यायल्याने हृदय चांगलं राहतं, किडनी चांगली राहते, वजन कमी होतं, त्वचेचा रंग सुधारतो आणि डायबिटीससारखा आजारही कंट्रोलमध्ये राहतो. नारळाचं पाणी हे पोषक तत्वांचं पावर हाऊस आहे. ज्यात पोटॅशिअम, लॉरिक अॅसिड, मॅग्नेशिअम आणि झिंक भरपूर असतं. 

लाइफस्टाईल एक्सपर्ट डॉ. बिमल झांजेर यांच्यानुसार, नारळाचं पाणी पूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतं. यात कॅलरी फार कमी असतात. यात 95 टक्के पाणी असतं. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.

फॅट फ्री नारळाचं पाणी हृदय निरोगी ठेवतं आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. चला एक्सपर्टकडून जाणून घेऊ 5 दिवस नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात आणि कोणत्या आजारांपासून बचाव होतो.

हृदयरोगांपासून बचाव

नारळाच्या पाण्यात फॅट असतं, पण त्यातील पाणी फॅट फ्री असतं. नारळाचं पाणी प्यायल्याने हृदयरोगांपासून बचाव होतो. हृदयरोगाच्या रूग्णांनीही नारळ पाण्याचं सेवन करावं याने हृदय फीट राहतं. नारळ पाण्यात 95 टक्के पाणी असतं आणि कोलेस्ट्रॉल अजिबात नसतं. नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम भरपूर असतं, जे कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करतं. 

'डिहायड्रेशन' करेल कंट्रोल

रोज नारळ पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते आणि शरीर हायड्रेट राहतं. उन्हाळ्यात याने फार फायदा मिळतो.

किडनी स्टोनपासून बचाव

किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी नारळाचं पाणी फार फायदेशीर ठरतं. नारळाचं पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं आणि किडनीही निरोगी ठेवतं. एक कप नारळ पाण्यात 600 मिली ग्रॅम पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनी हेल्दी राहते आणि किडनी स्टोनपासूनही बचाव होतो.

केसांना पोषक तत्व देतं नारळ पाणी

अॅंटी-ऑक्सिडेंट, लॉरिक अॅसिड, बी व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअम असलेलं नारळ पाणी केसांना पोषण देतं. याचं सेवन केल्याने डोक्याची त्वचा चांगली राहते.

डायबिटीसही राहतं कंट्रोल

नारळाचं पाणी प्यायल्याने डायबिटीस कंट्रोल राहतो. शुगरच्या रूग्णांनी नारळाच्या पाण्याचं सेवन केलं तर शरीर हायड्रेट राहतं. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता याने पूर्ण होते.

लठ्ठपणा कमी होतो

नारळ पाण्याचं सेवन केल्याने लठ्ठपणा कंट्रोलमध्ये राहतो. याचं सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. भूकही कंट्रोल राहते. वजन कमी करण्यासाठी या पाण्याचं सेवन करणं फार उपयोगी आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य