शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

5 दिवस रोज एक नारळ पाणी प्यायल्याने या गंभीर आजारांपासून होऊ शकतो बचाव, एकदा कराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 10:29 IST

एक्सपर्टकडून जाणून घेऊ 5 दिवस नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात आणि कोणत्या आजारांपासून बचाव होतो.

नारळाचं पाणी हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. नारळाचं पाणी प्यायल्याने हृदय चांगलं राहतं, किडनी चांगली राहते, वजन कमी होतं, त्वचेचा रंग सुधारतो आणि डायबिटीससारखा आजारही कंट्रोलमध्ये राहतो. नारळाचं पाणी हे पोषक तत्वांचं पावर हाऊस आहे. ज्यात पोटॅशिअम, लॉरिक अॅसिड, मॅग्नेशिअम आणि झिंक भरपूर असतं. 

लाइफस्टाईल एक्सपर्ट डॉ. बिमल झांजेर यांच्यानुसार, नारळाचं पाणी पूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतं. यात कॅलरी फार कमी असतात. यात 95 टक्के पाणी असतं. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.

फॅट फ्री नारळाचं पाणी हृदय निरोगी ठेवतं आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. चला एक्सपर्टकडून जाणून घेऊ 5 दिवस नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात आणि कोणत्या आजारांपासून बचाव होतो.

हृदयरोगांपासून बचाव

नारळाच्या पाण्यात फॅट असतं, पण त्यातील पाणी फॅट फ्री असतं. नारळाचं पाणी प्यायल्याने हृदयरोगांपासून बचाव होतो. हृदयरोगाच्या रूग्णांनीही नारळ पाण्याचं सेवन करावं याने हृदय फीट राहतं. नारळ पाण्यात 95 टक्के पाणी असतं आणि कोलेस्ट्रॉल अजिबात नसतं. नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम भरपूर असतं, जे कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करतं. 

'डिहायड्रेशन' करेल कंट्रोल

रोज नारळ पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते आणि शरीर हायड्रेट राहतं. उन्हाळ्यात याने फार फायदा मिळतो.

किडनी स्टोनपासून बचाव

किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी नारळाचं पाणी फार फायदेशीर ठरतं. नारळाचं पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं आणि किडनीही निरोगी ठेवतं. एक कप नारळ पाण्यात 600 मिली ग्रॅम पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनी हेल्दी राहते आणि किडनी स्टोनपासूनही बचाव होतो.

केसांना पोषक तत्व देतं नारळ पाणी

अॅंटी-ऑक्सिडेंट, लॉरिक अॅसिड, बी व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअम असलेलं नारळ पाणी केसांना पोषण देतं. याचं सेवन केल्याने डोक्याची त्वचा चांगली राहते.

डायबिटीसही राहतं कंट्रोल

नारळाचं पाणी प्यायल्याने डायबिटीस कंट्रोल राहतो. शुगरच्या रूग्णांनी नारळाच्या पाण्याचं सेवन केलं तर शरीर हायड्रेट राहतं. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता याने पूर्ण होते.

लठ्ठपणा कमी होतो

नारळ पाण्याचं सेवन केल्याने लठ्ठपणा कंट्रोलमध्ये राहतो. याचं सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. भूकही कंट्रोल राहते. वजन कमी करण्यासाठी या पाण्याचं सेवन करणं फार उपयोगी आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य