शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

ब्लड शुगर कमी करण्याचं सर्वात स्वस्त औषध ओवा, महागड्या औषधांची गरजच नाही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 11:32 IST

आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मसाले खूप फायदेशीर ठरत असतात.  

सध्याच्या काळात  मधुमेह आणि  रक्तदाबासंबंधी आजार अनेकांना उद्भवत असतात.  अनेकदा रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले की परत नियंत्रणात आणणं कठिण होऊन बसतं. आज आम्ही तुम्हाला ओव्याचा वापर करून कशाप्रकारे शरीर चांगलं ठेवता येईल याबाबत सांगणार आहोत. 

भारतात अनेक मसाल्याच्या पदार्थांचा समावेश आहारात केला जातो.  आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मसाले खूप फायदेशीर ठरत असतात.  घरात जेवण झाल्यानंतर तोंडाला चव येण्यासाठी  किंवा खालेल्या पदार्थांचे पचन करण्यासाठी मुखवास खाण्याची पद्धत आहे. मुखवासासाठी बऱ्याचदा ओवादेखील वापरण्यात येतो. शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पोषक तत्व यात असतात. 

जास्त जेवण झाल्यास अथवा  बाहेरचे पदार्थ खाण्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होतो. अपचनामुळे पोटात गॅस झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. अशा वेळी एखादे  गोळी  घेण्यापेक्षा ओवा तव्यावर तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळू शकतो. कारण ओव्याने तुमच्या पोटातील गॅस लगेच कमी होण्यास मदत होते.

मधुमेहासाठी ओव्याचे फायदे

ओव्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक असतात. नियमीतपणे एक चमचा  कडुलिंबाची  पावडर, अर्धा चमचा जीरा पावडर आणि ओव्याच्या बिया एकत्र करून  एक ग्लास गरम दूधात घालून प्यायल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होईल. 

गॅस, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. वजन कमी करण्यासाठी तसंच डायबिटिज  टाईप २ चा धोका कमी करण्यासाठी  ओव्याचा आहारात समावेश केला जातो. डायबिटीस आणि वजन कमी करण्याशिवाय ओव्याचे अनेक फायदे आहेत.

नियमित ओव्याचे सेवन केल्याने  ह्रदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच महिलांना मासिक पाळीच्या वेळी कंबरदुखी आणि पोटदुखीचा अतिशय त्रास होतो. अश्या वेळी  ओवा, गरम पाण्याबरोबर घेतल्याने कंबरदुखी आणि पोटदुखी कमी होते. 

इन्फेक्शन मुळे हिरड्यांना सूज येते, तेव्हा ओव्याच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यामध्ये घाला. या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी देखील ओवा उपयुक्त आहे. ओवा घालून ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीराची पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

खाज-खुजली येत असेल किंवा कुठे जळालं असेल तर, ओवा बारीक करुन तेथे लावा आणि ४ ते ५ तास लावून ठेवा. यामुळे फायदा होईल. ( हे पण वाचा-Corona virus : कोणत्या वयाच्या लोकांना बसतो कोरोना व्हायसरचा जास्त फटका)

सतत खोकला येत असेल तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे. त्यामुळे आरोग्य चांगलं राहील. ( हे पण वाचा- वेलचीच्या पाण्याने कसं झटपट वजन कमी होतं वाचाल, तर आजपासून सुरू कराल सेवन!)

सध्या  कोरोना व्हायरसचा धोका  जास्त आहे. त्यामुळे कोणत्याही आजाराला घाबरण्याआधी तुम्ही मसाल्याचा आहारात समावेश केला तर जास्त चांगलं ठरेल. म्हणून सकाळी उठल्यानंतर ओव्याचं पाणी प्याल तर तुमची रोगप्रतिकारकशक्ती सुधारेल आणि  इन्फेक्शन  होण्यापासून बचाव करता येईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स