शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

तोंडाची दुर्गंधी आहे या गंभीर आजारांचा संकेत, आयुर्वेद डॉक्टरने सांगितले काही खास उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 13:03 IST

Bad Breath Tips: आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं, जास्त फळं-भाज्या खायला हव्यात.

Bad Breath Tips: तोंडाची दुर्गंधी येणं ही अनेकांना होणारी समस्या आहे. ही समस्या दात आणि आतड्यांचं आरोग्य बिघडल्याने, अॅसिडीटीमुळे, मधुमेहामुळे, फुप्फुसाच्या संक्रमणामुळे किंवा इतकंच काय तर पाणी कमी प्यायल्यानेही होऊ शकते. त्यासोबतच दातांना रोज ब्रश न केल्याने तोंडात बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. सोबतच धुम्रपान करणं आणि तंबाखू खाणं यामुळेही तोंडाची दुर्गंधी येते. बऱ्याच दिवसांपासून तोंडाची दुर्गंधी येत असेल तर हा पेरिडोंटल किंवा हिरड्यांच्या आजाराचा संकेत असू शकतो.

आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं, जास्त फळं-भाज्या खायला हव्यात. तसेच शुगरयुक्त पदार्थ खाणं टाळलं आणि तंबाखूयुक्त पदार्थ खाणं टाळलं तर तोंडाची दुर्गंधी दूर होऊ शकते. डॉ.भावसार यांनी 5 टिप्स सांगितल्या आहेत ज्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते.

दिवसातून दोन वेळा ब्रश करा

सकाळी ब्रश केल्याने आणि जीभ स्वच्छ केल्याने रात्रभर तोंडात जमा झालेले विषारी पदार्थ नष्ट करण्यास मदत मिळते. जर तुम्ही रात्रीही झोपण्याआधी ब्रश केला आणि जीभ स्वच्छ केल्याने तोंड स्वच्छ राहतं. तुम्ही एका स्वच्छ तोंडासोबत झोपता. याने पोटाचं आरोग्यही चांगलं राहतं.

जेवणानंतर बडीशेप खा

बडीशेपमध्ये पचनसाठी आवश्यक गुण असतात आणि यात फ्लेवोनोइड्स असतात. याने लाळेचा प्रवाह उत्तेजित करण्यात मदत मिळते. ज्याने तोंड कोरडंही होत नाही. सोबतच बडीशेपचा सुगंधीत स्वाद तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतो.

जेवणानंतर गुरळा करा

डॉक्टर दीक्षा यांनी सांगितलं की, आयुर्वेदात जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण याने तुमचं चयापचय स्लो होतं. पण तोंडाच्या स्वच्छतेसाठी खासकरून जेवणांनंतर पाणी गरजेचं आहे. जेवणानंतर 2 ते 3 मिनिटे पाण्याने गुरळा करा. याने दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण निघतात. हे कणं नंतर दातांना किड लागण्यास कारणीभूत ठरतात.

भरपूर पाणी प्या

शरीराचं प्रत्येक कार्य खासकरून तोंडांच्या आरोग्यासाठी पाणी फार गरजेचं आहे. तुम्ही किती पाणी प्यावं याबाबत डॉ. भावसार यांनी सांगितलं की, लघवीचा रंग हलका पिवळा असेल तर याचा अर्थ होतो की, तुमच्या शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण आहे. जर लघवीचा रंग जास्त पिवळा असेल तर तुम्हाला भरपूर पाणी प्यावं लागेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य