शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

मुलांमध्ये भूक न लागण्याचे कारण काय आहे? जाणून घ्या तज्ज्ञांंचं मत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 15:49 IST

लहान मुले ही सर्वसाधारणपणे आपल्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी आवश्यक तेवढे खात असतात. बरेचसे पालक मुलांना जबरदस्तीने गरजेपेक्षा जास्त खाऊ घालतात. 

(Image Credit : livelyeaters.com.au)

डॉ. आरती सोमण, आयुर्वेदिक विशेषज्ञ, निसर्ग हर्ब्स

पालक आपल्या मुलांच्या बाबतीत सतत कोणती ना कोणती चिंता करत असतात. १-५ वर्षे वयोगटातील मुलांचे बरेचसे पालक हे मुलांची भूक कमी झाल्याची किंवा त्यांना खाण्याच्या चुकीच्या सवयी असल्याची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातात. बाळाचे पहिल्या वर्षातील वजन ६-७ किलोग्रॅमपर्यंत वाढणे आणि त्यानंतर पाचव्या वर्षापर्यंत २ ते ३ किलोग्रॅम्सनी वाढणे पालकांसाठी सवयीचे असते. पण या वयोगटातील मुलांचे वजन कधी कधी तीन-चार महिन्यांत थोडेही वाढत नाही. त्यांची वाढ वेगाने होत नाही. त्यामुळे खाणे मागण्याचे प्रमाण कमी होते व परिणामी मुले कमी खाऊ लागतात किंवा अजिबातच खात नाहीत. या समस्येला फिजिओलॉजिकल अ‍ॅनारॉक्सिया असे म्हणतात. 

लहान मुले ही सर्वसाधारणपणे आपल्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी आवश्यक तेवढे खात असतात. बरेचसे पालक मुलांना जबरदस्तीने गरजेपेक्षा जास्त खाऊ घालतात. 

अनेक पालक दिवसभर आपल्या मुलांच्या पोटात मधल्या वेळचे खाणे, फळे किंवा इतर पदार्थ ढकलत राहतात. पण मूल मागेल तेव्हाच त्याला खाऊ देणे योग्य आहे कारण शरीराला अन्नाची गरज आहे हे जाणवताच त्याची मागणी करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण मुलांकडे उपजतच असते. पुरेशी भूक लागत नसल्याने आपल्या मुलांमध्ये जीवनसत्त्वांची किंवा खनिजांची कमतरता निर्माण होईल अशी चिंताही अनेक पालकांना भेडसावत असते. पण मुलांना जबरदस्ती खायला घातल्यानेही मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो व जेवणाची वेळ त्यांना शिक्षेसारखी वाटू शकते. 

एकदा का तुमचे मूल चमच्याचा वापर करण्याइतके मोठे झाले की पालक म्हणून तुम्ही ते काम पुन्हा कधीही हातात घेऊ नका. तुमच्या मुलांना भूक लागली तर ती स्वत: मागून घेतील. आपल्या मुलांची वजन, उंची नीट वाढतेय ना याची चिंता सोडून द्या. कारण लहान चणीच्या काही मुलांना अन्नाची गरजही तुलनेने कमी असते. 

पण तुमचे मूल वयाने मोठे असेल व त्याची भूक लक्षात येण्याजोग्या प्रमाणात मंदावली असेल, ते सतत थकलेली व चिडचिडी दिसत असतील तर मात्र सावध व्हायला हवे. मुलांच्या खाण्याच्या सवयींत असा बदल होत असेल तर पोटाचा फ्लु, ताप, घसा खबखवणे आणि अतिसार हे आजार त्याला कारणीभूत असू शकतात.  

कौटुंबिक समस्यांमुळे येणारा ताण किंवा अभ्यासात मागे पडणे. 

नैराश्य -  नैराश्यामुळे मुलांच्या भुकेवर खूप परिणाम होतो. 

अ‍ॅनोरेक्सिया नर्व्होसा – मनापासून अन्न खाणे टाळावेसे वाटणे. 

अ‍ॅनिमिया – अ‍ॅनिमिया असलेली मुले आळशी, थकलेली आणि चिडचिडी असतात. 

पोटात कृमी होणे – कृमींमुळे मुलांची भूक कमी होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव, अतिसार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.  

बद्धकोष्‍ठता – कोठा नियमितपणे साफ न झाल्यास मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो. 

आपल्या मुलांची भूक वाढविण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत. पण काहीवेळा आपल्या मुलांनी खायला हवे तितके खावे यासाठी भूक वाढविणारी औषधे देण्याची गरज भासते. अशाप्रकारचे पुरक औषध निवडताना ते उत्पादन अस्सल आणि पुरेशा संशोधनातून सिद्ध झालेले असेल याची काळजी घ्यायला हवी. 

वरील सर्व मुद्दे लक्षात ठेवून आणि सखोल संशोधनातून काही अशा वनौषधी शोधल्या गेल्या आहेत, ज्या सर्वाधिक परिणामकारकतेने मुलांची भूक वाढवू शकण्याच्या कामी समरस होऊ शकतात. या वनौषधी म्हणजे चांगली भूक लागण्यास मदत करणारे तसेच त्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे सर्वोत्तम पर्याय आहेत. निसर्ग हर्ब्जमध्ये आम्ही 'इम्युटायझर' सिरप तयार केला आहे, जे संपूर्णपणे शुद्ध वनौषधींपासून बनविलेले पुरक औषध आहे. लहान मुलांसाठी ते अत्यंत सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

घसा खवखवल्यास कोरोनाची भीती न ठेवता; 'हे' घरगुती उपाय वापरून झटपट मिळवा आराम

संशोधकांनी टिपले कोरोना विषाणूबाधित पेशींचे छायाचित्र

coronavirus: ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य