शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुलांमध्ये भूक न लागण्याचे कारण काय आहे? जाणून घ्या तज्ज्ञांंचं मत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 15:49 IST

लहान मुले ही सर्वसाधारणपणे आपल्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी आवश्यक तेवढे खात असतात. बरेचसे पालक मुलांना जबरदस्तीने गरजेपेक्षा जास्त खाऊ घालतात. 

(Image Credit : livelyeaters.com.au)

डॉ. आरती सोमण, आयुर्वेदिक विशेषज्ञ, निसर्ग हर्ब्स

पालक आपल्या मुलांच्या बाबतीत सतत कोणती ना कोणती चिंता करत असतात. १-५ वर्षे वयोगटातील मुलांचे बरेचसे पालक हे मुलांची भूक कमी झाल्याची किंवा त्यांना खाण्याच्या चुकीच्या सवयी असल्याची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातात. बाळाचे पहिल्या वर्षातील वजन ६-७ किलोग्रॅमपर्यंत वाढणे आणि त्यानंतर पाचव्या वर्षापर्यंत २ ते ३ किलोग्रॅम्सनी वाढणे पालकांसाठी सवयीचे असते. पण या वयोगटातील मुलांचे वजन कधी कधी तीन-चार महिन्यांत थोडेही वाढत नाही. त्यांची वाढ वेगाने होत नाही. त्यामुळे खाणे मागण्याचे प्रमाण कमी होते व परिणामी मुले कमी खाऊ लागतात किंवा अजिबातच खात नाहीत. या समस्येला फिजिओलॉजिकल अ‍ॅनारॉक्सिया असे म्हणतात. 

लहान मुले ही सर्वसाधारणपणे आपल्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी आवश्यक तेवढे खात असतात. बरेचसे पालक मुलांना जबरदस्तीने गरजेपेक्षा जास्त खाऊ घालतात. 

अनेक पालक दिवसभर आपल्या मुलांच्या पोटात मधल्या वेळचे खाणे, फळे किंवा इतर पदार्थ ढकलत राहतात. पण मूल मागेल तेव्हाच त्याला खाऊ देणे योग्य आहे कारण शरीराला अन्नाची गरज आहे हे जाणवताच त्याची मागणी करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण मुलांकडे उपजतच असते. पुरेशी भूक लागत नसल्याने आपल्या मुलांमध्ये जीवनसत्त्वांची किंवा खनिजांची कमतरता निर्माण होईल अशी चिंताही अनेक पालकांना भेडसावत असते. पण मुलांना जबरदस्ती खायला घातल्यानेही मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो व जेवणाची वेळ त्यांना शिक्षेसारखी वाटू शकते. 

एकदा का तुमचे मूल चमच्याचा वापर करण्याइतके मोठे झाले की पालक म्हणून तुम्ही ते काम पुन्हा कधीही हातात घेऊ नका. तुमच्या मुलांना भूक लागली तर ती स्वत: मागून घेतील. आपल्या मुलांची वजन, उंची नीट वाढतेय ना याची चिंता सोडून द्या. कारण लहान चणीच्या काही मुलांना अन्नाची गरजही तुलनेने कमी असते. 

पण तुमचे मूल वयाने मोठे असेल व त्याची भूक लक्षात येण्याजोग्या प्रमाणात मंदावली असेल, ते सतत थकलेली व चिडचिडी दिसत असतील तर मात्र सावध व्हायला हवे. मुलांच्या खाण्याच्या सवयींत असा बदल होत असेल तर पोटाचा फ्लु, ताप, घसा खबखवणे आणि अतिसार हे आजार त्याला कारणीभूत असू शकतात.  

कौटुंबिक समस्यांमुळे येणारा ताण किंवा अभ्यासात मागे पडणे. 

नैराश्य -  नैराश्यामुळे मुलांच्या भुकेवर खूप परिणाम होतो. 

अ‍ॅनोरेक्सिया नर्व्होसा – मनापासून अन्न खाणे टाळावेसे वाटणे. 

अ‍ॅनिमिया – अ‍ॅनिमिया असलेली मुले आळशी, थकलेली आणि चिडचिडी असतात. 

पोटात कृमी होणे – कृमींमुळे मुलांची भूक कमी होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव, अतिसार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.  

बद्धकोष्‍ठता – कोठा नियमितपणे साफ न झाल्यास मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो. 

आपल्या मुलांची भूक वाढविण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत. पण काहीवेळा आपल्या मुलांनी खायला हवे तितके खावे यासाठी भूक वाढविणारी औषधे देण्याची गरज भासते. अशाप्रकारचे पुरक औषध निवडताना ते उत्पादन अस्सल आणि पुरेशा संशोधनातून सिद्ध झालेले असेल याची काळजी घ्यायला हवी. 

वरील सर्व मुद्दे लक्षात ठेवून आणि सखोल संशोधनातून काही अशा वनौषधी शोधल्या गेल्या आहेत, ज्या सर्वाधिक परिणामकारकतेने मुलांची भूक वाढवू शकण्याच्या कामी समरस होऊ शकतात. या वनौषधी म्हणजे चांगली भूक लागण्यास मदत करणारे तसेच त्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे सर्वोत्तम पर्याय आहेत. निसर्ग हर्ब्जमध्ये आम्ही 'इम्युटायझर' सिरप तयार केला आहे, जे संपूर्णपणे शुद्ध वनौषधींपासून बनविलेले पुरक औषध आहे. लहान मुलांसाठी ते अत्यंत सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

घसा खवखवल्यास कोरोनाची भीती न ठेवता; 'हे' घरगुती उपाय वापरून झटपट मिळवा आराम

संशोधकांनी टिपले कोरोना विषाणूबाधित पेशींचे छायाचित्र

coronavirus: ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य