शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रेल्वे गाडी सुरू करण्याचे आश्वासन हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:00 AM

गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपारी ११ वाजतापासून तर सायंकाळी ६ वाजतापर्यंत एकही लोकल रेल्वे गाडी नाही. विशेष म्हणजे, अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर लोकल गाडीची सोय उपलब्ध नसल्याने आमगाव व सालेकसा तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या मागील अनेक वर्षांपासून कायम आहे.

ठळक मुद्देखासदारांना पडला आश्वासनाचा विसर : प्रवाशांची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : निवडून येताच १५ दिवसांच्या आत गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपार पाळीत लोकल रेल्वे गाडी सुरू करुन देऊ असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले होते. परंतु १०० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही रेल्वे गाडी सुरु करण्यासाठी कुठल्याच हालचाली नाहीत. त्यामुळे या भागातील जनता ‘क्या हुआ तेरा वादा’ असा सवाल करीत आहे.गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपारी ११ वाजतापासून तर सायंकाळी ६ वाजतापर्यंत एकही लोकल रेल्वे गाडी नाही. विशेष म्हणजे, अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर लोकल गाडीची सोय उपलब्ध नसल्याने आमगाव व सालेकसा तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जनतेच्या मागणीनुसार प्रवासी गाड्यांची गरजेनुसार सोय करुन देणे आवश्यक आहे. डोंगरगड-गोंदिया दरम्यान चालणाऱ्या लोकल गाड्या बहुतेक दुर्ग आणि इतवारी या मार्गावर चालणाऱ्या असतात. यातील काही गाड्या गोंदियापर्यंत तर काही गाड्या डोंगरगडपर्यंतच चालतात. परिणामी सालेकसा, आमगाव, डोंगरगढ परिसरातील प्रवाशांचा विचार करुन दुपारी १ किंवा दोन वाजताच्या दरम्यान दोन्ही बाजूने रेल्वे गाडीची सोय झाली तर हजारो प्रवाशांना याचा लाभ होईल.रेल्वे विभाग केंद्र शासनातंर्गत येत असून रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. अशात केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदारांची ही पहिली जबाबदारी ठरते, ही बाब लक्षात घेता लोक मागील अनेक वर्षांपासून खासदारांकडे यासाठी मागणी करीत आहे. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र गडचिरोली लोकसभा क्षेत्रात समाविष्ट आहे. मागील १० वर्षांपासून या क्षेत्रातील जनतेची नाळ खासदारांसोबत कधीच जुळली नाही. त्यामुळे सुद्धा समस्या कायम आहे. या परिसरात लोकल रेल्वे गाडी सुरु करण्यासह रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांची समस्या ही कायम आहे. धानोली ते बाम्हणी मार्ग, दरेकसा ते भर्रीटोला मार्ग मागील ५० वर्षांपासून तशीच आहे.या समस्या जतनेने वेळोवेळी लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या, मात्र त्या अद्यापही मार्गी लागल्या नाही. विद्यमान खासदार नेते यांनी सुद्धा लोकल रेल्वे गाडी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १०० दिवसांचा कालावधी लोटूनही ही समस्या मार्गी लागली नाही.खासदार साहेब नेहमी संपर्काबाहेरसालेकसा-आमगाव तालुक्यातील लोक आपल्या समस्या सोडविण्यासाठी जेव्हा-जेव्हा खासदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा-तेव्हा खासदार महोदय संपर्काच्या बाहेर असतात. फोन लावला तरी उचलत नाही. त्यांच्या स्वीय सहायकाला संपर्क केला तर त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही.निवडून आल्यानंतर सालेकसा-आमगाव येथे सत्काराप्रसंगी खासदारांनी जाहीर सभेत बोलताना रेल्वेची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आतापर्यंत काहीच केले नाही. लोकांना आपल्या मागणीसाठी आता आंदोलन करावेच लागेल.-सुनील असाटी,सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते