शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘एवढ्या मजुरीत तेलही मिळत नाही साहेब !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

सालेकसा तालुक्यात दरवर्षी सरासरी तीन हजार हेक्टरच्यावर शेतीत उन्हाळी धान पीक घेतले जात असते. अर्थात खरीप हंगामाच्या तुलनेत फक्त २० टक्के शेती रब्बीच्या हंगामासाठी उपयोगात आणली जाते. परंतु यंदा रब्बी हंगामाचे प्रमाण फारच कमी असून कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण ११७६ हेक्टरवरच उन्हाळी धान पीक घेतले जात आहे.

ठळक मुद्देरोवणी करणाऱ्या मजुरांची व्यथा : मजुरीचे दर फक्त १०० ते १२० रूपये

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सध्या जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान पीक घेण्यासाठी रोवणीची कामे सुरू आहे. धान रोवणी करताना दिवसभर चिखलात राहून रोवणी करणाऱ्या महिला मजुरांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. दिवसभराच्या मजुरीचे पैसे हाती घेताना अनेक महिला मजुरांच्या मुखातून एकच वाक्य निघते ते म्हणजे, एवढ्या मजुरीत तर तेलही मिळत नाही तर मग बाकीचा खर्च कुठून करायचा?, असा सवाल करीत आहे.  सालेकसा तालुक्यात दरवर्षी सरासरी तीन हजार हेक्टरच्यावर शेतीत उन्हाळी धान पीक घेतले जात असते. अर्थात खरीप हंगामाच्या तुलनेत फक्त २० टक्के शेती रब्बीच्या हंगामासाठी उपयोगात आणली जाते. परंतु यंदा रब्बी हंगामाचे प्रमाण फारच कमी असून कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण ११७६ हेक्टरवरच उन्हाळी धान पीक घेतले जात आहे. त्यात ८०० हेक्टरवर धरणाच्या पाण्यातून आणि उर्वरित जमिनीवर खासगी बोअरवेलच्या पाण्याद्वारे रब्बीची भात लागवड केली जात आहे. खरीप हंगामाच्या तुलनेत केवळ ७.५० टक्के शेतीवरच लागवड होत आहे. बोअरवेलधारक शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यातच आपल्या शेतात धान रोवणी करवून घेतली असून त्यांना मोठ्या प्रमाणावर महिला मजूर उपलब्ध झाले. घरी बसण्याऐवजी जेवढी काही मजुरी मिळेल या अपेक्षेने सहज धान रोवणीसाठी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांनी शेतात रोवणी करवून प्रती दिवस फक्त १०० रूपये प्रमाणे मजुरीची रक्कम मोजली. साहेब १०० रूपयात तर तेल सुद्धा मिळत नाही. आहारात वापरण्यासाठी लागणारे तेल सुद्धा १३० ते १५० रूपये लिटरप्रमाणे खरेदी करावे लागत असते. त्यावर खाद्य पदार्थ अन्न, किराणा आणि दररोजची जेवणाची व्यवस्था कशी करावी. एखादे कुटुंब एका महिला मजुराच्या भरवशावर असेल तर ती महिला आपल्या कुटुंबाचा गाडा कसा पुढे नेणार हा सुद्धा  प्रश्न निर्माण झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात धरणातून येणाऱ्या कालव्याच्या पाण्याद्वारे धान रोवणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली तेव्हा रोवणीसाठी मजुरांची काही मागणी वाढली तेव्हा मजुरांनी आपल्या व्यथा मांडत मजुरी वाढविण्याची मागणी केली. शेतमालकांनी मजुरीचे दर १०० रूपयावरून ११० ते १२० रूपयापर्यंत केले. परंतु १२० रूपये सुद्धा मुळीच परवडणारी मजुरी नाही असे सांगितले.

महिला, पुरूषांच्या मजुरीत मोठी तफावतशेतीमध्ये काम करणाऱ्या महिला मजुराला दिवसभर काम करण्याची मजुरी फक्त १०० ते १२० रूपयेपर्यंत मिळत आहे. त्यावेळी पुरूष मजुराला २५० ते ३०० रूपये प्रमाणे दिले जाते. अशात महिलांपेक्षा पुरूषाला दुप्पट मजुरी का दिली जाते. अशा प्रश्न मजूर वर्गासमोर नेहमी उभा राहतो. महिलासुद्धा दिवसभर चिखलात राहून राबत असतात. त्यांनासुद्धा किमान २०० ते २५० रूपयेपर्यंत मजुरी मिळावी ही अपेक्षा आहे. पण ते ऐकणार कोण हा प्रश्न आहे.आठ तास विजेचा मोठा फटकामहावितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी एकूण २४ तासांपैकी फक्त आठ तास वीज पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे आठ तासाच्या विद्युत पुरवठ्यामुळे मोटार पंप लावून रब्बी धान पीक घेणे शक्य नाही. अशात अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबी धान पीक घेण्याचे टाळले. परिणामी यंदा सरासरीपेक्षा फक्त २० टक्के शेतीमध्येच रबी धान पीक घेतले जात आहे. त्यामुळे मजुरांची मागणीसुद्धा घटली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी