शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

‘एवढ्या मजुरीत तेलही मिळत नाही साहेब !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

सालेकसा तालुक्यात दरवर्षी सरासरी तीन हजार हेक्टरच्यावर शेतीत उन्हाळी धान पीक घेतले जात असते. अर्थात खरीप हंगामाच्या तुलनेत फक्त २० टक्के शेती रब्बीच्या हंगामासाठी उपयोगात आणली जाते. परंतु यंदा रब्बी हंगामाचे प्रमाण फारच कमी असून कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण ११७६ हेक्टरवरच उन्हाळी धान पीक घेतले जात आहे.

ठळक मुद्देरोवणी करणाऱ्या मजुरांची व्यथा : मजुरीचे दर फक्त १०० ते १२० रूपये

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सध्या जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान पीक घेण्यासाठी रोवणीची कामे सुरू आहे. धान रोवणी करताना दिवसभर चिखलात राहून रोवणी करणाऱ्या महिला मजुरांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. दिवसभराच्या मजुरीचे पैसे हाती घेताना अनेक महिला मजुरांच्या मुखातून एकच वाक्य निघते ते म्हणजे, एवढ्या मजुरीत तर तेलही मिळत नाही तर मग बाकीचा खर्च कुठून करायचा?, असा सवाल करीत आहे.  सालेकसा तालुक्यात दरवर्षी सरासरी तीन हजार हेक्टरच्यावर शेतीत उन्हाळी धान पीक घेतले जात असते. अर्थात खरीप हंगामाच्या तुलनेत फक्त २० टक्के शेती रब्बीच्या हंगामासाठी उपयोगात आणली जाते. परंतु यंदा रब्बी हंगामाचे प्रमाण फारच कमी असून कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण ११७६ हेक्टरवरच उन्हाळी धान पीक घेतले जात आहे. त्यात ८०० हेक्टरवर धरणाच्या पाण्यातून आणि उर्वरित जमिनीवर खासगी बोअरवेलच्या पाण्याद्वारे रब्बीची भात लागवड केली जात आहे. खरीप हंगामाच्या तुलनेत केवळ ७.५० टक्के शेतीवरच लागवड होत आहे. बोअरवेलधारक शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यातच आपल्या शेतात धान रोवणी करवून घेतली असून त्यांना मोठ्या प्रमाणावर महिला मजूर उपलब्ध झाले. घरी बसण्याऐवजी जेवढी काही मजुरी मिळेल या अपेक्षेने सहज धान रोवणीसाठी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांनी शेतात रोवणी करवून प्रती दिवस फक्त १०० रूपये प्रमाणे मजुरीची रक्कम मोजली. साहेब १०० रूपयात तर तेल सुद्धा मिळत नाही. आहारात वापरण्यासाठी लागणारे तेल सुद्धा १३० ते १५० रूपये लिटरप्रमाणे खरेदी करावे लागत असते. त्यावर खाद्य पदार्थ अन्न, किराणा आणि दररोजची जेवणाची व्यवस्था कशी करावी. एखादे कुटुंब एका महिला मजुराच्या भरवशावर असेल तर ती महिला आपल्या कुटुंबाचा गाडा कसा पुढे नेणार हा सुद्धा  प्रश्न निर्माण झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात धरणातून येणाऱ्या कालव्याच्या पाण्याद्वारे धान रोवणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली तेव्हा रोवणीसाठी मजुरांची काही मागणी वाढली तेव्हा मजुरांनी आपल्या व्यथा मांडत मजुरी वाढविण्याची मागणी केली. शेतमालकांनी मजुरीचे दर १०० रूपयावरून ११० ते १२० रूपयापर्यंत केले. परंतु १२० रूपये सुद्धा मुळीच परवडणारी मजुरी नाही असे सांगितले.

महिला, पुरूषांच्या मजुरीत मोठी तफावतशेतीमध्ये काम करणाऱ्या महिला मजुराला दिवसभर काम करण्याची मजुरी फक्त १०० ते १२० रूपयेपर्यंत मिळत आहे. त्यावेळी पुरूष मजुराला २५० ते ३०० रूपये प्रमाणे दिले जाते. अशात महिलांपेक्षा पुरूषाला दुप्पट मजुरी का दिली जाते. अशा प्रश्न मजूर वर्गासमोर नेहमी उभा राहतो. महिलासुद्धा दिवसभर चिखलात राहून राबत असतात. त्यांनासुद्धा किमान २०० ते २५० रूपयेपर्यंत मजुरी मिळावी ही अपेक्षा आहे. पण ते ऐकणार कोण हा प्रश्न आहे.आठ तास विजेचा मोठा फटकामहावितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी एकूण २४ तासांपैकी फक्त आठ तास वीज पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे आठ तासाच्या विद्युत पुरवठ्यामुळे मोटार पंप लावून रब्बी धान पीक घेणे शक्य नाही. अशात अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबी धान पीक घेण्याचे टाळले. परिणामी यंदा सरासरीपेक्षा फक्त २० टक्के शेतीमध्येच रबी धान पीक घेतले जात आहे. त्यामुळे मजुरांची मागणीसुद्धा घटली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी