शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

आता तरी मिळणार का मग्रारोहयोचा थकीत निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 5:00 AM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली. मात्र या कामांची १७ कोटी ६९ लाख ११ हजार रुपयांची देयके मागील ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यात पांदण रस्त्यांच्या कुशल कामाची देयके न मिळाल्याने ४०० हून अधिक ग्रामपंचायत आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. तर काम करणारे कंत्राटदार सुद्धा अडचणीत आले आहे.

ठळक मुद्दे२४ कॉलमची माहिती जि.प.ला सादर : मुकाअ यांनी पाठविले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ४०० हून अधिक ग्रामपंचायतींचे मग्रारोहयोच्या कामाचे १७ कोटी ६९ लाख रुपये थकीत आहे. यासंदर्भात अनेकदा शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र जिल्हा परिषद लेखा विभागाच्या वेळकाढू धोरणाचा फटका याला बसत आहे. आता पंचायत विभागाने यातील त्रुट्या दूर करुन हा प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे आतातरी थकीत निधी मिळतो काय याकडे ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली. मात्र या कामांची १७ कोटी ६९ लाख ११ हजार रुपयांची देयके मागील ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यात पांदण रस्त्यांच्या कुशल कामाची देयके न मिळाल्याने ४०० हून अधिक ग्रामपंचायत आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. तर काम करणारे कंत्राटदार सुद्धा अडचणीत आले आहे. परिणामी या ग्रामपंचायत अंतर्गत दुसरे काम करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्या कामांचे २४ कॉलम असलेल्या माहितीचा अहवाल, ना हरकत प्रमाणपत्र व यासाठी गठीत करण्यात आलेल्या समित्यांच्या शिफारस जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. यावर थकून असलेले १७ कोटी ६९ लाख ११ हजार रूपये काढण्यात यावे असे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी (दि.२०) जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.मनरेगातंर्गत गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पांदन रस्ते, माती वाहतूक, वृक्ष लागवडसह इतर कुशल कामे सन २०१६ ते २०१९ या कालावधीत करण्यात आली. या कामांमुळे हजारो मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध झाली. शिवाय शासनाकडून सुद्धा या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. जिल्ह्यातील कुशल कामाचे पैसे देण्यात यावे यासाठी पालकमंत्री अनिल देशमुख, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सतत पाठपुरावा करून त्यावर तोडगा काढण्याचा विचार केला. यावर शासनाने २४ कॉलमची माहिती मागीतली होती. ती माहिती आता जिल्ह्यातील ८ ही तालुक्यांतून जिल्हा परिषदेला सादर करण्यात आली आहे.तालुकास्तरावर गठित केली समितीराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित कुशल निधी देण्यासाठी पंचायत समितीस्तरावर तालुकास्तरीय गठित करण्यात आली होती. गटविकास अधिकाºयांच्या अध्यक्षतेत व लेखाधिकाºयांचा समितीत समावेश होता. त्यांनी संपूर्ण चौकशी करून २४ कॉलम असलेली माहिती जिल्हा परिषदेला पाठविली आहे.सरपंचांचा उपोषणाचा इशारामागील ३ वर्षांपासून ग्रामपंचायतचे मग्रारोहयोच्या कामांचे १७ कोटी ६९ लाख रुपये थकले आहेत. यामुळे ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी झाली आहे. यात जिल्हा परिषद लेखाधिकारी वांरवार त्रुट्या काढून विलंब करीत आहे. त्यामुळे सरपंच हैराण झाले असून आता हा निधी न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच व जिल्हा परिषद सदस्य परशुरामकर यांनी दिला आहे.