शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुका महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू - सुनील तटकरे 

By अंकुश गुंडावार | Updated: November 6, 2023 17:01 IST

मराठाला समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे

गोंदिया : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खा. शरद पवार गट आणि ना. अजित पवार असे दोन गट पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची, याचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. पण, एकूण कायदेविषयक बाबी आणि सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेसंदर्भात दिलेल्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची बाजू ही प्रबळ आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका या आम्ही महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी (दि. ६) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. घड्याळ तेच पण वेळ नवीन या स्लाेगन अंतर्गत संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. पत्रकार परिषदेला पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन उपस्थित होते.

सुनील तटकरे म्हणाले, २०१४च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच खा. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे २ जुलैला महायुती सरकारला दिलेला पाठिंबा हा कुण्याही यंत्रणेच्या भीतीपोटी नव्हे, तर महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी दिला, असे तटकरे यांनी सांगितले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती नेतृत्व देण्याचे काम जनतेने केले, त्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.

बारामतीतील ग्रामपंचायतीच्या १२ पैकी १२ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने जिंकल्या आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत बारामतीची जनता काय करणार आहे, याचे उत्तर जनतेने आजच्या निकालातून दिल्याचे त्यांनी सांगितले. खा. प्रफुल्ल पटेल यांचा अनेक वर्षांचा अनुभव आणि अजित पवार नावाचे असलेले ग्लॅमर याचा फायदा आम्हाला झाला आहे. त्यामुळेच ४३ आमदार दादांच्या पाठीशी उभे राहिले, शिवाय नागालँडमधील आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही तटकरे यांनी सांगितले.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे

कुणबी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकले नव्हते. त्यामुळे मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी कायद्याच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत. त्यामुळे या प्रक्रियेस थोडा विलंब होत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत टिकणारे आरक्षण मिळावे, हीच महायुती सरकारची भूमिका असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील जनता भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देते

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याने आमच्यावर विविध आरोप केले जात आहेत. पण, या सर्व आरोपांचे उत्तर २०२४च्या निकालानंतर मिळेल. निवडणुकीत जनता नेहमीच भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकgondiya-acगोंदिया