शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

आगामी निवडणुका महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू - सुनील तटकरे 

By अंकुश गुंडावार | Updated: November 6, 2023 17:01 IST

मराठाला समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे

गोंदिया : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खा. शरद पवार गट आणि ना. अजित पवार असे दोन गट पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची, याचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. पण, एकूण कायदेविषयक बाबी आणि सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेसंदर्भात दिलेल्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची बाजू ही प्रबळ आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका या आम्ही महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी (दि. ६) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. घड्याळ तेच पण वेळ नवीन या स्लाेगन अंतर्गत संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. पत्रकार परिषदेला पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन उपस्थित होते.

सुनील तटकरे म्हणाले, २०१४च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच खा. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे २ जुलैला महायुती सरकारला दिलेला पाठिंबा हा कुण्याही यंत्रणेच्या भीतीपोटी नव्हे, तर महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी दिला, असे तटकरे यांनी सांगितले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती नेतृत्व देण्याचे काम जनतेने केले, त्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.

बारामतीतील ग्रामपंचायतीच्या १२ पैकी १२ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने जिंकल्या आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत बारामतीची जनता काय करणार आहे, याचे उत्तर जनतेने आजच्या निकालातून दिल्याचे त्यांनी सांगितले. खा. प्रफुल्ल पटेल यांचा अनेक वर्षांचा अनुभव आणि अजित पवार नावाचे असलेले ग्लॅमर याचा फायदा आम्हाला झाला आहे. त्यामुळेच ४३ आमदार दादांच्या पाठीशी उभे राहिले, शिवाय नागालँडमधील आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही तटकरे यांनी सांगितले.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे

कुणबी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकले नव्हते. त्यामुळे मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी कायद्याच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत. त्यामुळे या प्रक्रियेस थोडा विलंब होत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत टिकणारे आरक्षण मिळावे, हीच महायुती सरकारची भूमिका असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील जनता भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देते

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याने आमच्यावर विविध आरोप केले जात आहेत. पण, या सर्व आरोपांचे उत्तर २०२४च्या निकालानंतर मिळेल. निवडणुकीत जनता नेहमीच भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकgondiya-acगोंदिया