शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

वेग मर्यादा ११० असताना कंपन्यांकडून वाहनांची मर्यादा २५० का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:43 IST

वेग मर्यादित ठेवणे आवश्यक: लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहोचा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महामार्गावर वाहन चालविण्याची वेग मर्यादा ८० ते १२० दरम्यान असते. मात्र, वाहन कंपन्यांकडून वाहनांची वेग मर्यादा २५० पर्यंत दिलेली असते. मात्र, नियमानुसार दिलेल्या वेग मर्यादेनुसार वाहन चालविणे गरजेचे असताना वाहने १५० च्या वेगाने पळविली जातात.

त्यामुळे अपघातालाही आमंत्रण दिले जाते. महामार्गावरील वेग मर्यादा मर्यादित असताना वाहन कंपन्यांनीही वेग मर्यादा मर्यादित ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून अपघात टाळण्यास मदत होऊ शकते. 

वाहतुकीचे नियम तोडले की अपघात होतात व यामध्ये कित्येकांच्या जिवावर बेतते. 'लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहोचा' हा वाहतुकीचा मंत्र असतानाही त्याचे पालन केले जात नाही. घरी जाण्याची भलतीच घाई त्यांच्या जीवावर बेतते. नियम तोडले की अपघात घडतात असे असतानाच दारू पिऊन वाहन चालविल्याने नियम तुटत असून अपघात घडत आहेत. बहुतांश अपघातांमध्ये चालक मद्यप्राशन केलेला आढळून येतो.  मात्र, मद्य प्राशन करून वाहन भरधाव वेगात चालविले जाते. पुढे हाच प्रकार जिवावर बेततो. यामुळेच दारू पिऊन वाहन चालवू नये, असे सांगितले जाते. 

हेल्मेट, सीट बेल्ट विसरू नका बहुतांश अपघातात डोक्याला मार लागूनच व्यक्तीचा जीव जातो. यासाठीच वाहन चालविताना दुचाकीचा- लकांनी हेल्मेट लावले पाहिजे. तसेच भरधाव वेगात वाहन चालवू नये.

जिल्ह्यात सर्वाधीक वेगमर्यादा ११० जिल्ह्यात सर्वाधीक वेग ११० आहे. जास्त वेगाची वाहने असली तरी त्यांनी जोरात वाहने चालवू नयेत. अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यातच गोंदियातील रस्ते खड्यात असल्याने वाहन जोराने चालविल्यास कधी अपघात होईल सांगता येत नाही.

वाहनांची वेग मर्यादा जास्त कशासाठी? वाहन तयार करणाऱ्या कंपन्यांनीच वाहनांना दिलेली वेग मर्यादा ही खूप अधिक असताना आता जास्त वेग मर्यादा देणे अत्यंत धोक्याचे आहे. अविचाराने जास्त वेगात वाहने चालविल्यास ते दुसऱ्यांचा जीव घेतील. रस्त्याने जाणाऱ्या निष्पाप व्यक्तीचा जीव घेणे हे खुनापेक्षाही गंभीर वाटते

वेगमर्यादा ओलांडली; महिन्यात लाखाचा दंड वसूल महामार्ग हे प्रवासास सुखकारक असले, तरी दिलेल्या वेग मर्यादित वाहन चालविणे आवश्यक आहे. मात्र, अनेकदा दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा वाहनाचा वेग ठेवून चालक वाहने चालवित असतात. महामार्गावर वेग मोजण्यासाठी स्पीड गन ही लावण्यात आली आहे. महिन्याभरात साधारण लाख रुपयांचा दंड हा भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहकांकडून वसूल केला आहे.

"वाहनांची स्पीड बांधून द्यावी म्हणजेच ते वाहन जास्त भरधाव वेगात चालविता येणार नाही. कमी वेगाची वाहने जर बाजारात आली तर जास्त वेगात वाहन चालविण्याचा प्रश्नच उरत नाही." - दिनेश चिंचाळकर, ऑटोमोबाईल तज्ज्ञ

"वाहन चालविताना प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियम तुटले की, अपघात घडतात व कित्येकदा जिवावर बेतते. यामुळे नियम पाळा. कारण प्रत्येकाची वाट बघणारे घरी आहेत." - किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक गोंदिया शहर.

टॅग्स :gondiya-acगोंदिया