शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

वेग मर्यादा ११० असताना कंपन्यांकडून वाहनांची मर्यादा २५० का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:43 IST

वेग मर्यादित ठेवणे आवश्यक: लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहोचा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महामार्गावर वाहन चालविण्याची वेग मर्यादा ८० ते १२० दरम्यान असते. मात्र, वाहन कंपन्यांकडून वाहनांची वेग मर्यादा २५० पर्यंत दिलेली असते. मात्र, नियमानुसार दिलेल्या वेग मर्यादेनुसार वाहन चालविणे गरजेचे असताना वाहने १५० च्या वेगाने पळविली जातात.

त्यामुळे अपघातालाही आमंत्रण दिले जाते. महामार्गावरील वेग मर्यादा मर्यादित असताना वाहन कंपन्यांनीही वेग मर्यादा मर्यादित ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून अपघात टाळण्यास मदत होऊ शकते. 

वाहतुकीचे नियम तोडले की अपघात होतात व यामध्ये कित्येकांच्या जिवावर बेतते. 'लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहोचा' हा वाहतुकीचा मंत्र असतानाही त्याचे पालन केले जात नाही. घरी जाण्याची भलतीच घाई त्यांच्या जीवावर बेतते. नियम तोडले की अपघात घडतात असे असतानाच दारू पिऊन वाहन चालविल्याने नियम तुटत असून अपघात घडत आहेत. बहुतांश अपघातांमध्ये चालक मद्यप्राशन केलेला आढळून येतो.  मात्र, मद्य प्राशन करून वाहन भरधाव वेगात चालविले जाते. पुढे हाच प्रकार जिवावर बेततो. यामुळेच दारू पिऊन वाहन चालवू नये, असे सांगितले जाते. 

हेल्मेट, सीट बेल्ट विसरू नका बहुतांश अपघातात डोक्याला मार लागूनच व्यक्तीचा जीव जातो. यासाठीच वाहन चालविताना दुचाकीचा- लकांनी हेल्मेट लावले पाहिजे. तसेच भरधाव वेगात वाहन चालवू नये.

जिल्ह्यात सर्वाधीक वेगमर्यादा ११० जिल्ह्यात सर्वाधीक वेग ११० आहे. जास्त वेगाची वाहने असली तरी त्यांनी जोरात वाहने चालवू नयेत. अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यातच गोंदियातील रस्ते खड्यात असल्याने वाहन जोराने चालविल्यास कधी अपघात होईल सांगता येत नाही.

वाहनांची वेग मर्यादा जास्त कशासाठी? वाहन तयार करणाऱ्या कंपन्यांनीच वाहनांना दिलेली वेग मर्यादा ही खूप अधिक असताना आता जास्त वेग मर्यादा देणे अत्यंत धोक्याचे आहे. अविचाराने जास्त वेगात वाहने चालविल्यास ते दुसऱ्यांचा जीव घेतील. रस्त्याने जाणाऱ्या निष्पाप व्यक्तीचा जीव घेणे हे खुनापेक्षाही गंभीर वाटते

वेगमर्यादा ओलांडली; महिन्यात लाखाचा दंड वसूल महामार्ग हे प्रवासास सुखकारक असले, तरी दिलेल्या वेग मर्यादित वाहन चालविणे आवश्यक आहे. मात्र, अनेकदा दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा वाहनाचा वेग ठेवून चालक वाहने चालवित असतात. महामार्गावर वेग मोजण्यासाठी स्पीड गन ही लावण्यात आली आहे. महिन्याभरात साधारण लाख रुपयांचा दंड हा भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहकांकडून वसूल केला आहे.

"वाहनांची स्पीड बांधून द्यावी म्हणजेच ते वाहन जास्त भरधाव वेगात चालविता येणार नाही. कमी वेगाची वाहने जर बाजारात आली तर जास्त वेगात वाहन चालविण्याचा प्रश्नच उरत नाही." - दिनेश चिंचाळकर, ऑटोमोबाईल तज्ज्ञ

"वाहन चालविताना प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियम तुटले की, अपघात घडतात व कित्येकदा जिवावर बेतते. यामुळे नियम पाळा. कारण प्रत्येकाची वाट बघणारे घरी आहेत." - किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक गोंदिया शहर.

टॅग्स :gondiya-acगोंदिया