शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गृहविलगीकरणातील रुग्णांवर वॉच कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

गोंदिया : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले असून संक्रमित रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. संक्रमितांची ...

गोंदिया : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले असून संक्रमित रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. संक्रमितांची आकडेवारी एवढी मोठी आहे की, प्रत्येकाला बाहेरील विलगीकरणगृहात ठेवणे शक्य नाही. अशावेळी संक्रमित रुग्णांना स्वत:च्या घरीच विलगीकरणात राहण्याची मुभा प्रशासनामार्फत दिली गेलेली आहे. मात्र गृहविलगीकरणात असलेले अनेक रुग्ण नियमांचे उल्लघंन करून बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.

हे रुग्ण इतरामध्येही संसर्ग करीत स्वत:सह दुसऱ्यांच्या जीवास धोका निर्माण करीत आहे. तेव्हा अशा रुग्णांवर ‘वाॅच कुणाचा’ असा संतापजनक सवाल शहरवासीयांनी प्रशासनाला केला आहे. विशेष म्हणजे अशा गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती आहे. १४ दिवसांचे निर्बंध यांच्या बुद्धिमत्तेपलीकडचे काम त्यांना वाटत असते. त्यामुळे अवधे चार ते पाच दिवसच घरी राहून त्यानंतर ते बाहेर सर्रासपणे मुक्त संचार करीत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटेदरम्यान संक्रमित रुग्णांचे संपूर्ण घरच सील होत होते. त्यामुळे या घरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती शेजाऱ्यांसह इतरांना मिळायची व ते संक्रमित रुग्णांपासून तसेच त्यांच्या घरच्या मंडळीपासून दूर रहायचे. पहिल्या लाटेमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने प्रशासकीय यंत्रणासुद्धा प्रत्येक रुग्णावर नजर ठेवून असायची. त्यामुळे रुग्णांना घराबाहेर भटकतासुद्धा येत नव्हते. मात्र दुसऱ्या लाटेत स्थिती भयावह झाली आहे. घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासकीय यंत्रणेतसुद्धा कोरोनाचा फैलाव झाल्याने यंत्रणा कमी पडू लागली आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर अपुऱ्या प्रशासकीय यंत्रणेमुळे लक्ष ठेवायला कुणीही नसल्यामुळे अशा रुग्णांवर उचित कारवाई होत नाही. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा काही दिमाखदार रुग्ण घेताना दिसून येत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढून जनतेसह प्रशासनालासुद्धा बिकट परिस्थतीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बॉक्स

नगरसेवक व ग्रा.पं.सदस्यांनी ठेवावा वॉच

शहरात नगरसेवक तथा ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वॉर्डातील अशा बेजाबबदार संक्रमित गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर वॉच ठेवावा, असा सल्ला तज्ज्ञ मंडळींनी दिलेला आहे. असे रुग्ण १४ दिवसांच्या गृहविलगीकरण कालावधीत बेजबाबदारपणे घराबाहेर निघून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करीत असल्याचे दिसून आल्यास त्वरित प्रशासकीय यंत्रणेला अवगत करावे, अशी मागणीही सुज्ञ नागरिक करीत आहे.