शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

‘त्यांच्या’ वेदनांवर फुंकर कोण घालणार?

By admin | Updated: December 10, 2015 01:57 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी कोणापुढे हात पसरावे लागणे जगात कोणालाच आवडणार नाही, पण तरीही कोणत्याही मंदिरासमोर ५ ते ५० भिक्षेकरी अगतिकपणे बसलेले दिसतात.

मनोज ताजने गोंदियापोटाची खळगी भरण्यासाठी कोणापुढे हात पसरावे लागणे जगात कोणालाच आवडणार नाही, पण तरीही कोणत्याही मंदिरासमोर ५ ते ५० भिक्षेकरी अगतिकपणे बसलेले दिसतात. यापैकी कोणीही स्वेच्छेने भिकारी झालेला नसतो. परिस्थितीपुढे हतबल होऊन वाटेला आलेले हे जीवन जगताना त्यांना काय वेदना होत असतील याची कल्पना करणे इतरांसाठी अशक्य आहे. पण माणूस म्हणून जगताना या भिक्षेकरूंपासून हिरावल्या गेलेला त्यांचा हक्क त्यांना मिळवून देऊन पुन्हा त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग मोकळा करून देण्यास कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही.गोंदिया शहरात अशा भिक्षेकरूंची संख्या ३०० ते ४०० च्या घरात आहे. यात बहुतांश लोक ५० ते ७५ वयोगटातील महिला-पुरूष आहेत. हे लोक मोठ्या मंदिरांसमोर दिवसभर बसलेले असतात. मंदिरात येणाऱ्या भक्तगणांना आपल्याही ‘देव’ दिसेल आणि मंदिरातील दानपेटीसोबत आपल्याही झोळीत काही दान पडेल या आशेने अनेक भिक्षेकरींचा सोमवार ते रविवार वेगवेगळ्या मंदिरांसमोर ठिय्या असतो. पैशाच्या स्वरूपात मिळणारे दान मिळाले नाही तरी अन्नदानाच्या रूपानेही पोटाची खळगी भरती येईल, अशी अनेकांची अपेक्षा असते. पण अनेक वेळा अन्नाचे दोन घोसही यांच्या पोटात पडत नाहीत.सरकारी यंत्रणेकडून निराधारांना आर्थिक आधार देणाऱ्या अनेक योजना आहेत. पण निरक्षरता, अज्ञान यासोबतच सरकारी कागदपत्रांच्या ससेमिऱ्याला त्रासून अनेकांनी ही सरकारी मदत जणू आपल्यासाठी नाहीच, अशी मन समजावणी करीत त्याचा पिच्छा सोडल्याचे काही भिक्षेकरींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.थंडीत कुंडकुडत हे भिक्षेकरी रात्र कशी काढत असतील? पावसाळ्यात कुठे आसरा घेत असतील? उन्हाच्या तडाख्यात त्यांच्या जीवाला गारवा मिळत असेल का? असे प्रश्न त्या भिक्षेकरींच्या संवेदनहीन नातेवाईकांनाच नाही तर समाजातील कोणालाही पडत नाहीत.जिल्ह्यातील सामाजिक संघटना पुढाकार घेतील का?‘मानवाधिकार’च्या नावावर काम करणाऱ्या अनेक संघटना जिल्ह्यात कार्यरत आहेत. पण या संघटनांनी कोणाला कोणता अधिकार, हक्क मिळवून दिला हे त्यांचे त्यांनाच माहीत नाही. अशा परिस्थितीत आपल्याच नातेवाईकांनी हिरावलेला हक्क भिक्षेकरी वृद्धांना मिळवून देण्यास या संघटना पुढाकार घेतील का?आर्थिक सोय नसल्यामुळे वृद्धाश्रमात नवीन वृद्धांना आसरा देणे कठीण आहे. जुने आहेत त्यांना आम्ही कसेतरी पोसत आहे. त्यातील एखादा वृद्ध दगावतो तेव्हा त्याच्या नातेवाईकांना कळविले जाते. पण त्याच्यावर अंत्यसंस्कारही तुम्हीच करा, असे निष्ठूरपणे नातेवाईक सांगतात. जीवंतपणी वृद्धांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्यानंतर किमान मेल्यानंतरही त्यांना नातेवाईकांकडून रितसर अंतिम संस्काराचा हक्क मिळू नये, ही बाब क्लेशदायक आहे.- रमेश कुथे, संचालकमातोश्री वृद्धाश्रम गोंदियावृद्धाश्रमांचा आधार तुटलाराज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात सरकारी अनुदानातून मातोश्री वृद्धाश्रम सुरू करण्यात आले. पण सरकार बदलल्यानंतर गेल्या १५ वर्षात हे अनुदान मिळालेच नाही. त्यामुळे सर्व वृद्धाश्रम बंद पडले. जे काही ४-५ सुरू असतील त्यात गोंदियातील वृद्धाश्रमाचा समावेश आहे. पण सरकारी अनुदान नसल्यामुळे हा वृद्धाश्रम चालविणे संस्थाचालकांना कठीण झाले आहे. आता पुन्हा राज्यात युतीचे सरकार आले असताना जुने वृद्धाश्रम पुन्हा नव्याने दमाने सुरू होऊन तमाम वृद्धांच्या काठीला आधार देतील का? असा प्रश्न वृद्धांना पडला आहे.