शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

त्या बेवारस जनावरांचे खरे मालक कोण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. कोहमारा चौकात हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस विभागाचे मोठे कार्यालय आहे.

ठळक मुद्देमहामार्गावरील अपघातात वाढ : कोहमारा चौकात उड्डाणपुलाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या महामार्गावर मोकाट जनावरांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दोन दिवसांपूर्वीच या महामार्गावर सहा मोकाट जनावरांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही जनावरे मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांचे पशुपालक पुढे आले नाही. त्यामुळे या मोकाट जनावरांचा मालक कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. कोहमारा चौकात हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस विभागाचे मोठे कार्यालय आहे. पण कोणताही अधिकारी वेळीच पोहचला नाही. अशोका कंपनीचे काही अधिकारी हे अकरा वाजता जेसीपी घेऊन दाखल झाले होते. हे काम आपले नसल्याचे कारण पुढे करून जबाबदारी झटकण्याचे काम होत असल्याचे चित्र येथे नेहमीच पाहावयास मिळत आहे.कोहमारा ग्राम प्रशासनाने याकडे थोेडे लक्ष देण्याची गरज आहे.पण मोकाट जनावरांना पकडून ठेवाचे कुठे हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा येऊन ठाकला आहे. पूर्वी कोंडवाडे गावात राहत होते. बेवारस जनावरांना पकडून त्यात ठेवले जात होते. मात्र आता ते नसल्याने पकडलेल्या जनावरांना ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. कोहमारा येथील चौकात नेहमीच मोकाट जनावरांचा वावर असतो. तर मागील काही दिवसांपासून या मार्गावर मोकाट जनावरे अपघात मृत्यूमुखी पडण्याचे सत्रच सुरू झाले आहे. त्यामुळे याची दखल घेत यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर असलेल्या कोहमारा हे मुख्य ठिकाण आहे. या चौकात नवेगाव फाटा ते नैनपुर गावापर्यंत उड्डाण पुलाची नितांत गरज आहे. उड्डाणपूल तयार झाल्यास अपघात होणार नाही. यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर अपघात झाल्यास त्याची विल्हेवाट लवकर लावली जात नसल्याचे दिसत आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- वंदना थोटे, सरपंच कोहमारा

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघात