शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

त्या बेवारस जनावरांचे खरे मालक कोण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. कोहमारा चौकात हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस विभागाचे मोठे कार्यालय आहे.

ठळक मुद्देमहामार्गावरील अपघातात वाढ : कोहमारा चौकात उड्डाणपुलाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या महामार्गावर मोकाट जनावरांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दोन दिवसांपूर्वीच या महामार्गावर सहा मोकाट जनावरांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही जनावरे मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांचे पशुपालक पुढे आले नाही. त्यामुळे या मोकाट जनावरांचा मालक कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. कोहमारा चौकात हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस विभागाचे मोठे कार्यालय आहे. पण कोणताही अधिकारी वेळीच पोहचला नाही. अशोका कंपनीचे काही अधिकारी हे अकरा वाजता जेसीपी घेऊन दाखल झाले होते. हे काम आपले नसल्याचे कारण पुढे करून जबाबदारी झटकण्याचे काम होत असल्याचे चित्र येथे नेहमीच पाहावयास मिळत आहे.कोहमारा ग्राम प्रशासनाने याकडे थोेडे लक्ष देण्याची गरज आहे.पण मोकाट जनावरांना पकडून ठेवाचे कुठे हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा येऊन ठाकला आहे. पूर्वी कोंडवाडे गावात राहत होते. बेवारस जनावरांना पकडून त्यात ठेवले जात होते. मात्र आता ते नसल्याने पकडलेल्या जनावरांना ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. कोहमारा येथील चौकात नेहमीच मोकाट जनावरांचा वावर असतो. तर मागील काही दिवसांपासून या मार्गावर मोकाट जनावरे अपघात मृत्यूमुखी पडण्याचे सत्रच सुरू झाले आहे. त्यामुळे याची दखल घेत यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर असलेल्या कोहमारा हे मुख्य ठिकाण आहे. या चौकात नवेगाव फाटा ते नैनपुर गावापर्यंत उड्डाण पुलाची नितांत गरज आहे. उड्डाणपूल तयार झाल्यास अपघात होणार नाही. यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर अपघात झाल्यास त्याची विल्हेवाट लवकर लावली जात नसल्याचे दिसत आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- वंदना थोटे, सरपंच कोहमारा

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघात