शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार ? शासनाप्रती शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:52 IST

Gondia : शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत; आर्थिक संकट करा दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांची दरवर्षीची खरिपातील अवस्था बघता शासनाने मागील काही वर्षांपासून शासकीय हमीभावासह शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनस जाहीर केला. मागील वर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला होता. मात्र, यावर्षी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव वगळता बोनसची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर व्यक्त व्यक्त होताना दिसून येत आहे.

जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, येथील शेतकऱ्यांचे धान हे पीक मुख्य आहे. शिवाय बारीक पोत असलेल्या धान वाणाच्या विविध व्हरायटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संशोधनातून निर्माण झाल्या असून, देशविख्यात झाल्या आहेत. त्या धान वानाचे जनकसुद्धा सर्वदूर प्रसिद्ध झाले आहेत. या धान उत्पादक जिल्ह्यात खरिपात मोठ्या प्रमाणावर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, येथे सिंचनाची अशी भरीव सुविधा अजूनपर्यंत निर्माण झाली नाही. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणावरच शेतकऱ्यांना उत्पादन घ्यावे लागते. परिणामी दरवर्षी शेतकऱ्यांना कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ किंवा अन्य अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. धान शेतकऱ्यांची आर्थिक चणचण दूर करण्यासाठी शासनाने बोनसची घोषणा केली; परंतु बोनस न दिल्याने शासनाप्रती शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. 

मागील वर्षी मिळाला होता बोनसचा आधारकाही शेतकऱ्यांनी बोअरच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण केली आहे. अशा परिस्थितीमुळेच कदाचित शासनाने शेतकऱ्यांना थोडा आर्थिक आधार मिळावा म्हणून हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला व मागील वर्षीपर्यंत मिळाला सुद्धा. मात्र, यावर्षी तीन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा बोनस शेतकऱ्यांना मिळाला नाही.

बोनस शेतकऱ्यांसाठी मोठा आधारशासनाने खरीप हंगामातील धान पिकासाठी जवळपास दोन हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला होता. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शासनाने बोनस जाहीर केला असता तर निश्चितच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढता आला असता व बोनसचा भक्कम आर्थिक आधार मिळाला असता; पण यावर्षी बोनस मिळाला नसल्याने शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेतच आहेत.

ऐनवेळी येतातच खरिपात कुठले ना कुठले संकटदरवर्षी खरिपाचा हंगाम पूर्णत्वास यायला लागला की, कुठले ना कुठले नैसर्गिक संकट पिकांवर येतेच. त्यामुळे शेतकऱ्यांचे सारे धैर्य खचून जाते. यावर्षीसुद्धा खरीप पिकाच्या शेवटच्या टप्प्यात काही भागांमध्ये किडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट आल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

२० हजार रुपये हेक्टर बोनस शासनाने जाहीर केला होता. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

"मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शासनाने योग्य वेळी बोनस द्यायला हवे होते. मात्र, यावर्षी चित्र वेगळे आहे. शासन बोनस देणार की नाही, हे अधांतरी आहे. मात्र, बोनस मिळेल या आशेवर शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. निदान मार्चनंतर तरी ही आशा पूर्ण व्हावी."- अरुण मेंढे, शेतकरी, शिलापूर

टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीgondiya-acगोंदिया